मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घारापुरी भ्रमंती कट्टा: १ मार्च २०१४

प्रचेतस · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मुक्त विहारि यांनी आधी टाकलेल्या घारापुरी कट्ट्याची तारीख आधी १ किंवा ८ मार्च ह्या गोंधळात अडकलेली होती. आता हा घारापुरी भ्रमंती कट्टा १ मार्च २०१४ रोजी करण्याचे नक्की झाले आहे. त्यामुळे येथे त्यासाठी जाहीर धागा टाकत आहे. कट्ट्याची सर्वसाधारणपणे योजना खालीलप्रकारे असेल. पुण्याहून शनिवारी दि. १ मार्च रोजी मी, धन्या, सूड, नाद खुळा, प्रशांत आणि अत्रुप्त आत्मा असे सिंहगडने निघून साधारण ९.४५ च्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचू. तिथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत साधारण १०/१०.१५ पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. मुंबईकरांपैकी माझ्या माहितीप्रमाणे मुविकाका, स्पा, किसन शिंदे, दिपक.कुवेत,पिंगू शेठ हे नक्की येत आहेत. अजून कोणी मुंबैकर येणार असतील तर त्यांनी श्री मुवि यांना व्यनि करावा. तर पुणेकर इच्छुकांनी मला व्यनि करावा. सर्वांनीच १० पर्यंत गेट वे येथे जमणे अपेक्षित आहे. तिथे फेरीबोटीचे तिकिट काढून घारापुरी येथे उतरून स्थलदर्शन, निवांत गप्पा टप्पा. मग साधारण संध्याकाळी ४/५ पर्यंत परत गेट वे ला येऊन मग फोर्ट, चर्चगेट परिसराची भटकंती असा ढोबळमानाने कार्यक्रम आहे. खादाडी पण अधूनमधून होत राहील. अधिक माहिती मुवि देतीलच. आम्ही परतीचे रात्रौ ८ च्या महालक्ष्मी एक्स्प्रेसचे आरक्षण केले आहे. त्यामुळे तसा बर्‍यापैकी निवांत वेळ आहेच. चला तर मग मिपाकरांनो, एक मस्त भटकंती होऊन जाऊ देत.

वाचने 26825 वाचनखूण प्रतिक्रिया 92

In reply to by स्पा

विटेकर 14/02/2014 - 16:11
आस्तिक-नास्तिक, शाकाहार-मांसाहार, निवासी-अनिवासी, पुणे-मुंबई या आणि या विषयांना धरून धागे काढून त्यावर वांझोट्या चर्चा/वाद/कुरघोड्या करणार्यांचे आम्हास नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे आम्हाला पण..............

In reply to by प्यारे१

का बुवांकडे मस्तानी नको? आजकाल लहान मुलांकडे पण मस्तानी असते. जावु दे, आजकाल पुण्यातली पुरुष मंडळी पण सर्रास मस्तानीचे नांव घेतातच पण बायका पण घेतात. पुर्वीचे पुणे राहिले नाही आता...

In reply to by स्पा

@मस्तानी आण रे बुव्या येताना पेंडिंग आहे >>> अजिब्बात नाही. ती तू-पुण्याला आल्यावर देण्याचे ठरले आहे! :-/ @बुवा,मस्तानी आहे तुमच्याकडं?>>> आवले..आवले.. =)) काय हे..? कधिच खाल्ली नै का अजून? http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

हे असे परखड वाक्य लिहून... बुवांनी आपला पुणेरीपणा सिद्ध केला आहे. १. स्पा सध्या तरी पुण्याला येवू शकणार नाही. २. ज्यावेळी स्पा पुण्याला येईल त्यावेळी बुवांना वेळ असेलच असेही नाही. ३. समजा दोघेही भेटले तरी मस्तानी देणारे हॉटेल सुरु असेल असेही नाही. ४. वरील सर्व बाबी विचारात घेतल्या तर.... एकूणच ह्या पेक्षा ठाकूरचा वडा-पाव खाणे योग्य असेच स्पाला वाटेल. महत्वाचा मुद्दा.... इतके सगळे होव्वुन पण. बुवांनी आणि स्पाने मस्तानीची चव पुण्यात एकत्र घेतल्यास , त्या हिरक-क्षणाचा फोटो मिपावर न विसरता टाकणे.

