मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिलासा .....

फिझा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
दिलासा ..... भरती असो कि ओहोटी सगळं काही वाहून न्यावं लागत कुणाला दिलासा देऊ ? त्या लाटांना, ज्या कधी थांबू शकत नाहीत कि त्या किनाऱ्याला, जो कधी चालू शकत नाही ! इंद्रधनू असेल सप्तरंगी क्षणभंगुरच राहावं लागतं त्याला कुणाला दिलासा देऊ ? त्या ढगांना, जे त्याचा निरोप घेऊन येतात कि त्या पावसाला, जो तिला कधीच भिजवू शकला नाही ! दिवस मग मागून रात्र सायंकाळ दोघांना पाहावी लागते कुणाला दिलासा देऊ ? त्या उन्हाला, जे त्याच्या आठवणी जाळू शकत नाही की त्या चांदण्यांना, ज्या त्याच्या आठवणींशिवाय दिसू शकत नाहीत ! काल ,आज मग उद्या, असे कितीक वर्ष ! रोज, हा नेमाने रोज येतो कुणाला दिलासा देऊ ? तिला? जी अजूनही फक्त त्याची वाट बघत आहे कि त्याला? जो आजसुद्धा भेटीचे वचनही देऊ शकत नाही ! .....फिझा

वाचन 1719 प्रतिक्रिया 0