देवीला बळी
महाबलीपूरमच्या शिल्पात आपण तिच्याभोवती वरच्या बाजुला सिंह आणि काळवीट पहातो. आणि मग लक्ष जातं तिच्या पायशी असलेल्या दोन व्यक्तींकडे. ते दोघे जे विधी पार पाडत आहेत त्यांची नावे आहेत अरिकंडम आणि नवकंडम. (कंडम पेक्षा खंडंम जास्त सोयिस्कर वाटते मला पण तमिळ उच्चारण जसा आहे तसच लिहिलं आहे). अरीकंडम म्हणजे स्वतःचं मस्तक कापून देवीला अर्पण करायचं आणि नवकंडम म्हणजे म्हणजे आपल्या शरीराचे नऊ अवयव कापून देवीला अर्पण करयाचे.
कोट्रावै ही युद्धाची देवता आहे. युद्धाला जाण्यापूर्वी जेंव्हा देवीची पूजा केली जाई तेव्हा युध्दाच्या उन्मादात आपल्या राज्याला विजय मिळावा म्हणुन सैनिक स्वत:चा बळी देत देवीला. लक्षात घ्यायची महत्वाची गोष्ट ही की हा विधी स्वेच्छेनच केला जाई आणि स्वत:च करावा लागे म्हणजे स्वतःच आपलं मस्तक कापायचं किंवा नऊ अवयव कापयाचे. असे आत्मसमर्पण करनार्या सैनिकांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्य घेत असे. हा पर्याय सैनिकांशिवाय कैदी किंवा मृत्युदंडाची शिक्षा झालेले गुन्हेगार ह्यांनाही प्रायश्चित्त करण्यासाठि उपलब्ध असे.
इतर बळींच्या तुलनेत हा दोन कारणांसाठी श्रेष्ठ वाटतो. सर्वात विषेश म्हणजे इथे स्वतःच्या इच्छापूर्ती किंवा स्वार्थेसाठी बळी दिला जातं नाही आणि दुसरी म्हणजे बळी म्हणुन निष्पाप मुक्या प्राण्याचा किंवा दुसर्या व्यक्तीचा जीव घेतला जात नाही.
प्राचीन मंदिरांमध्ये आपणास जवळ्पास सर्व प्रकारच्या परंपरां दर्शवनारी शिल्पे दिसतात. पशुबळीचं द्रुश्य असलेलं शिल्प माझ्या तरी पहाण्यात आलं नाही. कुणाकडे तसा फोटो असेल तर जरूर प्रतीसादामध्ये टाका. पशुबळीची परंपरा कुठे वा कशी सुरु झाली ह्याची काहि माहिती असेल तर जरुन कळवा. खुप वर्षापूर्वी तुळजापुरला भेट दिली होती तेव्हा तिथे पूजार्यांनी सांगितलेलं पुसटस आठवतय कि तिथे जो बळी दिला जातो तो देवीसाठी नसतो, तो महिषासुरासाठी असतो.
असो आपण आत कोट्रावैची इतर शिल्पे पाहु. तशी ही देवता प्रामुख्याने पल्लवा आणि चोला मंदिरांमध्ये दिसते.
तंजावरच्या बृहदेश्वर मंदिरातील शिल्प.
इथे ती विष्णुदुर्गा स्वरुपात दिसते.
गंगैकोंडाचोळापुरम
इथे ती अष्टभुजा स्वरुपात सिंहासोबत आहे.
दारसुरम येथिल नितांत सुंदर मुर्ती
एक क्लोज अप
चंदन आणि कुंकु वापरुन किती साधा पन सुंदर शृगार केलाय ना? तिच्या डोळ्यातली करुणा पाहुन वाटत नाही कि स्वतःच्या स्वार्थासाठी दिलेल्या एखाद्या निष्पाप मुक्या प्राण्याच्या बळीने ती प्रसन्न होत असेल.
