मैलाचा दगड
मिपावर बरेच काथ्याकूट होतात. त्यात बर्याच शाब्दिक मारामार्याही होतात. त्यात गैर काही नाही. परंतु, नुकतीच "बंगालच्या वाघीणी" ही चर्चा झाली. मला ती बर्याच दृष्टीने मैलाचा दगड ठरली अशी वाटते. इतरांची मते जाणून घ्यायला आवडेल.
पूर्वी साधारणतः असा एक क्रम होता-
स्वातंत्र्यलढ्यातील एखाद्या क्रांतीकारकावर अथवा एखाद्या घटनेवर लेख येणार. लेखात वा कुठल्यातरी प्रतिसादात संबंध असो वा नसो, गांधीजींचा उल्लेख येणार. गांधींवर तोंडसुख घेतले जाणार. उर्वरीत प्रतिसाद हे बव्हंशी "सादर प्रणाम", "तुमच्यामुळेच आम्ही आहोत" या छापाचे.
ह्याला छेद गेला तो वर उल्लेख केलेल्या लेखाने.
मिसळपाव