मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सहज चाळले..

प्राजु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
सहज चाळले आठवणींना जाता जाता क्षणांत सार्‍या भरून आल्या बघता बघता किती राहिले अवती भवती तुझ्या तरीही आतुर मन हे तुझ्याच एका नजरे करता "स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या भास तुझे ना कधीच आले मला टाळता जनांत नाही डोळा कधी आणले पाणी मनांस झाल्या कितीक जखमा उठता बसता स्पर्श तुझा तो जपून होता असा ठेवला वादळ उठले उरांत माझ्या तो आठवता डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता किती पसारा करून जाती आठवणी या धांदल माझी अशीच होते तो आवरता - प्राजु

वाचने 5528 वाचनखूण प्रतिक्रिया 31

मदनबाण Tue, 08/18/2009 - 09:11
किती राहिले अवती भवती तुझ्या तरीही आतुर मन हे तुझ्याच एका नजरे करता मस्तच... मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

आशिष सुर्वे Tue, 08/18/2009 - 09:16
सुंदर काव्य प्राजु ताई! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!'' ''Me and my girlfriend broke off over religious differences. She thought she was God and I didn't...''

दशानन Tue, 08/18/2009 - 09:25
खुप सुंदर... कविता... प्राजु ! मस्त ! डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता निशब्द ! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

राघव Tue, 08/18/2009 - 10:40
भावना खूप संयत शब्दांत, छान व्यक्त केल्या आहेस. :) संपूर्ण कविता आवडली. एकही दुसर्‍याहुन उणे कडवे नाही! अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता हे वाचून मी माझा मधली एक चारोळी आठवली - आठवणींच्या गावी, मी मनाला कधी पाठवत नाही. जाताना ते खूश असतं, येताना त्याला येववत नाही! राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु ) कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी.. सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

अ-मोल Tue, 08/18/2009 - 11:25
"स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या भास तुझे ना कधीच आले मला टाळता किती पसारा करून जाती आठवणी या धांदल माझी अशीच होते तो आवरता विशेष आवडले!

मिसळभोक्ता Tue, 08/18/2009 - 11:55
मी चुकून "सहज चळले" असे वाचले, म्हटले काय तरी इण्टरेष्टिंग आहे.. पण कविता निघाली. -- मिसळभोक्ता

अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता
कविता सुंदर. या ओळी खूपच आवडल्या. बिपिन कार्यकर्ते

शाल्मली Tue, 08/18/2009 - 13:36
खास कविता!
"स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या भास तुझे ना कधीच आले मला टाळता अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता
फारच सुंदर! --शाल्मली.

ऋषिकेश Tue, 08/18/2009 - 13:42
डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता
प्रत्येक ओळ मस्त वरील ओळी जास्त आवडल्या. मस्त! ऋषिकेश ------------------ दुपारचे १ वाजून ४० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "हे भलते अवघड असते.. "

ज्ञानेश... Tue, 08/18/2009 - 13:43
प्राजुताई, एकदम मस्त कविता! माझा दुसरा प्रतिसादही नक्की वाचा- http://www.misalpav.com/node/8995 "Great Power Comes With Great Responsibilities"

क्रान्ति Tue, 08/18/2009 - 14:55
अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता किती पसारा करून जाती आठवणी या धांदल माझी अशीच होते तो आवरता वा! कमालीची अभिव्यक्ती! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

लिखाळ Tue, 08/18/2009 - 16:57
जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी मनांस झाल्या कितीक जखमा उठता बसता
कविता आवडली. हे कडवे एकदम छान :) -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

अनामिक Tue, 08/18/2009 - 17:20
व्वा! खूप सुंदर कविता... किती पसारा करून जाती आठवणी या धांदल माझी अशीच होते तो आवरता ह्या ओळी तर खूपच आवडल्या. -अनामिक

जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी मनांस झाल्या कितीक जखमा उठता बसता
डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता
जगायला शिकायला लावणार्‍या ओळी विशेष आवडल्या. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मस्त कविता. एक सुचवावसं वाटतं "जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी" मध्ये मात्रांची थोडी गडबड होतेय. ती सुधारता आली तर आणखी मजा येईल. :) आपला, (मिपाकर) प्रशांत

In reply to by प्रशांत उदय मनोहर

प्राजु Tue, 08/18/2009 - 21:29
२ मात्रा जास्ती होताहेत. करते दुरुस्त. धन्यवाद प्रशांत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अविनाश ओगले Wed, 08/19/2009 - 20:59
"स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या भास तुझे ना कधीच आले मला टाळता मस्त! ================================ "जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी" मध्ये मात्रांची थोडी गडबड होतेय. ती सुधारता आली तर आणखी मजा येईल. == २ मात्रा जास्ती होताहेत. करते दुरुस्त. == हे गणित कळले नाही.