तो........
लेखनविषय:
उदासल्या अंबरी तो
कधीचा दाटलेला
आसवांत होई रिता
परी उरी साचलेला........
लाख अडवू पाही तो
या आठवांच्या लाटां
ज्या डिवचूनी जाती
त्या उध्वस्त तटाला........
उन्हे पेटवूनी गेली
त्याची गाफिल स्वप्ने
आता उरले ना काही
ह्या रात्रीस जाळण्याला.....
उतरती सांज बोले
सावर रे वेडया
ना तिचा दोष काही
होता तुच फसलेला.........
ती येईल माघारी
तुझ्यासाठी एकदातरी
का आस ही वैरी
झुलवी त्या जिवाला.....
बहरला गुलमोहर
जेव्हा तिच्या अंगणात
निरोपाच्या फुलांनी होता
मग तोही सजलेला.........
वाचन
2681
प्रतिक्रिया
0