In reply to by मुक्त विहारि

@इतके सगळे होव्वुन पण. बुवांनी आणि स्पाने मस्तानीची चव पुण्यात एकत्र घेतल्यास , त्या हिरक-क्षणाचा फोटो मिपावर न विसरता टाकणे.>>> =))

चला आता थोडे आयोजन करू या. १. वेळ : ह्यावेळी वेळेला खूपच महत्व आहे.शक्यतो सगळ्यांनी वेळेवर हजर राहणे आवश्यक आहे, कारण एखाद्याने केलेला ५/१० मिनिटे उशीर पण आपल्या पुणेकर मिपाकरांना नंतर त्रास दायक ठरू शकतो. २. प्रत्येकाने किमान २ लिटर पाणी आणावे. ३. बाहेर खाण्यापेक्षा, ह्यावेळी आपण घरी बनवलेलेच पदार्थ घेवून जावू या.त्या निमीत्ताने अंगत पंगत पण होईल आणि सुदैवाने दिपक शेठ आहेतच.त्यांच्याकडून आपल्या पदार्थाला मान्यत्व पण येईल. ४. त्याच दिवशी संध्याकाळी "दिपक शेठ" ह्यांच्या बरोबर पक्षी-तीर्थ कट्टा करू या का?

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 14/02/2014 - 17:12
त्याच दिवशी संध्याकाळी "दिपक शेठ" ह्यांच्या बरोबर पक्षी-तीर्थ कट्टा करू या का?
आम्ही आपले घासफूस आणि कोल्ड्रिंकवाले. बाकी जेवायला खरोखरच वेळ मिळणार नै. त्यापेक्षा मुम्बै स्पेशल भेळपुरी, पंचम पुरीवाला, क्यानन पावभाजी अशी काही हटके ठिकाणं दाखवा ना.

In reply to by प्रचेतस

हा सगळ्यात उत्तम पर्याय. पोटभर जेवण आणि माफक खर्च. कारण पाव-भाजी आणि भेळ खावून दुपार साजरी करण्यापेक्षा हे उत्तम. बादवे, मी बटाट्याचे पराठे नक्की आणत आहे.... (आणि जमल्यास छोले आणतो.) खजूराच्या वड्या पण आणयचा प्रयत्न करीन.

In reply to by मुक्त विहारि

अजया 14/02/2014 - 21:46
तुम्ही दुपारच्या जेवायच्या वेळेपर्यंत पंचमकडे नाही जाऊ शकणार बहुधा.कारण परत गेट वेला येइपर्यंतच तुम्हाला निदान चार वाजतील.बेटावर बरी हॉटेल्स आहेत.तिथे तुम्ही सोबत घेतलेले जेवणही जेऊ शकाल. परत येताना पूणेकराना जवळचे बडे मिया(घासफुसवाल्यांसाठी नाही) कैलासपर्बत ( इलेक्ट्रिक हाऊस )ला भेळ्,लस्सी,आइसक्रीमसाठी नेऊ शकता. कॅननची टेस्ट आता पहिल्यासारखी राहिली नाही. अ‍ॅम्बेसेडर हॉटेलच्या बाजूने मरीन ड्राईव्हला गेलात तर रुस्तूमचे आइसक्रीम जरूर्,जरूर खा.

In reply to by अजया

पंचम ओव्हररेटेड आहे. साधा पुरीवाला आहे. खास पुण्याहून येउन तिथे जाण्यासारखे काही नाही.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

धन्या 16/02/2014 - 13:40
ओव्हररेटेड ठिकाणीच पुणेकर जातात. वनगीदाखल काही उदाहरणे: कपडे: कॉटनकिंग किंवा जयहिंद सिनेमा: प्रभात उडुपी रेस्टॉरंट: अभिषेक ई.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्यारे१ 16/02/2014 - 15:06
तुम्हाला तो पंचम वाला 'आओ विमे काका ,बहोत दिनोंके बाद आये' असं म्हणाला नाही त्याचा राग काढताय का काय? ;)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

जेवायला चांगले हॉटेल हवे असेल तर २-३ सुचवतो. १.सिद्धार्थ कॉलेज समोरील गल्लीत फोर्ट सेंट्रल किवा तेथुन उजवीकडे मोती हलवाई २.फोर्ट सेंट्रलकडुन डावीकडे फिरोजशहा मेहता रोडकडे गेल्यास ललित सुद्धा उत्तम ३.त्याच रस्त्याला महेश लंच होम (नॉन व्हेजसाठी उत्तम,पण व्हेज ही चांगले मिळते)

In reply to by प्रचेतस

दिपक.कुवेत 16/02/2014 - 11:15
मुवि......आपण "पक्षी-तीर्थ" डोंबीवलीत करु. मी आहे दोन-तिन दिवस तिथे. बाय द वे कट्टा झाला कि मी तुमच्यासोबतच डोंबीवलीला येणार आहे.

