Skip to main content

कल्पकता

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 28/01/2025 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
असंख्य भारतीय पापक्षालनासाठी गंगेत डुबक्या मारत असताना डीपसिक या नवजात चिनी कंपनीने अमेरीकेच्या तंत्रवर्चस्वाला हादरवणारे "अल्प मोली बहुदुधी" असे नवीन आर१ हे मॉडेल बाजारात आणले आणि अनेक मातब्बर कंपन्यांचे शेअर्स गडगडायला सुरुवात झाली. डीपसिकच्या या उपलब्धीने अनेक जागतिक समीकरणे आता बदलतील. मागील वर्षी २९ मे रोजी मी "कल्पकता" या विषयावर एक टिपण लिहीले होते. त्याची सर्व संबंधीताना आठवण राहावी म्हणून परत प्रसृत करत आहे... ============= कल्पकता ====== माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं, मला अद्वातद्वा अपमानकरक बोलला (आणि मग मी त्याला हाकलून दिलं). भांडणाचा विषय होता - चिनी अर्थव्यवस्था! आपल्याकडच्या निवडणूका जाहिर होण्या अगोदर बहुतेक संघोट्यांनी सूताने स्वर्ग गाठला होता. अर्थव्यवस्था उतरंडीला लागल्याने चीन पुरता गाडला गेल्याची त्यांची भावना निर्माण झाली होती आणि भारताशिवाय जगाला सहारा नाही. या भ्रमाने या सर्वांना ग्रासले होते. प०पू० सरसंघचालक पण अशीच वक्तव्ये करत होते. प्रत्येक देशाचे अर्थचक्र असते. ते परमोच्च बिंदू गाठल्यावर उतरंडीला लागते. त्यात मोठी पडझड होते. ही अपरिहार्य असते. या पडझडीतून सावरण्यासाठी कुशल आणि मुत्सद्दी नेतृत्व लागते. तसेच आडात नसेल तर पोहर्‍यात येत नाही. मी माझ्या मूर्ख मित्राला माझी भूमिका समजावून सांगितली. चीनला शतकानुशतकांचा कल्पकतेचा इतिहास आहे. मी चीनीवंशाला जनुकीय दृष्ट्या श्रेष्ठ वंश मानतो, ते याच कारणामुळे. भारतीय समाजात अशी कल्पकता कधीही निर्माण होणं शक्य नाही. भारतात श्रेयलंपटपणा, राजकीय हितसंबंधाना असलले विषारी महत्त्व इ० कारणे त्यामागे आहेत. मार्टीन गार्डनर नावाचा एक प्रसिद्ध गणिती म्हणायचा की देशाची बुद्धीमत्ता त्या देशात शुद्ध गणितात संशोधन करणार्‍यांच्या संख्येवर ठरते. तसेच देशाची कल्पकता "डिझाईन" या शाखेला किती प्रतिष्ठा आहे त्यावर ठरते, असे माझे ठाम मत आहे. रेशीमबागेतील ’विद्वानांना’ डिक्शनरी उघडी ठेऊन इनोव्हेशनचे स्पेलिंग सांगता आले तरी खूप आहे. चीनी कल्पकतेचे मोजमाप त्यांनी उभ्या केलेल्या पेटंट्च्या एव्हरेस्टमध्ये दिसते. तसेच त्यांच्या यशाची अनेक रहस्ये त्यांच्या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीच्या यशामध्ये असतात, असे मला एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात कळले. त्यांचा अंमलबजावणी दर ८०-८५% असतो. अशी असामान्य कल्पकता ज्या देशात असते तो देश आर्थिक समस्यांना नक्कीच तोंड देऊ शकतो. मी त्याला म्हटले, "मला फक्त २-३ वर्षे दे. आपण परत भेटू आणि आढावा घेऊ या". त्याने त्याचा हटवादीपणा सोडला नाही आणि आमच्या मैत्रीचा कडवट शेवट झाला. पण आता बातम्या येत आहेत की, - परदेशी गुंतवणूकदार परत चीनकडे वळत आहेत. - आज ही बातमी वाचली IMF lifts China's 2024 growth forecast to 5% "China's economic growth is projected to remain resilient at five percent in 2024 and slow to 4.5 percent in 2025," the IMF said in a press release, adding the decision was "driven by strong first-quarter GDP data and recent policy measures". (https://www.moneycontrol.com/.../imf-raises-china-2024...) सूज्ञांस अधिक सांगणे न लगे... =================== टीप - सदर टीपणास निवडणूकपूर्व उन्मादाचे संदर्भ आहेत. ते बेदखल केले जाऊ नयेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19463
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

