मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सैराट - याड लागलं!

समीरसूर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
'सैराट'वर सध्या बरीच चर्चा होतेय. माझे मत नोंदवण्याचा मोह आवरत नाहीये म्हणून हा लेख-प्रपंच! आता हा विषय चघळून कंटाळा आला असल्यास क्षमस्व. लेख उडवला तरी नो हरकत! काल 'सैराट' पाहिला. काही लोकांकडून अफाट स्तुती ऐकली होती तर काहींनी बेक्कार नाके मुरडली होती. अतिशय टोकाची मते 'सैराट'विषयी ऐकायला मिळत होती. 'सैराट'ने मराठी चित्रपटाच्या उत्पन्नाचे सगळे विक्रम मोडले असं ऐकलं होतं. चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात जोरात चालू आहे. इतकंच नव्हे तर अमेरिकेतदेखील काही चित्रपटगृहात 'सैराट' प्रदर्शित झालेला आहे आणि तुफान गर्दी खेचतो आहे असे दिसते. एका अमेरिकास्थित मित्राने फेसबुकवर तिथल्या चित्रपटगृहातील दृश्याचा फोटो टाकला होता. ऑन पब्लिक डिमांड, 'झिंगाट' त्या चित्रपटगृहात दोनदा वाजवण्यात आले होते आणि जनता बेभान होऊन नाचत होती. 'सैराट'ने एक निराळीच जादू तमाम महाराष्ट्रावर केली आहे हे नक्की. 'सैराट'ने दुष्काळात होरपळून निघणार्या महाराष्ट्राला तीन तासाचे सज्जड मनोरंजन देऊन रणरणता मे महिना थोडा का होईना सुसह्य करण्याचे पुण्य कमावले आहे हे निश्चित. मी गेल्या आठवड्यातील मंगळवारपासून (ता. ३ मे २०१६) 'सैराट'च्या तिकिटांसाठी प्रयत्न करत होतो. कामाच्या दिवशीदेखील 'सैराट' संपूर्ण पुण्यातल्या चित्रपटगृहांमध्ये (मोजकी कॉस्मो भागांतली चित्रपटगृहे वगळता) सगळ्या खेळांना हाऊसफुल चालू होता. या आठवड्यातदेखील तशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. शेवटी कसेबसे मला माझ्या आवडत्या नीलायमचे दुपारच्या ३;१५ च्या खेळाचे तिकिट मिळाले. नीलायमला अभूतपूर्व अशी गर्दी होती. चित्रपट बहुजन समाजाच्या पार्श्वभूमीचा असल्याने आणि दिग्दर्शक स्वत: त्या समाजाचा असल्याने ९५% जनता बहुजन समाजाची होती. जवळच्या निम्नस्तरीय वसाहतीमधून येणारी जनता मोठ्या प्रमाणावर होती. 'सैराट' मला बघायचाच होता. १ जानेवारी २०१६ (शुक्रवार) या दिवशी मी 'नटसम्राट' पाहिला होता आणि मध्यंतरामध्ये 'सैराट' ची झलक दाखवली होती. भन्नाट चित्रीकरण, मधुर संगीत, रांगडा नायक आणि तिखट तरीही मोहक अशी अर्ची - 'सैराट' बघणे मस्ट होते. 'सैराट' मला आवडला. अगदी मनापासून आवडला. नागराज मंजुळेचं दिग्दर्शन आणि कथा असलेला 'सैराट' प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्यात कमालीचा यशस्वी होतो आणि माझ्या मते हेच 'सैराट'चं यश आहे. सुरुवातीपासून 'सैराट' वास्तवाला धरून चालतो. ग्रामीण महाराष्ट्रात रंगणारे क्रिकेटचे सामने, तिथलं राजकारण, तिथल्या तरुणांच्या जीवन जगण्याच्या संकल्पना, जातीच्या उतरंडीवर आधारलेले समाजजीवन, शाळा-महाविद्यालयात मुला-मुलींना एकमेकांविषयी वाटणारे नैसर्गिक आणि गोड असे आकर्षण, त्यातून जन्माला येणार्या प्रेमकहाण्या, त्यातून निर्माण होणारे सामाजिक प्रश्न, आणि संबंधित कुटुंबांनी अशा कहाण्यांची आपापल्या सामाजिक, आर्थिक, वैचारिक कुवतीनुसार आणि सोयीने लावलेली भली-बुरी तड हे वास्तव आपल्यासाठी नवीन नाही. आपल्या आसपास आपण नेहमीच हे वास्तव बघत असतो. मंजुळेंनी मोठ्या हुशारीने आणि कल्पकतेने हे वास्तव मांडले. कुठेही जातीचा उल्लेख न करता केवळ वास्तववादी चित्रणातून मंजुळेंनी 'सैराट'मध्ये जाती-जातींमधल्या भक्कम भिंती अतिशय प्रगल्भपणे अधोरेखित केल्या. ऊस, कुटुंबाचे आडनाव, त्या कुटुंबाचे राजकारणमधले महत्वाचे स्थान, घरात असणारी आमदारकी, घराच्या भिंतीवर असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी तसबीर, कुटुंबातल्या पुरुष सदस्यांची मग्रुर वागणूक, स्वत:च्या ऐश्वर्याची आणि सत्तेची वागण्या-बोलण्यातून ओसंडून वाहणारी धुंदी अशा कित्येक डिटेल्समधून मंजुळे एका सुस्थापित आणि राज्यकर्त्या असणार्या कुटुंबाची ओळख करून देतात. त्याचबरोबर खोपटासारखे घर, उन्हातान्हात मासेमारी करणारे कुटुंब, चेहऱ्यावरचे दीन भाव यातून मंजुळे शोषित जातीचे आणि त्यांच्या डळमळीत अस्तित्वाचे चित्रण करतात. बहुजन समाजाला कितीतरी दशकांपासून महाराष्ट्रातल्या या सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक दरीचा प्रचंड राग आहे आणि तो रास्तही आहे. 'सैराट'शी ही जनता लगेच कनेक्ट होऊ शकली. 'सैराट'चा सुरुवातीचा एक-सव्वा तास हा धमाल मनोरंजनाचा आहे. नुकतीच महाविद्यालयात जाऊ लागलेली पोरे आणि त्यांचे रेशमी भावविश्व या भागामध्ये दाखवले आहे. कुठल्याही प्रेक्षकाने छातीवर हात ठेवून सांगावं की 'सैराट'मधल्या पर्श्यासारखं किंवा अर्चीसारखं त्यांना त्यांच्या शाळा-महाविद्यालयातल्या दिवसांत वाटलं नाही. असा प्रेक्षक असणं जवळ-पास अशक्य आहे. चित्रपटाचा हा भाग पाहतांना मला माझ्या शाळेतले दिवस आठवत होते. आपल्याला आवडणार्या मुलीला बघण्यासाठी पायपीट करणं, वाट्टेल ते बहाणे शोधणं...हे मी शाळेत असतांना केलं होतं. नंतर महाविद्यालयात गेल्यानंतर त्या मुलीला दुसऱ्या गावात जाऊन भेटून आलो होतो आणि नंतर एक भेट-कार्डदेखील पाठवलं होतं. त्या भेट-कार्डामुळे पुढे रामायण झालं आणि आमची ती एकतर्फी प्रेमकहाणी अस्थिविसर्जनाचा एखादा कलश डुबूक करून नदीत बुडावा तशी जगरहाटीच्या विशाल नदीत बुडाली. नंतर बराच काळ वर बुडबुडे येत राहिले पण तोपर्यंत समोरच्या पार्टीला एका थर्ड पार्टीने टेक ओव्हर करून टाकलं होतं. हे सारं 'सैराट'चा पहिला तास-दीड तास बघतांना आठवत होतं. एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात जर आकर्षण निर्माण झालं तर ते (कितीही चुकीचं असलं किंवा वाटत असलं किंवा त्रासदायक वाटत असलं किंवा खरोखर समस्या निर्माण करणारं असलं तरी) मोहकच वाटतं. ते चोरटे कटाक्ष, एकमेकांना बघण्याची ओढ, चिठ्ठ्या-चपाट्या, मुलाने मुलीच्या मागे फिरणं...