In reply to by मुक्त विहारि

मस्त कलंदर 14/02/2014 - 18:56
आम्ही बहुधा येऊच. काही लोक एकत्र येणार म्हणजे थोडे मागे-पुढे व्हायचेच. मी आतापर्यंत दोन-तीन वेळा एलिफंटाला(ही घारापुरी बेटांवर आहेत, तिथे अजून काही असेल याची शक्यता जवळजवळ नाही, तरीही माझी माहिती फक्त लेण्यांच्या गुहेपर्यंतच मर्यादित आहे) जाऊन आले आहे, त्या माहितीवरून- १. दर पंधरा-वीस मिनिटांना फेरीबोट उपलब्ध असते, शेवटची फेरी तिकडून ५ वाजता सुटते. त्यामुळे दहाचे सव्वादहा झाले तरी जास्त फरक पडावयास नको. २. बेटावर एक-दोन कामचलाऊ रेस्तराँ आहेत, पाणी आणि शीतपेये तिथेही मिळतात. आता आठवत नाही, परंतु मुंबई बेटांवरल्या आणि घारापुरी बेटांवरल्या किंमतीत जास्त फरक आहे असे वाटत नाही. पुन्हा तिथे पायर्‍या बर्‍यापैकी भरपूर आहेत तेव्हा सवय नसलेल्यांना आणि वजनदार लोकांना हे त्रासाचे ठरू शकते. तेव्हा एखादी पाण्याची बाटली बरोबर असल्यास उत्तम. ३. बेटांवर काकडी, बोरे, मक्याची कणसे यांसारखे पदार्थ मिळतात, किंमतीबद्दल वरीलप्रमाणेच. ४. घरून खाण्यापिण्याचे घेऊन जाण्यापेक्षा तिथलेच पर्याय पाहावेत. अ. घरी निवांत ऑर्डर देऊन तयार झालेले पदार्थ घेऊन जाणे आणि स्वतः उठून काहीतरी करून घेऊन जाणे यात बराच फरक आहे. (सूडने तयारी दाखवली आहे, तरीही.. ) ब. स्वयंपाकामुळे निघायाला उशीर झाला असे कुणी कारण देऊ नये म्हणूनही. असो. कट्ट्यास उत्सुक(म.क.)

In reply to by मस्त कलंदर

प्रचेतस 14/02/2014 - 21:11
माहितीबद्दल धन्यवाद. फेरीबोटी दर १५/२० मिनिटांनी म्हणजे वारंवारिता चांगलीच आहे की. हल्लीच तिथे पायर्‍यांच्या मार्गाव्यतिरिक्त मिनी ट्रेन पण कार्यान्वित झाल्याचे ऐकले आहे.

In reply to by प्रचेतस

मस्त कलंदर 14/02/2014 - 22:30
मिनी ट्रेन काही कामाची नाही. ती फक्त जेट्टीपासून पायथ्यापर्यंत आहे. ते अंतर १००मीटर असेल, फारतर १५०. बाकीच्या पायर्‍या चढायलाच लागतात.

In reply to by प्रचेतस

स्पंदना 16/02/2014 - 09:53
वल्ली ३र्‍या गुहेनंतर पुढे जायचा त्रास नका घेऊ. ती नुसती गुहा खोदायचा प्रयत्न केल्याची निशाणी आहे. पाण्यासाठी गुहा सुरु व्हायच्या आधीच सरकारने कूलर बसवलाय. तेथे रिफील करु शकता. अन झाडाखाली बसायला कट्टे आणि भरपूर माकडे आहेत. हो. विसरलच तेथे बसून जेवंणे अशक्य. भयानक ताप आहेत माकडं. अगदी कोल्ड्रिंकची बाटली पायात धरुन हातान तोंडाला लावुन पितात गाढव! (सॉरी माकड)

In reply to by स्पंदना

प्रचेतस 16/02/2014 - 11:45
ती गुहा तरी बघायलाच हवी. न जाणो अजून काहीतरी मिळेलही. बाकी घारापुरीलासुद्धा मर्कंटाचा त्रास असेल असे वाटले नव्हते.

