बरे झाले न्यायालयाने निकाल देऊन टाकला
पुन्हा एकदा धर्मांधाना भांडायला पॉइन्ट मिळाला
आता परत धर्माच्या नावाखाली कडवटपणा वाढेल
आणि पुन्हा एकदा दंगली होतील नि अजून काय!
महिने आणि वर्षे फार छोट्या गोष्टी झाल्यात
दशकानुदशके पलीकडून फक्त गोळ्याच आल्यात
दहशतवादी पुन्हा एकदा ऐन थंडीत घुसखोरी करतील
आणि पुन्हा एकदा कारगिल होईल नि अजून काय!
आजही अनेक फितूर सूर्याजी पिसाळ जन्माला येतायेत
अतिमहत्वाच्या माहिती शत्रूला विकतायेत
परत एकदा मुठभर लोक आपल्या घरात घुसून दंगा करतील
आणि पुन्हा एकदा २६/११ होईल नि अजून काय!
एकीकडे आयपीएल आणि सीडब्ल्यूजी साजरे होतायेत
आणि हजारो कोटी रुपये पाण्यासारखे वाहतायेत
दुसरीकडे दारिद्र्यरेषा अजून ठळक होत जाईल
आणि पुन्हा एकदा नक्षलबाडी होईल नि अजून काय!
मग 'नक्षलवाद संपवून टाकू' - गृहमंत्री घोष करतील
सगळीकडे फोटो काढून दिल्लीला जाऊन बसतील
पुन्हा एकदा कुठेतरी सत्तर-ऐंशी पोलीस मरतील
परत एक दंतेवाडा तयार होईल नि अजून काय!
इतके सगळे होताना मला नेहेमी प्रश्न असा पडतो
महासत्ता होतानाच्या प्रसववेदना माझाच देश का भोगतो
येईल या देशी पुन्हा छत्रपतींचे स्वराज्य की
आम्ही असेच पहाटेची वाट पहात मरून जाऊ नि अजून काय...
(अन्यत्र पूर्वप्रकाशित)
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
1969
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
_/\_
कवितेची प्रेरणा..
In reply to _/\_ by धमाल मुलगा
हम्म.. अजून काय..
इतके सगळे होताना मला नेहेमी
+१ जळजळीत सत्य. काव्य आवडले.
In reply to इतके सगळे होताना मला नेहेमी by सुहास..
अतिशय छान ..
क ड क!!!! रे असुर्या...
असं किती युगे चालणार ?
केवळ अप्रतिम !!!
मस्त
मग 'नक्षलवाद संपवून टाकू' -
:-)