कधी उमलत्या फुलांची उडून गेली अत्तरे,
सोबतीच्या क्षणांची कशी झाली एवढी अंतरे?
प्रश्न करून पोरके का निघून गेली उत्तरे,
घेतला निरोप ज्या ठिकाणी, का सुन्न तिथले सारे?
तू जाता सांग का आठवणींचे मृगजळ पाझरे
वेचले जिथे मोती, का उद्विग्न आज ते किनारे?
तुझ्या येण्याने कधीकाळी बहरली जी शहरे,
परतून तू जाता घरी,का अनोळखी वाटते मला सारे?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1762
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
आशय अत्यंत छान आहे.
धन्यवाद!