Skip to main content

साध्‍वी प्रज्ञासिंह कोण?

लेखक विकी शिरपूरकर यांनी सोमवार, 27/10/2008 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. गेल्‍या काही दिवसांपासून भारतीयच नव्‍हे तर विदेशी प्रसार माध्‍यमांमध्‍येही चर्चिले जाणारे नाव. आजवर ज्ञात असलेली पहिली संशयित हिंदू दहशतवादी महिला. कट्टर हिंदुत्‍ववादी विचारांची प्रज्ञासिंह आज सर्वांच्‍या चर्चेचा विषय ठरलीय ते मालेगावच्‍या स्‍फोटात संशयित आरोपी म्‍हणून. प्रखर राष्‍ट्रवादी विचार, शब्‍दांना असलेली धार आणि परखड वक्‍तृत्‍वशैली असलेली ही साध्‍वी.

राजला मारायला आलेल्या बिहारीचे एन्काउंटर

लेखक इनोबा म्हणे यांनी सोमवार, 27/10/2008 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी इथे वाचा. या घटनेनंतर सर्व बिहारी नेत्यांनी एकत्र येऊन पोलिसांचा निषेध केला आहे. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधांनांची भेट घेउन या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. बिहारी नेते 'राहूल चांगला मुलगा होता,तो कोणी अतिरेकी नव्हता व त्याला पोलिसांनी विनाकारण मारले' असा कांगावा करीत आहेत. झी चोवीस तास या वाहीनीवर राहूल राज च्या पराक्रमाचा विडीओ दाखवला जात आहे. या विडिओमधे हा तरुण बसच्या खिडकीतून बाहेर गोळ्या झाडताना स्पष्ट दिसतो आहे तरीही लालूप्रसाद हा मुलगा निर्दोष असल्याचे सांगत आहेत.

बापू सोनावणे..!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 27/10/2008 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन रेषेवरील, रेषेखालील, २००७-२००८ वगैरे वगैरे इत्यादी कुठल्याही अक्षरात मोडत नाही याची मला कल्पना आहे! आपल्याला नाय जमत बा तुमची ती रेषेवरची उभी की आडवी अक्षरे!

दिवाळीतले चमत्कार-४

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 27/10/2008 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
राणेंची लगीनघाई ---------- सकाळी सकाळी निवांत "प्रहार' वाचत बसलेल्या नारायण राणेंना नीलिमाताईंनी हलवलं. ""अहो उठल्या उठल्या पेपर काय वाचत बसलाय? चला, अंघोळ उरकून घ्या!'' ""अगं, आज दिवाळीचा पहिला दिवस. कॉंग्रेसमध्ये आल्यावर माझ्या मुख्यमंत्रिपदाची सुद्धा ही पहिली दिवाळी. आणि तू अंघोळ वगैरे काय म्हणतेस? "अभ्यंगस्नान' म्हणावं! आणि "पेपर' काय म्हणतेस? "प्रहार' म्हणावं! काही फरक आहे की नाही?'' राणे जरासे चिडक्‍या स्वरात म्हणाले. ""अहो, इथपर्यंत पोचण्याआधी तुम्ही कुणाकुणाच्या नावानं अंघोळ करत होता ना, म्हणून तेच डोक्‍यात बसलंय.'' ""असो. चला, आटपा लवकर. छान सुगंधी उटणं लावते. गरम पाणी काढून ठेवलंय.

दिवाळीतले चमत्कार-३

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 27/10/2008 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
ओवाळिते भाऊराया! ------ तासगावातल्या आपल्या घरी दिवाळीसाठी गेलेल्या आर. आर. पाटलांना तिथेही चैन नव्हताच. आपल्या अनुपस्थितीत गावात कुठे काही गैरप्रकार सुरू झालेले नाहीत ना, याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी गावातून फेरफटका मारला. आबा गावात असले, की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गावात "तीन पत्ती' खेळायला सुद्धा बंदी होती. गावातले गुत्ते बित्ते तर केव्हाच बंद झाले होते. एवढंच नव्हे, तर आबांसमोर तंबाखू खायचीही कुणाची टाप नव्हती. गृहमंत्रिपद हाती घेतल्यापासून कधी नव्हे एवढा तणाव त्यांनी गेल्या वर्षभरात अनुभवला होता.