In reply to by वामन देशमुख

पुरोगामी शक्ती म्हणजे फुशाअं चा जप करणारे बारामतीचे काका , एम आय एम , रा गा, सुसू ताई. उबाठा , आणि त्यांचे सर्वेसर्वा बोलके संपादक .

In reply to by श्रीगुरुजी

मानवी संस्कृती पैसा वापरायला लागल्यावर सुरवातीच्या काळात शंख-शिंपले वगैरे गोष्टी वापरल्या जात असल्या तरी काही काळात सोने-चांदीची नाणी वापरली जात नव्हती का? कागदी नोटा वापरायला जायला लागल्यापासूनही अगदी १९७० च्या दशकाच्या सुरवातीपर्यंत त्या कागदी नोटा सोन्यावर 'बेस' केलेल्या होत्या. पहिले महायुध्द, अमेरिकन यादवी युध्द वगैरे काही काळ वगळला तर कागदी नोटा सोन्यावरच बेस केलेल्या होत्या- १९७० च्या दशकाच्या सुरवातीपर्यंत. म्हणजे मानवी संस्कृतीच्या अर्थकारणात इतकी महत्वाची भूमिका बजावलेला धातू अगदी निरूपयोगीच होता असे या महाशयांचे म्हणणे दिसते.

आत्ताही चलनात नोटा वापरणे कमी झालेले आहे. बाजारात दुकानदाराकडे ५०० रुपये सुट्टे नसतात. भाजीवालेही , रिक्षावाले हीए युपीआय ने पैसे देतात , घेतात, अजून दोन तीन वर्षानी कागदी चलन दिसणे आणखी कमी कमी होईल.

हा धागा आता टिळक श्रेष्ठ की आगरकर श्रेष्ठ या वळणावर लवकरच येऊन स्थिरावेल अशी दाट शक्यता दिसते

In reply to by युयुत्सु

हे होणारच होते कारण मुळात धाग्याचा हेतूच खोडसाळ होता. गांभीर्याने धागा लिहिला असता तर प्रगल्भ प्रतिसाद आले असते. परंतु संघाला शिव्या देण्यासाठी एआयचा बुरखा पांघरून धागा काढला तेव्हाच तो भरकटणार हे नक्की होते. संघाला शिव्या द्यायच्या असतील तर काही आक्षेप नाही, परंतु धाग्याचा विषय आणि आतील गाभा संघनिंदा हाच असू द्या. नाहीतर विषय असायचा अमेरिकेतील विमान अपघात आणि गाभ्यात संघाला शिव्या.

In reply to by श्रीगुरुजी

सोने आयातीवर अवलंबून असणाऱ्या भारतासारख्या देशातील नागरिकांनी धातुरुपी सोन्यात गुंतवणूक करणे हे आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. एकतर टणावरी सोने हे दागिन्यांच्या रूपात असते किंवा देवस्थानात पडून असते ज्यातून उत्पादन होत नाही. परंतु सोने आयातीमुळे व्यापारी तूट वाढते, परदेशी चलनाचा साठा कमी झाल्याने रुपयावर दबाव येऊन त्याची किंमत कमी होते, आयात महाग झाल्याने अनेक वस्तू महाग होतात, लोकांची क्रयशक्ती कमी होते. ह्या सगळ्याला धातुरूपी सोन्यातील बिनडोक गुंतवणूक जबाबदार आहे. सोन्यामध्येच गुंतवणूक करायची असेल तर gold ETF किंवा gold bond मध्ये करावी. अर्थात ज्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेची काही देणेघेणे नाही त्याच्या करता धातूरुपी सोने गुंतवणूक हा उत्तम पर्याय आहे . मंदिराचे कळस, बाबाचे आसन, देवांचे दागिने हे तर अजून चांगले पर्याय आहेत देशाच्या अर्थव्यवस्थेला तारायला.

