हा महान देशभक्त २८ जानेवारी १९६७ रोजी निवर्तला. आज त्यांच्या १२४ व्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.
माझेही अभिवादन..
साक्षीदेवा, येऊ देत असेच अनवट/अपरिचित परंतु अत्यंत माहितीपूर्ण लेख...
तात्या.
माझेहि अभिवादन ह्या महान देशभक्तास.
साक्षीजी हा इतिहास खरच माहित नव्हता.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
कारण ह्याना भारतात सता हवी होती व त्यात अडसर येणारया सर्वाना त्यानी आपल्या मार्गातुन व्यवस्थित बाजुला केले.आज ह्या लेखाव्दारे एक नव्या देशभक्ताची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
वेताळ
भारताला स्वातंत्र्य फक्त नेहरु गांधी या द्वयी मुळे मिळाल्याचा गोबेल्स प्रचार गेली ६० वर्षॅ होतो आहे.
डॉ. खानखोजे व त्यांच्या सारख्या कित्येक क्रांतीकारकांनी या देशाला पारतंत्र्याच्या जोखडातुन मुक्त करण्यासाठी परिश्रम घेतलेत यांची साधी दखल देखिल शासन घेत नाही.
या सगळ्या विभुतींचे विस्मरण करुन आपणच कपाळकरंटे ठरत आहोत
सर्वसाक्षी तुम्ही हा लेख मटा आणि तत्सम सगळ्या वृत्तपत्रांना पाठवा.जेणे करुन खरा इतिहास लोकांच्या समोर येईल.
डॉ खानखोजे आणि त्यांच्यासारख्या सर्व महान विभुतींना मनापासुन दंडवत.
अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !
धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !
जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !
जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान !
काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !
गीत- कुसुमाग्रज
कुसुमाग्रजांचे हे गीत किती चपखल आहे याची प्रचिती या लेखाच्या निमित्ताने आली.
या अनामवीरांची माहिती उबलब्ध करुन दिल्याबद्दल सर्वसाक्षी तुमची व मिसळपावची मी शतशः ऋणी आहे .............................
"अनामिका"
अनुदिनी-
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/
डॉ. खानखोजे.
डॉ. खानखोज्यांचं नाव काही वेळा ऐकलं होतं. नक्की संदर्भ आठवत नाहीत. पण त्यांची सविस्तर माहिती आजच कळली. स्वातंत्र्यानंतर पण त्यांना भारतात यायला मिळालं नाही हा तर खरंच कहर आहे.
एका कर्तृत्ववान देशभक्ताला माझा सलाम.
अवांतरः डॉ. खानखोजे हे नाव, रा. स्व. संघाच्या स्थापनेच्या संदर्भात ऐकले आहे असे वाटते. नक्की आठवत नाही.
बिपिन कार्यकर्ते
'नाही चिरा नाही पणती' नावाचे खानखोजेंचे चरित्र वाचलेले आठवते. मात्र लेखिकेचे नाव आठवत नाही.
या पुस्तकात त्यांच्या क्रांतीकार्याबरोबरच शेतीक्षेत्रातल्या कामाचीही माहिती आहे.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
प्रतिक्रिया
थोडक्यात पण छान माहिती.
आदरांजली
हा महान
माझेहि
कॉग्रेसने खुप देशभक्ताना भारतियां पासुन परके केले आहे.
हा इतिहास
सुरेख
अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत
माहिती..
डॉ.
'नाही चिरा
प्रणाम आणि आदरांजली