In reply to by प्रचेतस

शशिकांत ओक 21/02/2014 - 13:26
शोधक वृत्तीच्या वल्ली ... हळूच घ्या... नामक वल्लीला तिथे जाऊ नका असे सुचवल्याने ते व अन्य संगी साथीदार त्या तिसऱ्या ठिकाणी काय काय दडले आहे असे शोधायला जायला प्रवृत्त होणार हे ओघाने आले.... यावरून हवाईदलातील एक नागालँडचे 'वल्ली' आठवले. कमरेला लावलेल्या कुकरीचा नेम धरून तो रस्त्यावरच्या कुत्र्यांना सहज म्हणून मारत असे. ... त्याचे नाव हरालू होते. त्याला पुर्वपद "हरामी" लावून आम्ही त्याच्या पश्चात नावाजत असू.... अमुक एक 'कर' असा आदेश वरिष्ठांनी जरी दिला तरी तो 'चुप साले ...' म्हणून दुर्लक्ष करी. मात्र 'हरालू तू ये काम कर नही सकता' असे म्हणून त्याला भरीला घातले की महाशय नको ते पराक्रम करायला उद्युक्त असे... असेच एकदा जंगलातील एका गूहेत चढायची गोष्ट गप्पागप्पात भर घालून निघाली. त्यात त्याने १४ किमीवरील उंच ठिकाणी असलेल्या गूहेतून वटवाघळे मारून आणली दाखवायला की मी तिथे गेलो होतो हे सिद्ध करायला....!! ...असे भरीला घालणारे मित्र ही येतील तिथे.... तेंव्हा सावधान....

सूड 14/02/2014 - 17:44
आपापल्या घरनं काही बनवून आणायचं म्हणता? आम्हाला वेळ आणि साहित्य-साधनं मिळालं तर काहीतरी गोडाचं बनवून आणता येतं का बघू.

एस 14/02/2014 - 23:50
आम्हांस जमणे काही शक्य दिसत नाही. तरी होता होईल तितके मोहिमेला जाऊन मिळण्याचा सांगोपांग यत्न अवश्य केला जाईल. न साधल्यास किमानपक्षी स-प्रतिमा-सविस्तर-वृत्तांताची वाट पाहीनच :-)

In reply to by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)

तुम्ही रहायला कुठे? मुंबईत असाल तर तुमचा मो.नं. मला व्यनि करा. पुण्याला रहायला असाल तर..वल्लींना व्यनि करा...

In reply to by यशोधरा

ओके.... योग्य ती दखल घेतल्या गेली आहे.... तुम्ही केंव्हा येत आहात? आम्हाला रविवारी हमखास वेळ असतो, शनिवारी वेळ काढता येतो, तर इतर दिवशी फावला वेळ असतोच... आणि तसेही.... डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण आहे.हे वेसांनल....

प्रचेतस 16/02/2014 - 09:43
आतापर्यंत नक्की झालेले आणि पुण्याहून सिंहगडने येत असलेले सदस्य. मी प्रशांत नाद खुळा अत्रुप्त आत्मा धन्या सौंदाळा सूड पिंगू चिमी

आयला मोठी दिग्ग्ज मंडळी भेटायला मिळणार म्हणजे पंचयोगच(दुग्धशर्करा वगैरे)जुळुन येणार की. पण आम्ही अभागी. आमच्या मते ही मंडळी म्हणजे महाभारतातील पात्रच जणु. वल्ली :- भीष्म बॅटमॅन( आला तर) :- युधिष्ठिर अत्रुप्त आत्मा :- अर्जुन -------------

स्वगत:-

वल्ली:-आयला भीष्म म्हणजे परत शपथ घ्या अविवाहित राहण्यासाठी

बॅटमॅन:- हं काहीतरी कुट प्रश्न विचारला पाहिजे म्हणजे हा परत मी.पा.वर येणारच नाही.

अत्रुप्त आत्मा:- च्यायला मी भुतांवर शरसंधान करतो तर माणसांचे काय? पण साला दौपदीला कुठुन शोधुन *SCRATCH* आणू?.

आयला कांडी टाकली. आता पळा.

