मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हाच आपला ढंगु आहे...

घाटावरचे भट · · जे न देखे रवी...
टायम मोठा झकास आला आवळा नाड्या सावरा चड्डी दारू कोंबडी हिरवा गांधी सुरू नव्याने रोज कबड्डी धोंडे फेकू गोळ्या झाडू स्वत: स्वत:चे कपडे फाडू 'कैसी जनता भूखी नंगी' म्हणत आपणच गळेही काढू लाठ्या काठ्या अश्रूधूर अन् कधि एखादी गोळी आहे थांबायाला वेळ कुणा पण भाजायाची पोळी आहे पिचले रडले कुणी भरडले कैवाराला आपण आहे फोटो बाईटा काळे झेंडे चुलीत अपुल्या सरपण आहे शरम बेशरम नीती अनीती जुन्या बुकातील फंदा आहे राजकीय रंडीबाजीचा खुल्लमखुल्ला धंदा आहे कुबड्यांचेही शॉर्टेज झाले जो तो साला पंगु आहे 'अपनेकू क्या करना यारों?' हाच आपुला ढंगु आहे...

वाचने 3420 वाचनखूण प्रतिक्रिया 21

सहज 08/07/2010 - 03:35
भटोबा लै भारी! अजुन येउ दे. (ढोंगु) सहज

नंदन 08/07/2010 - 04:13
कुबड्यांचेही शॉर्टेज झाले जो तो साला पंगु आहे 'अपनेकू क्या करना यारों?' हाच आपुला ढंगु आहे...
--- क्या बात है! झकास भटोबा, अजूनही येऊद्या.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

श्रावण मोडक 08/07/2010 - 11:46
+३

निरन्जन वहालेकर 08/07/2010 - 08:23
कुबड्यांचेही शॉर्टेज झाले जो तो साला पंगु आहे 'अपनेकू क्या करना यारों?' हाच आपुला ढंगु आहे. खरच ! लय भारी राव ! !

प्रकाश घाटपांडे 08/07/2010 - 09:59
भटोबा कविता आवडली. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

वारा 08/07/2010 - 12:52
सांगा कधी बसताय??? :) >>टायम मोठा झकास आला >>आवळा नाड्या सावरा चड्डी >>दारू कोंबडी हिरवा गांधी >>सुरू नव्याने रोज कबड्डी :)

धमाल मुलगा 08/07/2010 - 14:13
किती मोठ्या काळानंतर ह्या भल्या माणसाचं लेखन वाचायची संधी मिळाली! का रे बाबा, तुला असंच लिहितं राहण्यासाठी काय सारखे बंद/दंगली वगैरे व्हायला हवे काय? लिहीत जा रे बाबा...लिहीत जा.... फार अप्रतिम लिहितोस तू. मला अजुनही तुझी आणि मिभोची काव्य जुगलबंदी आठवतेय.

राजेश घासकडवी 08/07/2010 - 16:11
लिहित रहा...

स्पंदना 08/07/2010 - 16:45
मस्त!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

अविनाशकुलकर्णी 08/07/2010 - 17:01
खुप आवडली..चपखल शब्द रचना

बहुगुणी 08/07/2010 - 18:35
विदारक वास्तव आहे तसं उतरवलं आहे, बहोत खूब! {फालतू 'संदेश' फॉरवर्ड करण्यापेक्षा लोकांनी असल्या "डोळे-उघडू" कविता फॉरवर्ड कराव्यात असं वाटलं, मी तर नक्की करेन. 'उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' असं म्हणायची वेळ कधीची आलेली आहे, थोडीशी जागृती झाली तर हवीच आहे.}

घाटावरचे भट 08/07/2010 - 20:21
सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे मनःपूर्वक आभार. :) - भटोबा