दिलासा .....
दिलासा .....
भरती असो कि ओहोटी
सगळं काही वाहून न्यावं लागत
कुणाला दिलासा देऊ ?
त्या लाटांना, ज्या कधी थांबू शकत नाहीत
कि त्या किनाऱ्याला, जो कधी चालू शकत नाही !
इंद्रधनू असेल सप्तरंगी
क्षणभंगुरच राहावं लागतं त्याला
कुणाला दिलासा देऊ ?
त्या ढगांना, जे त्याचा निरोप घेऊन येतात
कि त्या पावसाला, जो तिला कधीच भिजवू शकला नाही !
दिवस मग मागून रात्र
सायंकाळ दोघांना पाहावी लागते
कुणाला दिलासा देऊ ?
त्या उन्हाला, जे त्याच्या आठवणी जाळू शकत नाही
की त्या चांदण्यांना, ज्या त्याच्या आठवणींशिवाय दिसू शकत नाहीत !
काल ,आज मग उद्या, असे कितीक वर्ष !
रोज, हा नेमाने रोज येतो
कुणाला दिलासा देऊ ?
तिला? जी अजूनही फक्त त्याची वाट बघत आहे
कि त्याला? जो आजसुद्धा भेटीचे वचनही देऊ शकत नाही !
.....फिझा
वाह
हो, बऱ्याच दिवसांनी पोस्ट
सुंदर आहे
वाह, जबरदस्त लिहिलंय.
धन्यवाद !
क्या बात...