In reply to by मुक्त विहारि

माझं नक्की नाहीये , शुक्रवारची वीकेन्ड पार्टी 'मापात' झाली आणि शनिवारी 'व्यवस्थित' आणि 'वेळेत' उठलो तर नक्की ;) !

भाते 21/02/2014 - 11:30
१ तारखेला हापिसात जाऊन कळफलक बडवण्याचे काम असल्याने मला दुर्दैवाने :( घारापुरी कट्टयाला यायला जमणार नाही आहे. यावेळी सचित्र सविस्तर वृत्तांत वाचुन मनाचे समाधान करून घ्यावे लागेल.

खीS S क *lol* चला आता कट्ट्याला शुभेच्छा देवुया ! सर्व पक्षीतिर्थकरांनी कृपया सोनेरी तिर्थ घेताना थोडी हवेत शिंपडावी. इथे "एकच प्याला" चा तळीराम संवाद आठवला. ही ही ही *lol* (कधीच न घेणारा) पम्या

लीलाधर 25/02/2014 - 11:35
करावि म्हणतो कशे अपडेट्स वल्ली - Sun, 16 / 02 / 2014 - 09 : 43 आतापर्यंत नक्की झालेले आणि पुण्याहून सिंहगडने येत असलेले सदस्य. मी प्रशांत नाद खुळा अत्रुप्त आत्मा धन्या सौंदाळा सूड पिंगू चिमी -------------------------------------------------------------- उत्तरतो हिमवन्तो दाहिणतो सालिवाहणो राञा समभारभरक्लान्ता तेण न पल्हत्थ पुहवी ||

मन१ 27/02/2014 - 11:30
I want to come. But i could not yet reserve the seat. I do not have much experience to go by train. Nor i m much aware of mumbai. Can someone pls advice? Excuse me for English usage. Bt cant type devnaagari well through mobile.

In reply to by मन१

प्रचेतस 27/02/2014 - 12:42
पुणे स्टेशनला पहाटे ५.१५ पर्यंत पोच. स्टेशनवर ५० फक्त आणि धन्या भेटतील. तिकडे सिंहगडचे टिकिट काढ. जनरल मध्ये सिंहगडला जागा मिळेल. नैतर आज तत्काळमध्ये रिजरवेशन मिळतेय का बघ. बहुधा मिळावे. येतांना आपण अ‍ॅडजस्ट करून येऊ नैतर तू एसटीने पण परत येऊ शकशील.

मस्त कलंदर 28/02/2014 - 10:48
आमचं येणं यावेळेस होत नाहीसं दिसतंय. :-( बरेच जणांना माहिती असेल तरीही नवीन जाणार्‍यांसाठी काही माहिती. १. जाण्यायेण्याचे एकत्रच तिकिट मिळते. २. फेर्‍यांचे वडाप(भरली की बंदराहून सुटते) चालू असते, आणि दर दहा-पंधरा मिनिटाला भरतेच. त्यामुळे अर्धापाऊण तास इकडेतिकडे झाला तरी काही फरक पडत नाही. ३. अर्ध्या तासात रपेट किंवा घारापुरी अशा दोन वेगवेगळ्या बोटी/सेवा असतात, त्यामुळे तिकिट घेण्यापूर्वी/बोटीत बसण्यापूर्वी खात्री करून घ्यावी. ४. डेकवर जाण्याचा वेगळा आकार पडतो, आधी दहा रूपये घ्यायचे आता बहुधा वीस रू. घेतील. वरून बंदरात आतपर्यंत नांगरलेल्या बोटी, मोठी जहाजे, मधूनच भाभा अणुशक्तीकेंद्र दिसतं आणि छान मोकळी हवा मिळते. ५. जाताना बंदर सोडल्यानंतर दहाएक मिनिटांत एका बेटावर नौदलाची पांढरी इमारत दिसते. त्या दिशेने दुर्बिणी रोखणे, फोतो काढणे असे प्रकार करू नयेत. म्हणे नौदल याची नोंद ठेवतं आणि ज्या बोटीवरून हे प्रकार झाले त्यांवर कारवाई करतं. त्यामुळे बोटीवरचे लोक कुणी असं केलं की जाम ओरडाओरडा करतात. ६. सगळ्यात महत्वाचं- बेटावर प्रसधनगृह पटकन दिसण्यासारखं नाही, खरंतर मला माझ्या २-४ भेटींत कधीच दिसलं नाही. तेव्हा जाण्यापूर्वी गेटवे ऑफ इंडियाच्या इथे असलेल्या सशुल्क सेवेचा वापर केलेला इष्ट.

