Skip to main content

<नवविवाहिताचे बाबांस पत्र>

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 03/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा (शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे) प्रिय बाबा, प्रत्येक मुलाप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होतो. माझ्या बेबी डॉल, ड्रीम गर्लची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त अमर्याद सेक्स न्ह्वे. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत हवे तेव्हा हवे ते करणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे कटकटी, वैताग आणि 'बस बाई, तुझंच खरं' यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितक्या सिगरेटी ओढु नाहि शकत. मला सिगरेट ओढल्यानंतर तोंड धुणं गरजेच आहे. मी गबाळयासारखी घरभर बीयरच्या बाटल्या टाकू नाहि शकत. मी टापटीप राहाणं गरजेच आहे. वाटेल तितका वेळ लोळू नाहि शकत. वाटेल तितका वेळ मित्रांशी फोनवर बोलु शकत नाहि ........... मी ए़खाद्या राजकुमारासारखी मला वागणू़क मीळावी अस नाहि म्ह्णत. पण च्यायला एखाद्या नोकरापेक्षा बरी वागणूक नको मीळायला? मी मला हव्या त्या वेळी आणि हव्या त्या बारमध्ये मनाला वाटेल तेव्हा नाहि जाउ शकत. आणि जायचं तर तुम्हाला भेटायला जातो असली भंपक कारणं द्यावि लागता..... एकेकदा मी स्वत: ला विचारतो , ' का बरं मी लग्न केलं असेल?'. खुप खुश होतो हो मी दोस्तांसोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत. खुप गप्पा माराव्याशा वाटतात. मला एकदा घरी यायचं आहे तुमच्याशी एकदा आमनेसामने बोलायला. माझ्या ठेवणीतल्या शिव्या चाखवायला. कारण अचानक मला जाणिव झाली कि तुम्ही हि पण लग्न केलसं ना? कशासाठी इतका त्याग केलात? आहे त्या मधे खुप समाधानी असल्याचं नाटक केलंत? तुम्हाला काय इतर गर्लफ्रेंडा नसत्या मिळाल्या........ आम्हि खुप शिकाव म्हणुन तुम्ही आणि मम्मीने घेतलेले श्रम आजहि आठवतात, पण च्यायला, संसार म्हणजे केवढा वैताग असतो हे शिकवलं असतं तर काही बिघडलं असतं का? तुम्हि दोघांनी संसार केला नसतात तर माझे जे काहि गोड गैरसमज होत ते कदाचित नसते. हे सर्व आठ्वून मी प्रचंड फ्रस्ट्रेट होतो आणि मला माझ्या नवरा असण्याचा अर्थ उमगतो. मुलाला संसाराचा त्रास व्हावा याच साठि बाप संसारात अडकून राहतो हेचं खरे. वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी मी ही रुळेन या सर्वांमधे. आणी लग्ना नन्तरचं आयुश्यही सहन होऊ लागेल मला हळु हळू........................................... तुम्ही आणि मम्मीने केलेल्या फसवणुकी बद्द्ल आणि गैरसमजांबद्दल माझ्याकडून शिव्यांची लाखोली......... तेच माझ्या साठि लग्नाच्या बेडीत अकडवणारे ठरतात.......................................................
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 28918
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

In reply to by राजेश घासकडवी

पुरुष विभागाला संपादित असं नाव का सुचवल्या(!) गेले आहे? बा द वे दुहेरी निष्ठेमुळे जनता सरकार पडलं माहित आहे ना !

In reply to by आशु जोग

पुरुष विभागाला संपादित असं नाव का सुचवल्या(!) गेले आहे?
कृपया गैरसमज नसावा. तो शब्द संपादकांनी लिहिलेला आहे. मी जे काही निकष लिहिलेले होते ते संपादित झाले आहेत.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

काही तांत्रिक अडचण असेल अशी अपेक्षा. कारण हे संपादन असेल, तर झाला प्रकार दुर्दॆवी म्हणावा लागेल.

