मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ज्ञानदेवे रचिला पाया, ............ तुका झालासे कळस!

वारकरि रशियात · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस! आपल्यापैकी बर्याच जणाना आपल्या होम पेज वरचे हे दोन चरण माहित असणारच ! आणि ते एखाद्या अभन्गातून उद्ध्रुत केले आहेत हेही माहित असणारच ! फक्त कदाचित हे अवगत नसेल की हे दोन चरण त्या अभन्गात सलग (ओळीने) नसून येथे मध्यमपदलोपी समास (!) झालेला आहे. तसेच हा अभन्ग कोणाचा हेही फार कमी जणाना अवगत असावे. तेव्हा थोडे या सन्दर्भातः सम्पूर्ण अभन्ग असा - सन्त क्रुपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किन्कर तेणे विस्तरिले आवार जनी जनार्दन एकनाथ स्तम्भ दिला भागवत तुका झालासे कळस भजन करा सावकाश बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा. या अभन्गाच्या कर्त्या साध्वी बहिणाबाई यान्चे चरित्र तसे अज्ञातच! स्त्री सन्त मालिकेतील अग्रेसर मुक्ताई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मिराबाई यान्चेसह बहिणाबाईन्चे स्थान मानावे लागेल. गोदावरीच्या उत्तरेस घ्रुश्णेश्वराच्या पश्चिमेस बारापाड्याचे जवळ 'शेऊर' या गावी या साध्वीचा जन्म झाला. त्याच गावातील पाठक कुटुम्बात त्यान्चा विवाह झाला. घरची गरीबी, शि़क्शणाचा अभाव, तरीही समाधानी वॄत्ती. सन्तव्रुत्तीला साजेशी पाण्डुरन्गाची ओढ मनात होतीच. अखन्ड नामस्मरण चालू असे. शेतात काम करित असतानाही हा भक्तिभाव अभन्गान्चे रूपाने त्यान्च्या मुखातून बाहेर पडे. पूर्वीच्या जन्मात त्यान्चे हातून उच्च कोटीची साधना घडली असली पाहीजे. म्हणूनच या जन्मी कोणाचाही ताद्रूश उपदेश लाभलेला नसतानाही त्या श्रेश्ट भक्त झाल्या. त्यान्चे वर्णन करताना (गेल्या शतकातील एक श्रेश्ट सन्त, सन्तचरित्रकार आणि 'श्री गजानन विजय'कर्ते) सन्तकवी दासगणू महाराज लिहितात .. पहा केवढा अधिकार .. रुणि तिचा परमेश्वर ... असे सान्गतात की त्याना त्यान्च्या पूर्वीच्या तेरा जन्मान्चे स्मरण होते. या साध्वीच्या चरित्रातील एकच प्रसन्ग ज्ञात आहे तो असा: नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पन्ढरीला निघालेल्या असताना त्याना अचानक थन्डी वाजून ताप भरला.परन्तू पाण्डुरन्गाच्या भेटीची केवधी तळमळ ! त्यानी अन्गावरच्या फाटक्या घोन्गडीला विनन्ती केली, " ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवधी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगिन." ही घोन्गडी त्यानी एका झाडावर थेवली व त्या वारीस निघून गेल्या. त्या सुखरूप परत येईपर्यन्त ते झाड हीव भरल्यामुळे थड्थड हालत होते. सन्त सन्कटे थोपवीतात पण (आपले) भोग चुकविण्यासाठि नव्हे. या साध्वीची समाधी त्यान्च्या 'शेऊर' या गावी आहे. तुकोबारायान्चे स्वप्नोपदिश्ट शिश्य निळोबाराय - त्यान्चे शिश्य शन्करस्वामी या महात्म्याचे वास्तव्य व समाधी याच गावी. हे पुण्यक्शेत्र साध्वी बहिणाबाईन्च्यामुळे अधिकच पावन झाले आहे.

वाचन 45556 प्रतिक्रिया 0