कोट्रावै संबधीत जास्ती माहिती जाणुन घेण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ पाहु शकता
https://www.youtube.com/watch?v=gaPOsaIN6J8&feature=youtu.be
In reply to छान माहिती by नीलस्वप्निल
In reply to कोणताही देव, देवता कधीच by श्रीगुरुजी
कदाचित हत्या करताना मनात निर्माण झालेली अपराधी भावना कमी करण्यासाठी असावे.हा षटकार आहे. भारी आपल्या पापात देवाला भागिदार बनवलं की आपल्याला दंड नाही :)
In reply to देवीला बळी ? by गामा पैलवान
In reply to चला गुरवाला सुबुद्धी जशी दिली by प्रकाश घाटपांडे
चला गुरवाला सुबुद्धी जशी दिली तशी तुम्हा आम्हा सर्वांना देवो+१
In reply to देवीला बळी ? by गामा पैलवान
बळी देवीला नसून तिच्याखालच्या राक्षसाला दिलेला असतो हे मी ही ऐकलंय.माझं ह्या बाबतीत असं मत आहे ( त्याला कुठलाही पौराणिक संदर्भ नाही त्यामुळे ते फक्त वैयक्तिक मत आहे) राक्षसासाठी बळी देण्याच्या विधिचा दुहेरी उपयोग केला आहे. पहिला सहिष्णुता- तो राक्षस जरी असला आणि त्याच्या असुरी प्रवृत्ती जरी निंदनिय असल्या तरी वर्षातून एक दिवस का होईना त्याला त्याचं जेवण दिलं जाईल. आणि दुसरं असा बळी देण हे राक्षसी प्रवृत्तीचं द्योतक आहे हे ही सुचवायचं असेल. आणि इथे बहुतेक संपूर्ण वर्षातुन एकाच प्राण्याचा बळी दिला जात असेल. त्यात येणारा प्रत्येक भक्त बळी देतोय अस नसावं कदाचित. एक मुका प्राणी मारण्याऐवजी त्याला खाउपिऊ घालुन त्याचा मायेनं आयुष्यभर सांभाळ जर केला तर देवी नक्कीच जास्त प्रसन्न होईल.
In reply to तुमचा अनुभव ऐकुन आनंद झाला. by पॉइंट ब्लँक
In reply to सुरेख लेखन आणि उत्तम माहिती. by प्रचेतस
त्या दगडावर प्राचीन काळी अजबली करत असत.हा वर्षातुन किती वेळेस केला जाई आणि कोण करत ह्याबद्दल काही माहिती आहे का?
In reply to धन्यवाद, खुप सुंदर माहिती by पॉइंट ब्लँक
हा वर्षातुन किती वेळेस केला जाई आणि कोण करत ह्याबद्दल काही माहिती आहे का?ह्याबाबत निश्चित अशी माहिती नाही पण यज्ञाच्या वेळेस, किंवा खंडेनवमी, प्रत्येक महिन्याची पौर्णिमा, अमावास्या असे काही खास दिवस असत बळीप्रथेचे.