नैसर्गिकच असतं हे सगळं. आणि म्हणूनच हजारदा बघूनदेखील ताजं वाटतं, गोड वाटतं. 'सैराट'मध्ये हा भाग रंगला आहे. आजचा मराठी तरुण या भागाशी लगेच कनेक्ट होऊ शकला. नंतरचा जग आणि वास्तव प्रखरपणे समोर आल्यानंतरचा प्रवास वास्तवावर आधारलेला असला तरी श्वास रोखून धरायला लावणारा आहे. प्रेक्षक नकळत नायक-नायिकेच्या बाजूने उभे राहतात. काही प्रसंगांमध्ये डोळ्याच्या कडा हलकेच ओलावतात. शेवट माझ्या मते एका खर्या घटनेवर आधारित आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी बहुधा सातारा की कुठल्याशा जिल्ह्यात अगदी अशीच घटना घडली होती. तो प्रसंग जसाच्या तसा चितारला आहे. अभिनयाच्या बाबतीत सगळेच अव्वल आहेत. पण जीव ओवाळून टाकावा अशी एकच आणि ती म्हणजे अर्ची म्हणजेच अकलूजची रिंकू राजगुरू! काय जबरदस्त अभिनय केलेला आहे या मुलीने म्हणून सांगू! मी तर पंखाच झालो. आणि दिसते पण सुरेख! प्रत्येक फ्रेममध्ये जो अभिनय रिंकूने केलेला आहे त्याला तोड नाही. पाटलाच्या घरची पोरगी कशी असावी? बिनधास्त, तिखट, झणझणीत, ठसकेबाज, देखणी, बेडर...अर्ची अशीच आहे. पाहताक्षणी आवडणारी, हृदयावर राज्य करणारी, जीव लावतांना जीव ओवाळून टाकण्याची तयारी ठेवणारी, प्रेमासाठी जीव घ्यायलादेखील तयार असणारी, धाडसी अशी ही अर्ची रिंकूने अविस्मरणीय करून ठेवलेली आहे. तिची कॅमेराची समज अफलातून आहे. तिचं स्मित कातिल आहे. तिचे डोळे विशाल आणि बोलके आहेत. टपोर्या डोळ्यांमधून ती लज्जा, प्रेम, संताप, लाचारी, खोडसाळपणा लीलया व्यक्त करते. ती सहजपणे बुलेट आणि ट्रेक्टर चालवते. मोठ्या विहिरीत धाडकन उडी टाकते. अवघ्या महाराष्ट्राला अर्चीनं याड लावलंय ते उगीच नाही. अर्ची हा 'सैराट'चा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. परश्या पण काही कमी नाही. परश्या म्हणजेच आकाश ठोसर कोवळा आहे, बुजरा आहे पण धाडसी आहे. एका उच्च घराण्यातल्या मुलीवर प्रेम करण्याची आणि तिच्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी आहे. आकाश ठोसरने नीट समजून अभिनय केला आहे. त्याचे मित्र प्रदीप (तानाजी गलगुंडे), सल्या ऊर्फ़ सलीम (अरबाज शेख) यांनी शंभर नंबरी अभिनय केलेला आहे. अगदी १००% खरे वाटावेत असे हे मित्र यांनी वठवले आहेत. अर्चीच्या मुजोर भावाच्या म्हणजेच प्रिन्सच्या भूमिकेत सूरज पवारने दृष्ट लागण्याजोगे काम केले आहे. राजकारणी घराण्यातला, सत्तेचा, पैशाचा, जमीनदारीचा अशक्य कोटीतला गुंठामंत्री-छाप माज असलेला प्रिंन्स सूरज पवारने पुरेपूर उतरवला आहे. अर्चीचा बाप एक नंबर जमला आहे. नागराज मंजुळेंचा अभिनय दाद देण्यासारखा आहे. अजय-अतुल यांचे संगीत चांगले आहे. गाणी नीट प्रवाहात येतात. झिंगाट गाणे खूप हिट झालेले आहे. चित्रपट्गृहात या गाण्यावर प्रचंड शिट्ट्या होत होत्या आणि बर्याच प्रेक्षकांनी हे गाणे सुरु झाल्यावर आपले पारंपारिक (पतंग, नागीन, गणपती वगैरे शास्त्रोक्त नृत्य) नृत्य करण्याचा मनसोक्त आनंद लुटला. 'सैराट' मधून दिग्दर्शक एका महत्वाच्या सामाजिक विषयाला हात घालतो परंतु त्यावर मत देण्याचं टाळतो. आणि मत देण्याचं टाळलेलं असतांना आजच्या वाढलेल्या जातीभेदावर एक घणाघाती आघात करण्याचं मात्र दिग्दर्शक विसरत नाही. ऑनर किलिंग ही गेल्या वीस वर्षातली संकल्पना. काळ जसा जसा पुढे सरकतो तसे तसे समाजाने अधिकाधिक प्रगल्भ आणि खेळकर होणं अपेक्षित असतं. दुर्दैवाने महाराष्ट्रात हा प्रवास उलट्या दिशेने सुरु आहे. महाराष्ट्राच्या मातीतून ऑनर किलिंगसारख्या हिडीस प्रकारावर चित्रपट निघेल असं कधी स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. दुर्दैवाने तशी वेळ आज येऊन ठेपलेली आहे. बोधामृत, मेसेज, योग्य-अयोग्य वगैरे भानगडीत न पडता जे सत्य आहे ते दिग्दर्शकाने अतिशय समर्थपणे आणि रंजक पद्धतीने समोर ठेवलं आहे. कुणाला काय धडा घ्यायचा तो ज्याने त्याने घ्यावा. अशा प्रकारचे स्फोटक प्रेम करून समस्या निर्माण करायच्या की धाडसाने प्रेम करून समस्यांना तोंड देऊन आपले प्रेम सिद्ध करून दाखवायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. हा निर्णय सर्वस्वी प्रेक्षकांचा. अशा प्रेमाला समाजाने कसे रिएक्ट व्हायचे हे देखील विचारपूर्वक ठरवण्याची नितांत गरज दिग्दर्शक ठासून सांगतो. बर्याच लोकांनी चित्रपटावर आक्षेप घेतले. हा चित्रपट बघून मुले बिघडतील असाही आक्षेप मी ऐकला. या विधानात काही तथ्य आहे असे मला वाटत नाही. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. जे समाजात घडते ते चित्रपटात दाखवतात. आणि चित्रपट नव्हते तेव्हादेखील अशी प्रेमप्रकरणे होतच असत. पालकांच्या मार्गदर्शनाखाली मुले या चित्रपटाचा आस्वाद नक्कीच घेऊ शकतात. त्यांना त्यातून नक्कीच शिकायला मिळेल. आणि शेवटी चित्रपट हे मनोरंजनाचे साधन आहे. त्याचा वाईट परिणाम मुलांवर होणार नाही असे संस्कार मुलांवर असणे आवश्यक आहे. आज घरोघरी टीव्हीवर पाहिले जाणारे कार्यक्रम किती सोवळे असतात हे आपण सगळेच जाणतो. मोबाईल, इंटरनेट, व्हिडिओ गेम्स या माध्यमांमधून मुले काय बघतात आणि शिकतात आणि यावर पालकांचे किती नियंत्रण आहे हादेखील एक प्रश्न आहेच. अर्थात कुठले चित्रपट बघायचे आणि कुठले टाळायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे तितकेच खरे! मला मात्र एक गंभीर विषय रंजक पद्धतीने हाताळणारा सशक्त चित्रपट म्हणून 'सैराट'चे कौतुक वाटते. अगदी काहीच नाही तर आपापल्या मनातली रेशमी आठवणीत जपून ठेवलेली अर्ची किंवा आपापल्या मनातला सुगंधी कुपीत जपून ठेवलेला परश्या पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी तरी 'सैराट' बघा असे सांगावेसे वाटते. अर्चीच्या डोळ्यातील मस्ती पाहून हा शेर मनात रुंजी घालतोय: मैं तेरी मस्त निगाही का भरम रख लुंगा होश आया भी तो कह दुंगा मुझे होश नही ये अलग बात हैं साकी के मुझे होश नही वरना मैं कुछ भी हूं एहसान फरामोश नही