In reply to by प्यारे१

The app I am using doesn't support that. Or I don't know how to use it. Other option I had was writing completely in English, like this message. Which one do you prefer? In coming days you might see more such errors from me. Kindly ignore them.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी बरी. तेव्हा तुम्ही जमेल तसं देवनागरीत टायपा बरं. आम्ही समजून घेऊ. या प्यारेकडे मी जास्त लक्ष ठेवीन. मग झालं?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मुद्द्याचं काश्मीर करण्याचा अजिबात हेतू नव्हता. माझा देखील तुमच्या मुद्द्याला जाहीर नि अत्यंत तीव्र पाठिंबा आहे. तुम्हाला खरड टाकलेली होती. मला देखील हे पटलेलं नाही. मुळात हा (हुकुमशाहीचा शब्द बरोबर बसेना) कारभार कितपत सुरु राहतो ह्यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. दुसर्‍या धाग्यावर मत स्पष्ट व्यक्त केलेलं आहे. मुळात स्वाक्षरी आज प्रगटलेली नाही. अपर्णाअक्षय ह्यांनी आजच त्याबाबत लिहीण्यामागे त्यांचा काही हेतू असणार. तो समजला नाही असं 'दाखवून' पुढचा राडा घातला गेला. पुन्हा नामानिराळं राहण्याचा साळसूदपणा दाखवला गेलाच. उत्तम आहे. पण ह्या अनुषंगानं झालेली चर्चा कदाचित चुकीची असली तरी ती काही वाट दाखवणारी ठरली असती. ती बर्‍याच अंशी कायमची पुसली गेली. बर्‍याच गोष्टी आम्हा सामान्य सदस्यांना माहिती नाहीत असं सांगण्यात येतं. खरंही असेल. मात्र त्याचे पडसाद मग इथे सगळं लिहून करुन मग पुसून टाकण्यात का?

In reply to by प्यारे१

१. चर्चा पुसली गेली नाही. सुरक्षित आहे. फक्त सदस्यांना दिसत नाहीये. कोणतेही प्रतिसाद "उडवले" जात नाहीत तर अप्रकाशित राहतात. २. जे वाचनमात्र आहेत, किंवा २ वर्षांनी कोणताही संदर्भ माहित नसताना हे प्रतिक्रियात्मक लिखाण वाचतील त्यांनी अन्य काही भलताच अर्थ घेऊ नये म्हणून सध्या अप्रकाशित राहील. ३. सर्व सदस्यांच्या म्हणण्याची नोंद घेतली आहे. त्यावरून आवश्यक त्या पातळीवर चर्चा योग्य तो निर्णय घेतला जाईलच. नीलकांत आज आत्ता इथे येऊ शकत नाहीये पण त्याचे लक्ष आहे. ४. तुमच्या मिपावरच्या प्रेमाबद्दल धन्यवाद म्हणून तुम्हा मंडळींना कोणताही कमीपणा आणणार नाही. ५. असंतोष व्यक्त करून तुम्ही मंडळींनी तुमचं काम केलंय. नीलकांत त्याचं करील याची खात्री बाळगा. ------------ जय हिंद. जय महाराष्ट्र.

स्वातंत्र्यसंकोचाच्या एकदोन बाबी.. रोजरोज, अगदी सुट्टीच्या दिवशीसुद्धा दाढी करावी लागते. आणि ओला टॉवल गादीवर फेकता येत नाही..आणि दाढी झाल्यावर ते केसफेसयुक्त मिश्रण बेसिनमध्ये इतस्ततः पसरलेले तसेच टाकून पळता येत नाही.. विडंबन बेहद्द आवडले.

हॅहॅहॅ. खुमासदार विडंबन! हे लव्हमॅरेज झालेल्या नवविवाहिताचे वाटतेय पत्र. अरेंज मॅरेजवाल्या लोकांना असे पत्र लिहावेसे वाटेपर्यंत ते 'नव'विवाहित राहात नाहीत :-)