Skip to main content

घाई...

लेखक शैलेश हिंदळेकर यांनी गुरुवार, 14/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
बोलायला मनातले एस.एम.एस. ची सोय नव्हती रुपया टाकून फोन करु तर गर्दी होती अवती भवती नाक्यावरला वाणी होता दोघांमधला दूत त्याच्या करवी जमवत होतो तुझ्याशी मी सूत वारंवार पावलं तेव्हा दुकानाकडे वळायची मी तेथे आल्याची वार्ता तुला कशी कळायची काहीतरी निमित्त काढून तू ही तिथे यायचीस समोरून येता जाता वळून गोड हसायचीस पुढे एकदा चोरुन चोरुन तयार एक पत्र केले खात्री होती, ओळखशील तू म्हणून नांव नाही लिहिले पत्र द्यायचे धाडस मात्र नाही करता आले मला हळून तो लखोटा मग मी वाण्याच्या हाती दिला वाण्याने ते पत्र दिले गुपचुप तुझ्या हाती नंतर तेव्हापासून वाढत गेले आपल्या दोघांमधले अंतर आता आहेस तू वाण्याच्या दोन मुलांची आई पत्र देण्या उगीच केली त्या वेळी मी घाई
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1817
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

अवघड आहे. :(

शेवटच्या कडव्यात जरा गल्लत झाली, असो इथं प्रश्न विचारले तर फार गोंधळ होईल, त्यात तुम्ही नविन उगा शिव्या खाव्या लागतील.

In reply to by ५० फक्त

वाण्याच्या पोरांची आई एवढं समजलं.. पण शेवटी लग्न कुणाशी झालं? असं विचारायचंय का तुम्हाला? :D

In reply to by संजय क्षीरसागर

ओह आय सी! म्हणजे स्वत:च्या मुलाला यांची मामा म्हणून ओळख करुन देणारी ती हिच होय, मला वाटलं ती तिसरी.

In reply to by श्रिया

एका परीचे स्वप्न आयुष्याच्या सुखद वळणावर पाहीले मी त्याच स्वप्नाचा विरत जाणारा दु:खद अनुभव घेतला मी
...अजून बाकीच्या यायच्या आहेत

In reply to by संजय क्षीरसागर

म्हणजे इथल्याच एका कविच्या शब्दांत सांगायचे झाले तर हे कवी "इश्कबाज" होते असे वाटते. (क्रु.ह.घे.)