वाचने 24794 वाचनखूण प्रतिक्रिया 106

In reply to by प्रचेतस

परीक्षण आवडलं. फक्त- ''चित्रपट बहुजन समाजाच्या पार्श्वभूमीचा असल्याने आणि दिग्दर्शक स्वत: त्या समाजाचा असल्याने ९५% जनता बहुजन समाजाची होती. जवळच्या निम्नस्तरीय वसाहतीमधून येणारी जनता मोठ्या प्रमाणावर होती'' आवडलं नाही. अशी श्रोत्यांची विभागणी वाचून आश्चर्य वाटलं, विचार करण्याची कमाल वाटली, सुशिक्षित माणूस किती हळवा, संवेदनशील, झालाय त्याचा उत्तम नमूना वाटला. पण याही मताचा मी आदर करतो. पुलेशु. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सूड Mon, 05/09/2016 - 15:50
श्रोत्यांची विभागणी
गायन, भाषण ऐकायला येतात ते श्रोते; पाहायला येतात ते प्रेक्षक

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समीरसूर Mon, 05/09/2016 - 15:51
अशी प्रेक्षकांची विभागणी व्हावी हे तितकसं रुचणारं नाही हे खरय पण ते तसं बर्यापैकी प्रमाणात आहे हे ही वास्तव आहेच. 'टाईमपास'चा क्राऊड वेगळा, 'लोकमान्य'चा वेगळा, 'बालगंधर्व'चा वेगळा, 'टाईमपास २' चा वेगळा...हे नेहमीच होत असते. मी 'कट्यार' देखील नीलायमला पाहिला होता. त्यावेळेसचा क्राऊड आणि 'सैराट'चा क्राऊड यात जमीन-आसमानचा फरक होता. आणि 'आपला माणूस' म्हणून नागराजविषयी फेसबुकवर पोस्ट्सदेखील पाहिले. 'सैराट'बद्दल नाके मुरडणारे लोक्स निराळे आहेत. हा फरक निश्चितच आहे. आणि तो फरक लगेच जाणवतो इतका निश्चितच असतो. आणि त्यात चुकीचे काहीच नाही. एवढा मोठा व्ह्युअर बेस असल्यामुळे 'सैराट' इतका गाजतोय. अगदी खेडोपाडी देखील! नाहीतर मराठी चित्रपट फार क़्वचितच खेड्यांमध्ये चालतात.