In reply to by श्रीगुरुजी

केली अपेक्षा संघाकडून तर काय बिघडले? तीन अपत्य जन्माला घालायचा सल्ला जे देऊ शकतात त्यांनी जनतेला सोन्याबद्दल सल्ला दिला तर काय बिघडेल? उलट सरकारला फायदाच होईल. इथले मिपाकर सोने गुंतवणुकीचे समर्थन करताना दिसत आहेत. संघ हे निमित्त आहे .

In reply to by आग्या१९९०

ही महत्त्वाची बाजू उजेडात आणल्याबद्दल अभिनंदन! पण हे किती लोकाना समजेल याची शंका आहेच. हिंदूच्या हितावर गस्त घालणारी संघटना हिंदूच्या हिताच्या अर्थशास्त्राची दखल घेऊ शकत यासारखा दैवदूर्विलास नाही. सोन्यातील गुंतवणूकीचे समर्थन करणार-यांकडून फिजिकल सोने आणि डिमॅट सोने यातील फरकाची मी अपेक्षा ठेवली, ही माझीच चूक झाली!

In reply to by युयुत्सु

छोट्या स्क्रीनवर टंकताना चूका झाल्या त्या लक्षात आल्याने परत ... ही महत्त्वाची बाजू उजेडात आणल्याबद्दल अभिनंदन! पण हे किती लोकाना समजेल याची शंका आहेच. हिंदूच्या हितावर गस्त घालणारी संघटना हिंदूच्या हिताच्या अर्थशास्त्राची दखल घेऊ शकत नाही यासारखा दैवदूर्विलास नाही. सोन्यातील गुंतवणूकीचे समर्थन करणार-यांकडून फिजिकल सोने आणि डिमॅट सोने यातील फरक कळवा ही मी अपेक्षा ठेवली, ही माझीच चूक झाली!

In reply to by युयुत्सु

https://www.moneycontrol.com/news/business/personal-finance/sgbs-discon… कधी नव्हे ते ह्या योजनेचे कौतुक केले होते, पण शेवटी सरकारने माती खाल्लीच. ह्याच कारणामुळे ह्या सरकारवर विश्वास नाही. योजना कशी असावी तर मनरेगासारखी.विरोधी पक्षही सत्तेत आला तरी बंद करू शकणार नाही अशी दोषमुक्त.

In reply to by आग्या१९९०

सुवर्णरोखे योजना अकल्पक हिंदूंची होती, मनरेगा योजना कल्पक चिन्यांची होती, असे काही म्हणायचे आहे का? मूळ लेखाचा आशय तसाच काहीसा आहे, नाही का?

In reply to by वामन देशमुख

सुवर्णरोखे योजना अकल्पक हिंदूंची होती, मनरेगा योजना कल्पक चिन्यांची होती, असे काही म्हणायचे आहे का? मनरेगा काँग्रेसचे अपत्य, काँग्रेस= पुरोगामी/डावे= देशद्रोही. त्यांना चीनी म्हणू शकता, कारण अशी कल्पकता त्यांच्याकडेच आहे. मूळ लेखाचा आशय तसाच काहीसा आहे ना?

In reply to by आग्या१९९०

the central government has discontinued the Sovereign Gold Bond (SGB) scheme, citing the high cost of borrowing associated with the instrument.

In reply to by सुबोध खरे

citing the high cost of borrowing associated with the instrument. हा अचानक साक्षात्कार सरकारला आताच कसा काय झाला? व्याज दरात तर काहीच वाढ केली नाही. मग borrowing कशी काय महाग वाटू लागली? तुम्हाला समजले असेल तर आम्हालाही सांगा.

In reply to by आग्या१९९०

citing the high cost of borrowing associated with the instrument. ह्यावर अद्याप खुलासा केला नाही तुम्ही. नसेल समजले तर तसं सांगा.