पंजाबी सामोसा

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 27/10/2008 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
तमाम जर्मनांचे बटाट्यावर फार प्रेम आणि इथे उत्तरेतून आलेली मंडळी बरीच,ती ही,हॉटेल व्यवसायातील! त्यामुळे इथे सामोसा लोकप्रिय व्हायला वेळ नाही लागला. आमचे मित्र ख्रिस आणि सुझानही सामोसा प्रेमी..काल दिवाळीनिमित्त ते दोघं जेवायला आले होते.

दिवाळीतले चमत्कार-२

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 27/10/2008 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
भुजबळांची `भाऊबीज' -------------- दिवाळी सुरू होऊन दोन दिवस झाले होते. छगन भुजबळांच्या घरी शुभेच्छा द्यायला येणाऱ्या कार्यकर्त्यांची रीघ थांबली नव्हती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या या चाहत्यांना, समर्थकांना थोपवणं आता अवघड झालं होतं. विशेषतः साठीचा कार्यक्रम झाल्यानंतर ही गर्दी वाढलीच होती. ""अहो, चला! आज दिवाळीतलं शेवटचं स्नान आहे ना, लवकर उटणं लावून घ्या....'' पत्नीनं आठवण करून दिली, तसे भुजबळ जरासे सावरले. ""अगं, हे कार्यकर्ते थांबतील, तेव्हा उठणार ना?'' भुजबळ चिडचिड्या स्वरात म्हणाले. ""मग त्यांना आवरायला सांगा ना!

दिवाळीतले चमत्कार-१

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 27/10/2008 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
नाराजी का `राज' ----- अभूतपूर्व रोषणाईने "कृष्णकुंज' गजबजून गेले होते. संपूर्ण परिसराला "मनसे'च्या झेंड्याच्या पताका लागल्या होत्या. सगळीकडे फटाके वाजत होते. जल्लोष सुरू होता. महाराष्ट्रातून, देशातून, जगातून आलेले हजारो कार्यकर्ते विजयाचा आनंद साजरा करत होते. आज खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, "मनसे'च्या कर्तव्यनिष्ठतेचा विजय झाला होता. मराठी राष्ट्रपतींनी खास अध्यादेश काढून महाराष्ट्रातून सर्व बिहारींना, उत्तर भारतीयांना, मध्य प्रदेशींना, गुजरातींना, बंगालींना, पंजाबींना हाकलून देण्याचा आदेश काढला होता.

तर !

लेखक मयुरेशवैद्य यांनी सोमवार, 27/10/2008 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.bhojpuria.com/samachar/news.php?a=5691 वरील दुव्याबद्दलची बातमी आज एका चॅनलवर होती. ह्या लेखात बिहारींनी मुंबईतून पळून न येता तिथेच प्रतिकार करायला हवा होता वगैरेची भाषा केली आहे. वर कहर म्हणजे, राज ठाकरेंवर प्रत्येक घरातून निदान एक तरी कोर्टकेस दाखल करण्याचाही सल्ला दिला आहे. आजच बिहारचे सर्वदलीय मंत्री राजच्या विरोधात पंतप्रधानांना भेटणार आहेत. एक बिहारी युवक ( हो .. तो बिहारी आहे, म्हणजे तो गुंड नसणारचं मग तो बंदूक घेऊन लोकांना मारण्याची धमकी देत बसमध्ये फिरला तर काय झालं ?

पहाट

लेखक दत्ता काळे यांनी सोमवार, 27/10/2008 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
दीप निवले रात्रीचे पहाटही अशी फुले केसातील मोगरयाचा गंध अजून, अजून खुले शब्द नव्हे ओठांवर नाजुकसे चांदणे टिपले जरी, परी ऊमले ओठांच्या स्पर्शाने लाजलीस जेव्हा तू वेड मला लागले श्वासातील गंधभान स्पर्शातच जागले पहाटेला भेटण्यास रात्र परत आली उगवली पुन्हा फिरूनी क्षितीजावर चांदणी
Taxonomy upgrade extras