In reply to by समीरसूर

सस्नेह Mon, 05/09/2016 - 15:56
गर्दीवर एक नजर टाकली तरी 'मॉबॅलिटी' चा अंदाज येतो. नाटकाचा प्रेक्षक आणि सिनेमाचा प्रेक्षक नुसत्या नजर टाकण्यावरून लक्ष्क्षत येतो, तसंच कोणत्या सामाजिक वर्गातला प्रक्षक हे लक्षात येणं साहजिक आहे.

In reply to by समीरसूर

चित्रपट गृहात प्रेक्षकांची आसन क्षमता 'अमुक अमुक' लोकांची असेल तर दिग्दर्शकाच्या जातीचे प्रेक्षक १०० लोक होते, चित्रपटात पाटील आहे म्हणून पाटलांचे प्रतिनित्व करणा-या प्रेक्षकांची संख्या १०० होती, कोळ्यांचा नायक म्हणून तरुण मुले, पालक, आणि कोळीनीची संख्या १०० होती, सल्ल्या फिटर होता म्हणून फिटर पोरं ४५ होती, सल्ल्याची आई बांगड़या भरणारी होती म्हणून कासार समाज प्रेक्षकांची संख्या १२५ होती, लंगड़या प्रेक्षकांची संख्या १०० होती, अंदाजे १२५ प्रिंसचे प्रतिनिधी होते, आणि स्वत:ची जात विसरुन नीव्वळ चित्रपट बघायला आलेल्यांची संख्या २५ होती, एवढेच आता वाचायचं राहिलं आहे. असो, मी थांबतो. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समीरसूर Mon, 05/09/2016 - 16:14
:-) प्रेक्षकांचा एक ढोबळ कल कळतो. अर्थात इतके डिटेल्स कळत नाहीत. पण असे असते हे नक्की. हे मी स्वत: कित्येकदा अनुभवले आहे. आपल्या समाजाची जडण-घडणच जाती आणि समूहधिष्ठीत आहे त्याला काय करणार...

In reply to by समीरसूर

मला चित्रपट खूप आवडला आहे आणि मिपा परीक्षणही आवडली आहेत, अजुन एक दोन परिक्षण आणि नवी मतंही वाचायला आवडतील, आपलंही चित्रपट परीक्षण आवडलं, बाकी समाज अधिक जातीनिष्ठ होत चालला आहे त्याच्याशी सहमत. पण मोकळेपणाने जे आवडलं नाही, ते लिहिलं. बाकी, बोला अजुन काय नवं विशेष ? :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समीरसूर Tue, 05/10/2016 - 12:04
धन्यवाद, डॉक्टरसाहेब. हम्म, आवडत मलादेखील नाही पण काय करणार? तेच आजचं कडूजार वास्तव आहे. खाली एका प्रतिक्रियेत टाकलेल्या एका रिंकूच्या संदर्भातल्या पोस्टवरून जात-समूह भावना किती घट्ट आहे हे दिसून येते. आणि असे बरेच पोस्टस मी पाहिलेले आहेत. असो. बाकी चालू आहे निवांत. 'सैराट' पुन्हा बघावा असं वाटतंय. बघू कधी जमतंय. अर्चीची आठवण येतेय परत. ;-)

In reply to by समीरसूर

चित्रपट गृहात प्रेक्षकांची आसन क्षमता 'अमुक अमुक' लोकांची असेल तर दिग्दर्शकाच्या जातीचे प्रेक्षक १०० लोक होते, चित्रपटात पाटील आहे म्हणून पाटलांचे प्रतिनित्व करणा-या प्रेक्षकांची संख्या १०० होती, कोळ्यांचा नायक म्हणून तरुण मुले, पालक, आणि कोळीनीची संख्या १०० होती, सल्ल्या फिटर होता म्हणून फिटर पोरं ४५ होती, सल्ल्याची आई बांगड़या भरणारी होती म्हणून कासार समाज प्रेक्षकांची संख्या १२५ होती, लंगड़या प्रेक्षकांची संख्या १०० होती, अंदाजे १२५ प्रिंसचे प्रतिनिधी होते, आणि स्वत:ची जात विसरुन नीव्वळ चित्रपट बघायला आलेल्यांची संख्या २५ होती, एवढेच आता वाचायचं राहिलं आहे. असो, मी थांबतो. :) -दिलीप बिरुटे

In reply to by समीरसूर

नीलमोहर Mon, 05/09/2016 - 16:08
प्रेक्षकांची विभागणी हा प्रकार असतोच आणि त्यात चुकीचे काही नसावे, ज्याची त्याची आवड शेवटी . बालगंधर्व, काकस्पर्श इ.चा प्रेक्षकवर्ग सैराटकडे वळेल कदाचित, पण व्हाइसवर्सा होणे कठीण असावे.

In reply to by सूड

समीरसूर Mon, 05/09/2016 - 16:20
असे बरेच पोस्ट्स मी नेहमी पाहतो. त्यात मला फारसे चुकीचे काही वाटत नाही. ही अशी विभागणी हे कालचे, आजचे, आणि उद्याचे वास्तव आहेच. अशी विभागणी करूनच तर राजकारणी आपला डाव साधतात हे भारतीय जनतेला नवीन आहे काय? :-) रिंकू राजगुरू ही बौद्ध समूहाची आहे हे नाहीतर जनतेला कसे कळले? गुगल वर रिंकू राजगुरू सर्च करतांना 'रिंकू राजगुरू कास्ट' असे ऑटो-सजेशन येते. ते पाहून मला आश्चर्य वाटले होते पण हे आपले वास्तव आहे. हम उसे नकार नाही सकते.....

In reply to by सूड

तर्राट जोकर Mon, 05/09/2016 - 16:26
हे प्रक्रण तर इतकं फेसपाम झालं की बास. अरे इथंही जात शोधून काढलीच? काय उपयोग त्या मंजुळेच्या पराक्रमाचा? सब गोबर कर दियेस.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब़जरबट्टू Mon, 05/09/2016 - 16:01
९५% जनता बहुजन समाजाची होती. ह्या वाक्यावर तर जोरदार शिट्ट्या आहे राव. काय नजर आहे...

सिरुसेरि Mon, 05/09/2016 - 15:14
"अर्चीचा बाप एक नंबर जमला आहे." --------- पुढे कधी जर 'सैराट'चा हिंदीत रिमेक झाला तर या रोलमध्ये प्रकाशराज शोभुन दिसेल .

In reply to by अभ्या..

