Skip to main content

रविन्द्र केळेकर यांना ज्ञानपीठ

लेखक अभिरत भिरभि-या यांनी सोमवार, 24/11/2008 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणी साहित्यिक रविन्द्र केळेकर यांना वाङमय क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ जाहिर झाला आहे. लोकसत्ताच्या आजच्या अंकातला हा एक लेख. केळेकरांना कोकणीसाठी मिळाला तरी त्यांचे लेखण मराठीत ही होत असते. त्यांच्या साहित्याचा हा अल्प आढावा. केळेकरांच्या साहित्याविषयी आणखी जाणून घ्यायला आवडेल. आणि केळेकरांच्या ह्या मताविषयी साधकबाधक चर्चा व्हावी असे वाटते.

श्रद्धा आणि सबुरी!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 24/11/2008 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
विधानसभा निवडणुकीचे नगारे जोरजोरात वाजू लागले होते. जागावाटप यशस्वीरीत्या पूर्ण झालं होतं. मतभेद मिटविण्यातही विलासरावांची कृष्णशिष्टाई यशस्वी ठरली होती. विलासरावांची तर या दिवसांत फारच धावपळ झाली होती. सकाळचा नाश्‍ता मुंबईत, दुपारचं जेवण दिल्लीत, संध्याकाळचा चहा मंत्रालयात, तर रात्रीचं जेवण कुणा समर्थकाच्या घरी, अशी गडबड सुरू होती. कॉंग्रेसची बहुतांश ठिकाणची प्रचाराची तयारी पूर्ण झाली होती. फक्त उमेदवार ठरायचे बाकी होते. "कार्यावर आधारितच उमेदवारी' हा निकष असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, अगदी अर्धा तास बाकी असतानाही कॉंग्रेसची उमेदवारांची यादी जाहीर झाली नव्हती.

दुसर्‍याच्या नेत्रातून जीवन पहावं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 24/11/2008 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आम्ही आमच्या आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो.आजगावला आमचा ब्राम्हणांचा एक वाडा होता.

पदर

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 23/11/2008 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे दोन महिन्यापुर्वीची घटना. संध्याकाळी ७ वाजता मोबाईल वाजला. दुस-या टोकाला एक मुलगी. आवाजावरुन काहीतरी किचकट प्रकरण आहे हे लक्षात आले. त्यांना लगेच भेटायला बोलवले. अर्ध्या तासात दरवाजावर आई आणि मुलगी हजर. आईचे डोळे तांबारलेले. बायकोने पाणी देउन भाजीच्या निमित्ताने पळ काढला. सर्व संभाषणात आई गप्प होती. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या त्या मुलीने सर्व कर्मकहाणी सांगितली. हे प्रसिद्ध घराणे. वाडा जाउन मोठी बिल्डींग बांधलेली. शेवट्च्या मजल्यावर १५०० फुटाचा ब्लॉक. घरात आजी आणि आजोबा. आजोबा दशग्रंथी ब्राम्हण. थोडक्यात सांगायचे म्हटले तर शुभं करोती संस्काराचे घर.

झणझणीत सांबार - सचित्र पाककृती (२९ छायाचित्रांसह)

लेखक पांथस्थ यांनी रविवार, 23/11/2008 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
सांबार मसाल्याची पुर्वतयारी: * दोन मध्यम आकाराचे कांदे * एक टोमॅटो * कोथींबिरीच्या ३-४ काड्या * १०-१५ काळ्या मिर्‍या * २ दालचिनी (१") * ६-८ लवंगा * १ चमचा हळद * २ चमचे तिखट * २ चमचे धने-जिरे पुड * ४ चमचे सांबार मसाला (माझी एक तामिळ सहकारी हा घरगुती मसाला कोइंबतुर येथुन आणते) * ४-५ सुक्या लाल मिरच्या

जगी सर्व सुखी असा कोण आहे .....

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी रविवार, 23/11/2008 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
खरेच आज कोण सुखी आहे ह्या जगात ? कितीही मोठी, उच्च पदावरील व्यक्ती असो, दुख: , चिंता काय पाठ सोडायला तयार नसतात. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. त्यामुळेच आज श्री. सत्य आईबाबा ह्यांचे शहरात आगमन होणार आहे हे कळताच, मोठ मोठ्या लोकांची दर्शनाला नुसती झुंबड उडाली होती. आम्ही सुद्धा मोठ्या हिकमतीने खास दरबारात प्रवेश मिळवला. (पेशव्यांचे रक्त खेळतय नसा नसात) हे वाक्य एकदा आम्ही एकाला ऐकवले होते, त्याने आम्हाला "मग तुम्हाला 'पेशवाई' मध्ये सगळे फ्री असेल ना?" असे विचारुन तप्त डांबरी रस्त्यावर चितपट केले होते. असो, खास दरबारामध्ये फक्त खास खास लोकांच्या स्वार्‍या विराजमान झाल्या होत्या.

शरमिंदा व्हायला इतर हजार गोष्टी आहेत!-कवी-लेखक सलील वाघ /मटा मधिल आजचा लेख.

लेखक अनामिका यांनी रविवार, 23/11/2008 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी 'संवाद' पुरवणीत 'थोडासा नाराज आणि बराच शरमिंदा!' असा लेख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चालवलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने लिहिला होता. या लेखावर कवी-लेखक सलील वाघ यांची ही सविस्तर प्रतिक्रिया .................... कोणी काहीच बोलत नव्हते. किरकोळ किरकोळ साहित्यिक लुटीपुटीची सेमी-लाडिक, तक्रारीसदृश्य विधाने करत होते पण कोणीच मोठा अणि महत्त्वाचा साहित्यिक याबद्दल बोलत नव्हता. आता चित्रे बोलले आणि त्यांनी कोंडी फोडली.