In reply to by मस्त कलंदर

मस्त कलंदर 28/02/2014 - 10:51
आणि हो, येताना तिथे उभ्या असलेल्या कोणत्याही बोटीतून परत आलेलं चालतं, आपल्या गेलेल्या बोटीची वाट पाहावी लागत नाही..

उद्या सकाळी ठीक ९:३० ला सी.एस.टी. वर भेटू या. समजा काही कारणामुळे उशीर झाला तर थेट घारापुरीला भेटू या.

In reply to by सूड

कारण पुणेकरांना त्याच दिवशी परतीची गाडी पकडायची आहे. उगाच आपल्यामुळे त्यांचा खोळंबा नको. (मुंबईकरांवर राग काढायला पुणेकरांना निमीत्त मिळायला नको.)

चौकटराजा 28/02/2014 - 16:22
कट्टे पे कट्टा कट्टे होडी होडीमे निकली किनकी सवारी ? थोडे खिल्लाडी थोडे अनाडी पेटमे किसके जायेगी ब्र्यान्डी ? मुवी रसीले बुवा रंगीले धन्या टमाटा वल्ली बटाटा गामा बनेगा ऐसा खिलाडी कोण काढील कुणाची खोडी........टर डर, डर टर, डर डर डा ... हार्दिक शुभेच्चा ! अच्चा बाय बाय !

In reply to by प्रमोद देर्देकर

शिद 28/02/2014 - 18:26
आमच्यापण कट्ट्याला अश्याच रंगबेरंगी शुभेच्छा... वृत्तांताची वाट पाहतोय.

In reply to by प्रमोद देर्देकर

शशिकांत ओक 03/03/2014 - 11:40
मित्रा, तू शीर्षकात रंगांची उधळण करून बहार आणलीस... पुर्वी मला ही अशी रंगपंचमी करून धागा सजवायला आवडत असे. मात्र कांहींच्या डोळ्याला ते रंग खुपायला लागले व फर्माईश झाली की आता पुरे ..... म्हणून आता कृष्ण-धवलावरच मला समाधान मानावे लागते. तरीही आपल्या रंगारीपणाचे अभिनंदन

प्रचेतस 02/03/2014 - 12:51
जबरदस्तच झाला कालचा घारापुरी भ्रमंती कट्टा. पेठकर काका आणि शशिकांत ओक काका यांनी उपस्थित राहून आश्चर्याचा धक्काच दिला. उपस्थित सर्व मिपाकरांचे आभार. आत्मुबुवा लवकरच सविस्तर वृत्तांत टाकतीलच.

In reply to by यशोधरा

प्रचेतस 02/03/2014 - 13:13
हो. दोन वृत्तांत येतील. मिपाकरांची मौजमजा आत्मुबुवांकडून व् आमचेकडून लेणीदर्शन.

अनन्न्या 02/03/2014 - 15:28
आणि लेण्यांची माहितीसुध्दा! सातवीला असताना एलिफंटाला गेले होते. आता फक्त एवढेच आठवतेय की माकडाने माझ्या हातातली केळी पळवली होती. आणि एकत्र गोल बसून भेळ खाताना आमच्यामधे माकडंही येऊन बसली होती भेळ खायला!

In reply to by अनन्न्या

त्यांची मुले पण जास्त हुषार झाली आहेत. शीतपेयांच्या बाटल्या तर पळवतातच, पण शिवाय त्यांचे बूच उघडून, शीतपेयांचा आस्वाद पण घेतात.

शशिकांत ओक 03/03/2014 - 00:43
अनन्या, अग, त्यांच्या हुशार मुलांनी बूच उघडून शीतपेयाची चव चाखण्याची प्रगती केली. तहान भागवली व शिवाय पेयाच्या चवीचा आनंद मिळवला. त्यांच्याप्रमाणे आमच्या मुलांनी, पुर्वी फक्त आपली नावे कोरून इमारतींवर आपला प्रासाद सोडायला आवडे यातून प्रगती करून, आता त्या वास्तूचे ऐतिहासिक व वास्तूशिल्पाचे अध्ययन करून त्यातील सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असतो हे तथ्य जाणून मिपाचे काही, वल्ली सोबत एकत्र जमून आले...