प्रचेतस Mon, 05/09/2016 - 15:33
ह्या इमेल क्रांतीनं आर्चिजला संपवलं. आता व्हाटसअपच्या जमान्यात ग्रीटींग्सकार्ड औषधाला देखील मिळत नाही (कार्पोरेट्सचा अपवाद सोडून)

मराठी कथालेखक Mon, 05/09/2016 - 15:56
पहिली :
चित्रपट बहुजन समाजाच्या पार्श्वभूमीचा असल्याने आणि दिग्दर्शक स्वत: त्या समाजाचा असल्याने ९५% जनता बहुजन समाजाची होती.
हे कसं काय कळालं हो ? फक्त चेहरा बघूनच समजतं ? दुसरी अर्धी :) अनेक समीक्षणातून 'रिंकू राजगुरु' ही सुंदर, सुरेख, गोड ई ई असल्याचे म्हंटले आहे, मला तरी घरातील टीवीच्या (आधी १९" आणि आता ३२") स्क्रीनवर ती सुंदर वगैरे वाटली नाही, मोठ्या पडद्यावर वेगळी दिसते का हो ?

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर Mon, 05/09/2016 - 16:02
रुढार्थाने ती सुंदर नाही. तसेच प्रत्येक सीनमधे वेगळी दिसते. बट शी हॅज गॉट द एक्स फॅक्टर. तिच्या डोळ्यांत तिचे सर्व सौंदर्य एकवटले आहे.

In reply to by तर्राट जोकर

समीरसूर Mon, 05/09/2016 - 16:23
अगदी. ती सुंदर आहे असे नाही म्हणवणार पण उसमे कुछ बात जरूर है...अन्यथा तिने असं वेड नसतं लावलं. :-) ते संपूर्ण चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल बहुधा...मला तर लैइच आवडली.

In reply to by मराठी कथालेखक

समीरसूर Mon, 05/09/2016 - 16:28
>> हे कसं काय कळालं हो ? फक्त चेहरा बघूनच समजतं ? एवढं कळतं की राव आता. खेड्यात राहिलो-वाढलो. डोक्यावर केसांनी गद्दारी केलीये. चार लोकांशी बोललोय. चार जागा बघितल्या आहेत. थोडं माफक का असेना कळतं. :-) सैराटमध्ये नाही का, हैदराबादच्या हॉटेल मेनेजरला ही मराठी पोरं पळून आलेली आहेत हे न सांगताच कळतं आणि तो रूम नाही म्हणून सांगतो...तसंच थोडं-फार... :-) बाकी रिंकूला तुम्ही बघून तुम्हीच ठरवा. सांगून कसं कळणार? :-)

In reply to by समीरसूर

मराठी कथालेखक Mon, 05/09/2016 - 17:33
अडगूलं-मडगूल बघितला का हो तुम्ही ? नसेल बघितला तर खरंच बघा. तसाही सैराट , फॅड्री ई चित्रपट जस भाष्य करतात तसंच काहीस (विषय थोडा वेगळा आहे) भाष्यं मस्त खुसखुशीत ढंगाने हा चित्रपट करतो. बाकी सुबोध भावे अप्रतिम, गिरिजा ओकचा अभिनय पण झकास.

सस्नेह Mon, 05/09/2016 - 16:02
मला तरी घरातील टीवीच्या (आधी १९" आणि आता ३२") स्क्रीनवर ती सुंदर वगैरे वाटली नाही, मोठ्या पडद्यावर वेगळी दिसते का हो ?
तुम्हाला त्यांचे मत पटत नसेल तर तुम्हीच बघून ठरवा ना ! शिवाय सुंदर इ. ची व्याख्या सापेक्ष आहे. तुम्हाला सुंदर नाही वाटली तर त्यांना वाटू नये असे थोडेच आहे ?

In reply to by सस्नेह

मराठी कथालेखक Mon, 05/09/2016 - 16:17
तुम्हाला त्यांचे मत पटत नसेल तर तुम्हीच बघून ठरवा ना !
मला वाटतंय मी शंका विचारली होती. आणि काही कलाकारांच्या बाबतीत टीवी स्क्रीन व मोठा पडदा यांवर बराच फरक जाणवतो.
शिवाय सुंदर इ. ची व्याख्या सापेक्ष आहे. तुम्हाला सुंदर नाही वाटली तर त्यांना वाटू नये असे थोडेच आहे ?
असं म्हंटल होतं का मी ? उगाच चिडून प्रतिक्रिया देण्यात काय अर्थ आहे ? असो.

In reply to by मराठी कथालेखक

सस्नेह Mon, 05/09/2016 - 17:38
उगाच चिडून प्रतिक्रिया देण्यात काय अर्थ आहे ?
:) मी चिडून प्रतिक्रिया दिली असं तुम्हाला का वाटलं ?

In reply to by मराठी कथालेखक

समीरसूर Mon, 05/09/2016 - 16:34
जाऊ द्या हो. मत आपण अनुभव घेऊन बनवायचं असतं. तुम्ही बघा आणि ठरवा गर्दी कशी आहे आणि रिंकू कशी आहे ते...मी चुकलो असेल तर मग सांगा...एवढं काय मनावर घेताय. :-)

In reply to by समीरसूर

समीरसूर Mon, 05/09/2016 - 16:37
माझा वरील प्रतिसाद मराठी कथालेखक यांच्यासाठी आहे. स्नेहांकिताजींचा प्रतिसाद खरंच समतोल असतो. त्यामुळे नको त्या विषयावरून कशाला उगीच भांडण. रिंकू कशी ही असली तरी आपल्याला काय फरक पडतो...बरोबर ना?

In reply to by समीरसूर

मराठी कथालेखक Mon, 05/09/2016 - 17:27
माझा प्रश्न सरळ होता... तुम्हाला sarcastic वाटला ला ? :) मला खरंच असंच विचारायचं होतं की या नायिकेच्या दिसण्याबाबत टीवी आणि पडद्यात मोठा फरक वाटतो का ? (काही कलाकारांबाबत तसा जाणवतो असं मला वाटतं)

गणेशा Mon, 05/09/2016 - 16:14
वा वा .. जे लिहिले आहे, ते तंतोतंत माझे मत आहे असेच वाटले.. अर्ची मस्तच .. पर्श्या पण ... बर्याच दिवसानी तुमचे परिक्षणवपाहिले आणि काम बाजुला ठेवुन वाचलेच .. लिहित रहा... वाचत आहे ...