In reply to by सुबोध खरे

अहो लिंक कशाला देताय? सरकारचे म्हणणे तुम्हाला समजले/पटले असेल असे वाटल्याने मी तुम्हाला विचारले होते की. ' सरकारला borrowing कशी काय महाग वाटू लागली ? तुम्हाला समजले असेल तर आम्हालाही सांगा '. एक तर ९-११ % रिटर्न सरकारने नव्हे मार्केटने द्यायला लावला. ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आणताना सरकारने स्वतःचा आणि गुंतवणूकदाऱ्यांच्या फायद्याचा विचार केला असेलच ना ? दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने त्यातील संभाव्य जोखमींचा आणि त्यावरील उपायांचाही विचार केलाच असेल. मग अचानक सरकारला ही योजना महाग का वाटू लागली ? सरकारकडे ह्यावर उपाय नसेल तर बिनडोकपणा आहे सगळा. सरकारने म्हटले महाग वाटते म्हणून आपणही मान डोलवायची का ?

In reply to by स्वधर्म

लेख व चर्चा कल्पकता या विषयावर नव्हतीच. संघ हाच विषय होता. त्यामुळे चर्चा घसरली असे म्हणता येत नाही.

जगातले सर्व ज्ञान हुशारी आणि कल्पकता केवळ काही संस्थांची मक्तेदारी आहे आणि जगातील बाकी सर्व मूर्खच आहेत असे समजणाऱ्या सर्वज्ञ माणसांनी लिहिलेला लेख असावा तसाच आहे. आपला एकांगी द्वेष अशा लेखात दिसू नये इतकी मूलभूत काळजी सुद्धा घेतलेलीच नाही. आता हेच विधान पहा. चीनला शतकानुशतकांचा कल्पकतेचा इतिहास आहे. मी चीनीवंशाला जनुकीय दृष्ट्या श्रेष्ठ वंश मानतो, ते याच कारणामुळे. भारतीय समाजात अशी कल्पकता कधीही निर्माण होणं शक्य नाही. According to historical estimates, during the 16th century, India generally had a larger GDP than China, with some sources indicating that India's economy was significantly bigger in the early part of the century before China gradually overtook it towards the end; however, both economies remained relatively close in size throughout the period. सोळाव्या शतकाच्या अखेर पर्यंत भारत जवळ जवळ सर्वत्र मुघलांच्या अधिपत्याखाली आला होता यानंतर चीनची अर्थव्यवस्था भारताच्या पुढे गेली असे इतिहास सांगतो. मग १६ व्य शतकापर्यंत कल्पकताशून्य भारत चीनच्या पुढे कसा काय होता? आणि १६ व्य शतकापासून ते २० व्या शतकापर्यंत रा स्व संघ हा शब्द सुद्धा अस्तित्वात नव्हता. मग भारताची कल्पकता कुणाच्या मुळे लयास गेली ( अर्थात मुळात अस्तित्वातच नव्हती तर लयास कशी जाणार हि मल्लिनाथी येईलच. अर्थात याचे उत्तर या महाशयांना देता येणार नाही मग शब्दांचा डोंगर रचून आपणच किती शहाणे आणि इतर लोक कसे मूर्ख आहेत हेच पालुपद चालू राहील. बाकी दर महा १० टक्के चक्रवाढ व्याजाने परतावा देणारा अल्गोरिदम ची मी चातकासारखी वाट पाहतो आहे. ( गेल्या सहा महिन्यात बाजाराने बहुतेकांना दरमहा एक टक्का सुद्धा परतावा दिलेला नाही) पण तो मोदींचा दोष आहे.

चीनी कल्पकतेचे मोजमाप त्यांनी उभ्या केलेल्या पेटंट्च्या एव्हरेस्टमध्ये दिसते. हे त्यांना कसे काय शक्य झाले?

In reply to by युयुत्सु

चीनमध्ये गुणशाही का रूजली याचे उत्तर हवे असेल तर त्यासाठी चीनमधल्या इंपिरीयल एक्झामिनेशन सिस्टीमची माहिती मिळवावी. https://www.youtube.com/watch?v=f8qaxnBXo4g

डी एस के मधे केलेली गुंतवणूक किती जणाना परत मिळाली? हे महाशय आकाशवाणीवरून तत्वानिष्ठेची बरीच लांबीचौडी प्रवचने झोडत होते