In reply to हा वर्षातुन किती वेळेस केला by प्रचेतस
In reply to सुरेख लेखन आणि उत्तम माहिती. by प्रचेतस
In reply to विरगळ कुठे आहे by अजय देशपांडे
In reply to अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं by आनन्दा
In reply to ह्या सुभाषिताची आठवण करुन by पॉइंट ब्लँक
In reply to हा श्लोक जास्त पुरातन नसावा. by प्रचेतस
अश्वं नैव- अश्व नाही. पण अश्वाचे हवन अश्वमेध यज्ञात होत होते. सातवाहन, गुप्तांनी पण अश्वमेध केले होते.एकदम बरोबर. अश्वमेधाच्या काही प्रथा इतक्या विचित्र आहेत की ग्रिफित ने त्या आपल्या भाषांतरातुन वगळल्या होत्या अस कुठतरी वाचल्याचं आठवतयं
In reply to अश्वं नैव- अश्व नाही. पण by पॉइंट ब्लँक
In reply to मस्त माहिती आणि फोटो. by बाप्पू
पशुबळीची परंपरा कुठे वा कशी सुरु झाली ह्याची काहि माहिती असेल तर जरुन कळवापशुबळीच्या परंपरेचे मूळ वैदिक धर्मात आहे. विविध यज्ञात होणार्या पशूंच्या हवनाचे सविस्तर वर्णन महाभारतात आहे तर ते यजुर्वेदात विस्ताराने आलेले आहे. काही यज्ञांची यजुर्वेदातील वर्णने अशी: पंचशारदीय- हे याग शरद ऋतूंत करावयाचे असतात. पहिल्या वर्षाच्या शरद ऋतूंत एकेक वर्षाच्या १७ कालवडी व १७ खोंड देवतांना बळी देतात असे हे याग सलग ५ वर्षे करतात. त्यात खोंड मोकळे सोडतात व हवन फक्त कालवडींचे, शेवटच्या पाचव्या वर्षी ओळीने पाच दिवस अग्नीष्टोम, उक्थ्य, उक्थ्य, उक्थ्य अणि अतिरात्र हे सोमयाग त्यातही पहिल्या चार उपयागात ओळीने ३/३ कालवडी ओ पाचव्या अतिरात्रात ५ कालवडी मारायच्या (एकूण १७) व १७ खोंडे सोडून द्यायची. इंद्रस्तुत- ह्याचा विधीही काहीश्या पंचशारदीय पद्धतीनेच होत असे. इंद्राची स्तुती हे मुख्य कारण अश्वमेध - चौघे ऋत्विज अश्वमेध्याच्या विजयी घोड्याला उत्कृष्ट रितीने पाणी शिंपून धुवून काढतात. घोड्याबरोबर एक कुत्रे पाण्यात सोडण्यात येई व त्याचा मुसळांनी चोपून वध करण्यात येई. पशूंना बांधण्यासाठी एकवीस यूप तयार करण्यात येत. ह्यात वीस यूपांना प्रत्येकी ९ असे १८० पशू बांढण्यात येत व शेवटच्या मुख्य युपास अश्व बांधण्यात येई. या १८० पशूंना मारण्यात येई. पशूवधातील प्राण्यांमध्येही आरण्यक आणि ग्राम्य असे दोन गट असत. आरण्यक (रानटी- हिंस्त्र पशू)वर्गातील प्राण्यांना काही विशिष्ट संस्कार करुन सोडून देण्यात येई. तर ग्राम्य (गावातले गाय, बैल, रेडा, म्हैस, मेष) इत्यादी प्राणी मारण्यात येत. घोड्याला मारावयास नेताना एक घोडी पुढे चाललेली असते. बळी देताना एका लोकरीच्या वस्त्रावर एक कातडे अंथरावयाचे व त्यावर रुप्याचा पत्रा ठोकावयाचा व घोड्यास त्यावर आडवा पाडूनमारावयाचा. घोड्यासोबत एक गायही मारण्यात येत असे. राजसूय - ह्यातही कित्येक पशूंचे हवन करण्यात येत असे. काही राजे तर इतर राजांना जिंकून त्यांचे हवनही करत असत. महाभारतात षोडशराजकीय आख्यानात रंतीदेव राजाकडे होत असलेल्या यज्ञाचे वर्णन कसे आले आहे ते पाहा उपस्थिताश्च पशवः स्वयं यं शंसितव्रतम्| बहवः स्वर्गमिच्छन्तो विधिवत्सत्रयाजिनम| नदी महानसाद्यस्य प्रवृतक्ता चर्मराशितः| तस्माच्चर्मण्वती नाम ख्याता पुण्या सरिद्वरा॥ व्रताचा अंगिकार केलेल्या आणि यज्ञसत्र योग्य पध्दतीने करणाऱ्या त्या राजाकडे स्वर्गाची प्राप्ती करून घेऊन इच्छिणारे अनेक पशु आपण होऊन येत. त्याच्या पाकगृहात साठलेल्या पशूंच्या कातड्याच्या ढिगापासून एक नदीच निर्माण झाली आणि म्हणून त्याच्या अग्निहोत्रात हीच चर्मण्वती नदी वाहत होती. व्यक्तं वस्वोकसारेयमित्युचुस्तत्र विस्मिताः। साङ्कृते रन्तिदेवस्य यां रात्रिमतिथिर्वसेत्॥ आलभ्यन्त तदा गावः सहस्राण्येकविंशतिः। तत्र स्म सूदाः क्रोशन्ति सुमृष्टमणिकुण्डलाः॥ सूपं भूयिष्ठमश्नीध्वं नाद्य मांसं यथा पुरा। रन्तिदेवस्य यत्किञ्चित्सौवर्णमभवत्तदा॥ सांकृती रंतिदेवाच्या घरी ज्या रात्री अतिथी वास्तव्य करत असे, त्याच रात्री एक सहस्त्र एकवीस गायी मारल्या जात असत. रत्नजडित कुंडले धारण केलेले तेथील आचारी मोठ्याने ओरडत की 'आज पूर्वीइतके मांस शिल्लक नाही तेव्हा शाकाहारच करा'. त्यावेळी वापरलेल्या रंतीदेवाच्या सर्व वस्तू सुवर्णाच्याच होत्या. बौद्ध आणि जैन धर्माच्या उदयानंतर यज्ञसंस्थेचा हळूहळू र्हास होत गेला. मात्र पशुबळीची ही प्रथा शिल्लक राहिलीच जी आजही अस्तिवात आहेच.
In reply to पशुबळीची परंपरा कुठे वा कशी by प्रचेतस
मात्र पशुबळीची ही प्रथा शिल्लक राहिलीच जी आजही अस्तिवात आहेच.कधीतरी ती संपावी अशी मनापसुन ईच्छा आहे!
In reply to सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. by पॉइंट ब्लँक
In reply to पशुबळीची परंपरा कुठे वा कशी by प्रचेतस
In reply to माझ्यामते ह्या श्लोकांचा अर्थ by कानडाऊ योगेशु
In reply to छान फोटो by तुषार काळभोर
In reply to लेखाचा शेवटचा परिच्छेद आणि by वामन देशमुख
लेखाचा शेवटचा परिच्छेद आणि लेखाखालील काही प्रतिसाद वगळता, छोटेखानी, माहितीप्रद लेख आणि एकूणच धागा आवडला.धन्यवाद
हिंदू धर्माच्या (किंवा ज्याला हिंदू धर्म म्हणतात त्याच्या) ऱ्हासाचे, मांसाहारी लोक व मांसाहारी पदार्थ यांचा दांभिक निषेध आणि त्याबद्धल अकारण अपराधगंड बाळगण्याची वृत्ती हे एक प्रमुख कारण आहे.तसा मांसाहार हा विषय नव्हता लेखाचा. हिंदू धर्माचा र्हास अजुन तरी झालेला नाही, त्याला बराच काळ पारतंत्र्याखाली रहावा लागलं असं म्हणता येइल फार तर. आणि आहार हे धर्माच्या र्हासाचं प्रंमुख कारण असु शकत नाही. जर सर्व हिंदू मांसाहार करत असते तर परकिय आक्रमणे झाली नसती? हिंदू धर्माचं जे अधःपतन झालं त्याला बरीच कारणं आहे - धर्माच्या नावावर माजलेलं अवडंबर, धर्म शिकवणारे आणि त्याचे ऱक्षणकर्ते ह्या दोन्हींही भ्रष्ट झालेली मानसिकता , आंतर्गत विवाद इत्यादी. आणि इतकं सगळं होऊनही १३०० वर्षांच्या अखंड आक्रमने होउनही हा धर्म अजुनही जिवंत आहे. सावरतो आहे इतकच नाही फुलतो ही आहे. , जगाच्या पाठीवर अशी दुसरी कुठली जागा उरली नसेल आता की जिथे तिथले मुळ धर्म अजुन ही जिवंत आहेत.
In reply to लेखाचा शेवटचा परिच्छेद आणि by वामन देशमुख
In reply to वनस्पतीचं अर्पण ही हिंसा नव्हे .... by गामा पैलवान
In reply to नवीन माहिती कळली. by गोरगावलेकर
छान माहिती