गणेशा Mon, 05/09/2016 - 16:17
बाकी सैराट झालं जी गाणज्खुप आवडले .. कितिदा तरी मोबाईल मध्ये ऐकले.. आत गं बया का बावरल पण मस्त .. पण ते जास्त कोठे टीव्ही ला दिसत नाही.. संगित .. गाण्याचे स्वर .. मस्त.. मस्त म्हणजे माझ्या भाषेतील.. म्हणुन जास्त घर करुन गेले ..

In reply to by स्पा

दिग्दर्शक एंथोनी रूसो कोणत्या जातीचा आहे तेवढा कळवा, ते पाहुन औरंगाबादची पब्लिक थेट्रात घेऊन जाईन म्हणतो... ;) -दिलीप बिरुटे

In reply to by अजया

मुक्त विहारि Mon, 05/09/2016 - 21:55
हे आमच्या बाबतीत बर्‍याच वेळा घडते. क्लर्क, मोहबते, फरिश्ते सारखी परीक्षणे पण आवडली होती.

In reply to by सस्नेह

अजया Tue, 05/10/2016 - 18:18
चित्रपट संगीत चित्रं या स्वानंदासाठी घ्यायच्या गोष्टी आहेत.माझे मत दुसर्याला पटवून ते आवडवुन घेणे हे कलेबाबत कसे होऊ शकते? म्हणून माझे मत माझ्यापाशी. त्याच्या कारणांचा चिवडा करायची अजिबात इच्छा नाही! माझे मत कोहिनूरच मग;)

In reply to by मुक्त विहारि

खटपट्या Mon, 05/09/2016 - 22:25
आधी सैराटसारखी ऐकीव माहीती कानावर तर येउदे की... हवा बनली पायजे ना. तरी पन मला नाय जमनार वो. तुमी लीवा. मी पन विंग्रजी पीच्चर चा फॅन हायेच. :)

In reply to by खटपट्या

मुक्त विहारि Tue, 05/10/2016 - 13:20
....किंवा एखाद्या कलाकृतीचे रसग्रहण, हा माझा प्रांत नाही....त्यामुळे आपला पास.... सध्या हेरॉल्ड लॉइडचा अभ्यास सुरु आहे. चॅप्लिन आणि हेरॉल्ड यांची नकळत तुलना होत आहे. भारतात म्हणावा तसा हेरॉल्डला प्रतिसाद मिळाला नाही. कधी कंटाळा आला तर हेरॉल्ड लॉइडचे "सेफ्टी लास्ट" आणि "व्हाय वरी", हे सिनेमे मात्र आवर्जून बघा.

समीर बर्याच दिवसानी तुझं मस्त परीक्षण वाचायला मिळालं... चित्रपटाचे प्रोमो आणि गाणी अतिशय म्हणजे अतिशय आवडली आहेत...पण अजुन चित्रपट पहायला वेळ नाही मिळाला... पण लवकरात लवकर पाहीनच... मलासुद्धा अर्ची अतिशय सुन्दर वाटली....एक मस्त गावरान सौदर्य आहे तिच्यात..बोलके डोळे हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट....आणि आकाश ठोसर पण एकदम मस्त....

In reply to by स्मिता श्रीपाद

समीरसूर Tue, 05/10/2016 - 12:10
बरोब्बर! तिच्या डोळ्यात एक अशी निराळीच हवीहवीशी वाटणारी, नाजूक बेफिकीरी आणि मग्रुरी आहे. परश्या पण मस्त आहे. गाणं चालू असतांना शेतात स्लो मोशनमध्ये तो जो डान्स करतो तो फारच सही वाटतो. त्याचा कोवळेपणा, भांबावलेपणा, नंतरचा टिपीकल पुरुषी अहंकार हे सगळं आकाशने मस्त दाखवले आहे. येत्या वीकेंडला पाहून टाका बरं सैराट! महत्वाची कामं अशी वार्यावर सोडू नये...

चिगो Tue, 05/10/2016 - 12:11
मी 'सैराट' पाहीला नाहीये. कदाचित टिव्हीवर येईल तेव्हाच बघता येईल, किंवा Official CD आल्यावर.. पण रिंकूनं महाराष्ट्राला वेड का लावलंय, हे कळलं जेव्हा 'येड लागलं' चा व्हिडीयो पाहीला युट्युबवर तेव्हा.. काय जबरा अ‍भिनय करते पोरगी!! व्वा !! त्या गाण्यात जेव्हा परश्या विहरीत उडी टाकून पायर्‍यांवर तिला क्रॉस करतो, तेव्हा आर्ची त्याला मागून हलकेच वेडावते. मानेच्या आणि डोळ्यांच्या अगदी नाजूकश्या हालचालीतून रिंकूनी तो वेडावण्याचा आणि अ‍ॅप्रिशीएट करण्याचा अभिनय केलाय. एवढया नाजूकपणे की मला प्रतिसाद देण्यापूर्वी पुन्हा एकदा व्हिडीओ बघावा लागला कि मला भास नाही झालाय.. मानलं ह्या पोरीला.. डोक्यात हवा न जाऊ देता जर असाच अभिनय करत राहिली तर ही पोर मोठ्यामोठ्यांना पाणी पाजणार, हे नक्की..

In reply to by चिगो

धनावडे Tue, 05/10/2016 - 12:47
आता ग बया ह्याचा पण व्हिडीवो बघा वेड लावते पोर आणि त्यायला वर्गाच्या बाहेरचा सीन तर अभ्या भाऊ म्हणतात तस हजार टेक घेतले तरी जमणार नाय

In reply to by चिगो

आर्चीचा अभिनय, लंबर एकच झाला आहे. संपूर्ण चित्रपट तिच्याच भोवती पिंगा घालतो, बाकीची पात्रं कथानकाला हवी असतात म्हणुन दिग्दर्शकाला टाकावी लागली आहेत, असे वाटावे इतकी ती चित्रपटात भाव मारते. खरं सांगू का, रिंकु राजगुरु यांनी आता चित्रपटात काम करु नये. कारण आपल्या डोक्यात सैराट शिवाय दुसरं काही उमटू शकत नाही, समीक्षक पुढे सतत म्हणत राहतील की सैराट चित्रपटात जो अभिनय झाला आहे, तो नव्या चित्रपटात जमलाच नाही. नागराज मंजुळेला नेहमीच नव्याचा सोस असतो, मला वाटत नाही तिला अजून संधी मिळेल आणि मिळाली तरी ती तितकी यशस्वी होईल. -दिलीप बिरुटे

In reply to by तर्राट जोकर

मुक्त विहारि Tue, 05/10/2016 - 13:37
अच्छा म्हणजे आधी डॉ. आणि मग अभिनेत्री की आधी अभिनेत्री आणि मग डॉ. डॉ.श्रीराम लागू, डॉ.काशीनाथ घाणेकर, डॉ.गिरीश ओक हे पण डॉक्टरची पदवी घेवून मग अभिनेते झालेच की. हे सिनेमाचे जगत फार वेगळे, आमची बॉबी डिंपल पण नंतर सागरमध्ये आलीच की.....

In reply to by तर्राट जोकर

मुक्त विहारि Tue, 05/10/2016 - 17:31
भले भले गठाळतात.... "कबूतर का बदला" उर्फ "मैं ने प्यार किया" मधली भाग्यश्री पण नंतर सिनेमांत आलीच. गेला बाजार, धक धक फेम माधूरी दिक्षित-नेने पण इथे आलीच. जावू दे हो..... ह्या कलाकारांवरून वाद-विवाद करण्यात काही अर्थ नाही.

In reply to by तर्राट जोकर

प्रा.डॉ. व्हायचंय का ? अरे वा छान. तिचं एम. ए. होईपर्यन्त आपल्या काही फ्यान क्लब सदस्यांच्या गोवऱ्या पुढे गेल्या असतील ! नववी नंतर पीएच. डी. करता येते का ? चौकशी करा भो ! ;) ( अवांतर : हुशार, थोर, गंभीर, तज्ञ लोकांनी आमच्या प्रतिसादापासून दूर राहावे, ही नम्र विनंती) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Tue, 05/10/2016 - 14:38
अवांतर : हुशार, थोर, गंभीर, तज्ञ लोकांनी आमच्या प्रतिसादापासून दूर राहावे, ही नम्र विनंती
उदाह्रणार्थ?

सैराट चित्रपटावर कोणी परीक्षण लिहायचं असेल तर प्लीज लिहा, उगा संकोच करू नका. फूल हवा हाय आपल्या सैराटची. -दिलीप बिरुटे (मिपा सैराट मित्र मंडळ सदस्य) :)

In reply to by सस्नेह

चित्रपट पाहुन काही लिहिलं तर कसं त्याला एक वजन येतं. चित्रपट कुठे भिडला, छप्पर कुठे डोक्याला लागलं, आर्ची ज्या विहिरीत पोहोली ती विहीर कोरडी का पडली, परशाच्या अंगावर टी शर्ट भारी होते, महाग दिसत होते, वडील एका छोट्या बोटीचे मालक होते तर परशा हजार दोन हजाराचा मोबाइल का घेत नै ? आर्ची ट्र्याक्टर कोणत्या गेर मधे चालवते ? भाऊ दोन तीन वर्षांनी बहिनीला भेटायला येतो, त्याला बहिनीबद्दल प्रेम वाटलं नाही, त्या कारणाचा एक मानशास्रीय अभ्यास करता येतो, उत्तम चर्चा करता येते म्हणून चित्रपट पाहुन चित्रपटाबद्दल बोलावं अशी आमच्या फ्यान क्लबची मागणी आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by सस्नेह

सस्नेह Fri, 05/13/2016 - 18:07
पाहिला बाॅ आज सैराट. भल्याभल्यांनी परीक्षण सही लिहिलय तेवढं काही जमणार नाही पण माझं मत म्हणून चार ओळी खरडाव्या वाटल्या खर्या ! लिहावं का ?

In reply to by सूड

नाखु Mon, 05/16/2016 - 17:07
बघीतला इकडे वाढविला (उंचावला) तितका मोठा वाटला नाही आणि अगदी चिल्लरीत काढण्याइतका सानाही वाटला नाही. शेवट काहीसा डोक्यात ठेऊन केलेल्या चित्रपट (स्वातंत्र्य व तडजोडी) दिसल्या तरी संगीताबाबत उजवा आहे नि:संशय अगदी माझ्या ८ वर्षाच्या मुलीला गाणी आवडली (थोरल्याला कट्यारची गाणी आवडली आणि तोंडपाठ झालीत). हिरोचे कपडे गरीबीतले नाहीत (फक्त स्वभावाने गरीब हाये). जे दाखावायचं आहे ते बिन्धास आणि खोट्या खोट्या लोकेशनवर दाखविले नाही ही मोठ्ठी जमेची बाजू.अभ्याने साम्गीतलेल्या द्रुश्य परिणाम अस्सल ग्रामीण बाजाबाबत सहमती. बाकी मी माझ्या मगदूरानुसार लिहिले.कुणी फार मनाला लावून घेऊ नै. पिटातला नाखु

In reply to by सस्नेह

मुक्त विहारि Tue, 05/10/2016 - 17:16
न चालायला काय झाले? लोकं सौदी अरेबियाला किंवा गल्फला न जाता पण, तो विभाग कसा आहे, हे सांगतातच ना? ते जावू दे, आमच्या गांधी बाबांची पुस्तके किंवा चर्चिल वरील, हिटलरवरील लेख न वाचता पण त्यांच्याविषयी पोट-तिडिकेने लिहितातच ना? ते पण राहू दे, फार कमी लोक चंद्रावर गेले आहेत, तरी पण मानव चंद्रावर गेलाच नाही, ह्यावर पण उहापोह करतातच. मग तुम्हीच कशाला मागे हटत आहात?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 14:51
जौ द्या हो बिरुटेसर, लोक आता गेमऑफथ्रोन च्या त्या सिंहासनावरची सगळी हत्यारं नै तर सिविल वॉरमधी वापरलेल्या सगळ्या सुप्पर पावर घेऊन मागं लागतील... =))

लालगरूड Fri, 05/13/2016 - 18:49
पिंपरी : पडत्या काळात कष्ट करून साथ दिली; मात्र ज्यांच्यामुळे यश मिळाले त्यांनाच नागराज मंजुळे यांनी दूर लोटले, अशी कैफियत नागनाथ मंजुळे यांच्या पत्नी सुनीता यांनी व्यक्त केली आहे. सध्या चिंचवड येथील रामनगर झोपडपट्टीत वडिलांच्या घरी राहत असून, धुणी- भांडी करून उदरनिर्वाह करीत आहे. मला बाकी काही नको. केवळ पत्नी म्हणून त्यांनी पुन्हा नांदवावे, असे सुनीता यांचे मागणे आहे. याबाबत नागनाथ मंजुळे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. चिंचवड येथील रामनगर झोपडपट्टीतील राहत्या घरी ‘लोकमत’शी बोलताना सुनीता म्हणाल्या, ‘‘१९९७मध्ये नागराज यांच्याबरोबर विवाह झाला. विवाहानंतरही त्यांचे शिक्षण सुरू होते. मला शिकायचे आहे, काही अपेक्षा बाळगू नको, मूलही नको, असे सांगून त्यांनी माझ्याबरोबर १५ वर्षे काढली. नागराज, भारत, शेषराज, भूषण ही चार भावंडे. त्यातील शेषराज, भूषण अगदी छोटे. त्यांना आईच्या मायेने वाढवले. शिक्षण झाले, यश मिळत गेले, तशी त्यांची माझ्याबरोबर वागण्याची पद्धत बदलली. पत्नीचा दर्जा न देता, तू अल्पशिक्षित आहेस, तुझ्या आई- वडिलांकडे जा, असे म्हणू लागले. त्यांचे वडील मला मुलीसारखे सांभाळायचे. त्यांचे २००७ मध्ये निधन झाले. त्यानंतर नागराज यांच्याकडून वाईट वागणूक मिळू लागली. २०११ मध्ये त्यांच्या ‘पिस्तुल्या’ या लघुपटाला राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. त्या वेळी मला एकटीला घरात सोडून, ते पुरस्कार घेण्यास गेले. ही गोष्ट माझ्या मनाला क्लेशदायक होती. पत्नी म्हणून ज्या घरात आले, त्या घरात मोलकरणीची वागणूक माझ्या वाट्याला आली. पत्नीचा दर्जा कधीच मिळाला नाही. इतकी वर्षे मी त्यांच्याकडे नांदले. सारे काही सोसले. बिकट परिस्थितीत साथ दिली. आता त्यांनी मला पत्नी म्हणून स्वीकारावे, एवढीही अपेक्षा मी का बाळगू नये? चार वर्षांपासून मी रामनगरला आई-वडिलांकडे राहत आहे. धुणी-भांडी अशी कामे करून जगत आहे. आई-वडील आता वृद्धापकाळाचे जीवन जगत आहेत. त्यांची साथ किती दिवस मिळणार, त्यानंतर पुढे काय, असा प्रश्न मला सतावत आहे. घरची परिस्थिती बिकट असताना पडत्या काळात अर्धांगिनी म्हणून साथ दिली. कसलीही अपेक्षा बाळगली नाही. हालअपेष्टा सोसल्या. त्यांनी मोठे व्हावे, यश मिळवावे, यासाठी मनाला, इच्छा-आकांक्षांना मुरड घातली. ज्यांनी जिवाचे रान केले, त्यांचाच विसर नावलौकिक मिळविलेल्या नागराज मंजुळे यांना पडला आहे. त्यांच्या सैराट चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या दोन आठवड्यांत ४० कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडला. त्यातील काही तरी मिळावे, ही अपेक्षा नाही, तर ज्यांचा खऱ्या अर्थाने त्यांच्या यशात वाटा आहे, त्यांनाच यशाच्या शिखरावर आरूढ झाल्यानंतर दूर लोटावे, हे मनाला क्लेषदायक वाटते, अशी कैफियत त्यांनी मांडली. > सैराट चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे नागराज मंजुळे यांचे नाव चर्चेत आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील मुलाखती आणि अन्य कार्यक्रमात ते जेव्हा मनोगत व्यक्त करतात, त्या वेळी यशात कोणाचा वाटा आहे, हे सांगताना त्यांना माझ्याबद्दल काहीच सांगावेसे वाटत नाही. नागराज मंजुळे या नावाला जेव्हा काहीच वलय नव्हते, तेव्हा त्यांना ज्यांनी साथ दिली. त्यांच्याबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करू शकत नाहीत, याबद्दल खेद वाटतो. - सुनीता मंजुळे > नवऱ्याने सोडले, आम्ही कसे टाकणार? नागराज मंजुळे यांनी सुनीताला घराबाहेर काढले. आई, वडील या नात्याने आम्हाला तिला सांभाळण्याची वेळ आली. चार मुली; त्यातील सुनीता ही दुसऱ्या क्रमांकाची मुलगी. तिचा विवाह नागराज मंजुळे यांच्याबरोबर लावून दिला. सोलापूरला जेऊरला ती गेली. पुढे तिच्या आयुष्यात असे काही घडेल, असे वाटले नव्हते. नागराज यांनी कृतघ्नता दाखवली. समाजात दाखवायचा चेहरा एक आणि प्रत्यक्ष वागणूक वेगळीच याचा प्रत्यय आला. उशिरा का होईना, जाणीव व्हावी, एवढीच अपेक्षा आहे

In reply to by लालगरूड

समीरसूर Mon, 05/16/2016 - 11:52
सैराट इतका हिट्ट झाल्यावर आणि त्याची उड्डाणे पार ५५ कोटींच्या पल्याड गेल्यावरच हा वाद कसा काय निघाला? अचानक इतका पैसा येतोय म्हणून थोडे आपलेदेखील हात ओले करून घ्यावेत असा विचार तर नाही ना यामागे? आणि एनीवे, तो त्यांचा पर्सनल मामला आहे. नट-नट्या, सिनेमावाले वैयक्तिक आयुष्यात काय करतात, कुठे जातात हे जाणून घेण्याइतकं महत्व त्यांना द्यायची गरज नाही. मागे एकाने मला सांगीतलं की मलैकाचा घटस्फोट होणार आहे म्हणून. म्हटलं होऊ दे...आपल्याला काय करायचंय. असल्या बातम्या चवीने वाचून आपला वेळ का व्यर्थ दवडा?

In reply to by लालगरूड

धनावडे Mon, 05/16/2016 - 19:50
लोकमतमध्येच दोन दिवसानंतर बातमी होती की घटस्पोट कायदेशीर आणि परस्पर संमतीने पोटगीची ७ लाख रुपये घेउन झाला आहे