Skip to main content

मी वसंत मी वसंत..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 23/04/2009 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
शिशिरी मळभ दूर झाले, उत्तरायणी रवी आले, बेहोषला आसमंत, मी वसंत मी वसंत... खुलते आज कळीकळी, पानोपानी ही झळाळी, भ्रमराला ना आज उसंत, मी वसंत मी वसंत... ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे, पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत... आज तयाला भान नुरे, सुवर्णाचे नाजूक तुरे, राजस आम्र उन्मत्त, मी वसंत मी वसंत... धरा होती ती ल्यायली, दाट धुक्याच्या त्या शाली, सुवर्णरेखा ही दिगंत, मी वसंत मी वसंत... तृणांकुराचे हे थवे, आज भासती नवे नवे, पानगळीची उगा खंत, मी वसंत मी वसंत... भरून गेली किल्बिल सारी, विहंगाची उंच भरारी, सृष्टीची ही नशा जिवंत, मी वसंत मी वसंत...

दैव !!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 23/04/2009 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय निखील, कसा आहेस रे ? खुप दिवस झाले, तुला लिहीन , लिहीन म्हणतोय पण सालं लक्षातच राहत नाही ! आताशा फार विसरायला होतं मला. माफ कर मित्रा. तुला आठवतं आपली पहिली भेट झाली होती ती शाळेतल्या "स्मरणशक्ती" च्या परिक्षेच्या वेळी? नेहेमी सहजपणे जिंकणारा तु, यावेळी मात्र बाजी मी मारली होती. पण तु ते स्पोर्टिंगली घेतलंस आणि आपली ओळख झाली. पुढे या ओळखीचं हळु हळु मैत्रीत रुपांतर होत गेलं. ते दिवस कसे सुरेख होते ना ? शाळेत कुठलीही स्पर्धा असली कि आपल्या दोघांत चुरस सुरु व्हायची. मग तु जिंकतो का मी याचे अंदाज इतरांकडुन ऐकायला खुप मजा यायची.

दुष्काळ

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 23/04/2009 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
अधीर आर्त स्वरांनी पुसते धरा नभाला तो गंध तुझ्या स्मृतींचा सख्या कुठे निमाला... प्रीतीत रंगलेला कणा-कणात रुजलेला अपुल्या मधु-मिलनाचा मृदगंध कुठे हरवला... आठवते अजुनी भेट तुझी सौख्याची त्या भेटीत गुंफलेला स्नेहबंध कुठे गळाला... स्खलित जाहले पतिव्रता जरी मी मनात गुंतलेला तो स्पर्ष कुठे निमाला... व्याकुळ धरणी वरुणासाठी कृषक, पुत्र तिचा तोही पुसतसे वरदहस्त प्रभो, तव तो कुठे हरवला... विशाल

माझे नाव

लेखक निशिगंध यांनी गुरुवार, 23/04/2009 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
जोवर मी लहान होतो. म्हणजे शाळेत जात असे. तोवर मला माहे नाव मुळीच आवडत नसे. मला माझ्या आई बाबांचा खुपच राग येत असे. मला वाटायचे की, हे काय निशिगंध नाव आहे तेही मुलाचे. नाजुक मुलीचे असल्यासारखे. कधी जर जर आजारी पडलो तरी डॉक्टर साहेब हात लावायच्या अगोदर सुचवायचे की, तुझे नाव फारच नाजुक आहे ते बदल म्हणजे तु आजारी नाही पडणार. आणी मी नाईलाजाने एक जळजळीत नजरेने आई बाबांना खुन्नस द्यायचो. निदान निशिकांत तरी ठेवायचे. पण आता मला निशिगंध हेच नाव खुप आवडते. कारण फक्त एकच ते म्हणजे निशिगंधाचे फुल..ते मला खुप आवडते. पांढरे शुभ्र नाजुक असे ते फुल पाहील्यावर मला असे उगीच वाटते की मीच आहे.

कोलकोत्याच्या दादा

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 23/04/2009 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
एक तरी धाव होऊ दे कोलकोत्याच्या दादा.. मिशा तुझ्या वाढवून घे आणि मग दाखव अदा.. बांधून घे गार्ड तु नाहीतर सुटुन जाइल रे बाया बापे हसतील न बघताच 'नगमा' मात्र बघून रे…. पछाडून दे लाथाडुन दे चेंडू सगळे सोडून दे शर्ट काढ सांभाळून नायतर हाडांचा मुरब्बा दिसेल रे….. फलंदाजीचा काय भरोसा परखून घे तु जरा आवरासावरा करुन घे संघातून काढल तर रणजी खेळयला जायच ना रे….
Taxonomy upgrade extras

सेंटेड प्रेम..

लेखक jenie यांनी गुरुवार, 23/04/2009 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
सहज एक विरंगुळा म्हणून आणि आज कालची मूलं कशी विचार करतात या साठी ही कविता ...कवितेची सुरवात मी करते तुम्हाला काही सुचते का ते सांगा... पूर्ण आपण करुयात... रोज रोज तुला गुलाबाचे फुल द्यायला एक रुपाया भार पडतो माझ्या खिशाला रोज रोज भेळ -पुरी खायला लाज नाही वाटत मनाला?? काय होत तुला डबा घरुन आणायला??? रोज रोज फिरायला रि़क्षा लागते तुला थोडं फार चालताना काय पाय लागतात दुखायला दर महिन्याला तुला ड्रेस द्यायला काय बापाची जहागीरी समजते मला?? ------------- ----------- ------- -----
Taxonomy upgrade extras

मालिका...एक अत्याचार

लेखक अ-मोल यांनी गुरुवार, 23/04/2009 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मराठी वाहिन्यांवर विकृत मालिकांचा सुळसुळाट झाला आहे. अतिरंजित कथानकं, मेलोड्रामा, हिंदी मालिकांचे नको तितके अनुकरण आणि बिनडोक हाताळणी यामुळे कोणतीही मालिका पाहणे उबग आणणारे आहे. काही दिवसांपुर्वीपर्यंत त्यातल्या त्यात असंभव ही मालिका चांगली वाटत होती, मात्र आता त्यातही उगाळून फेस आणणं तर सुरु झालंच आहे, पण विकृतीचं ग्लॅमरायझेशनही होत आहे. बाकी वहिनीसाहेब, अवघाचि संसार, कळत नकळत आणि काय.... यांच्याविषयी बोलायलाच नको. या मालिकांमधली पात्रं दिसायला तुमच्या आमच्यातलीच असली, तरी इतके सराईतपणे गुन्हे करतात की विचारायलाच नको.

महात्मा फुल्यांचे फलज्योतिषविषयक विचार

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 23/04/2009 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
महात्मा फुल्यांचे फलज्योतिष विषयक विचार
फलज्योतिषाकडे पहाण्याच्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीकोनामध्ये उत्सुकता युक्त आदर असतो. कुतुहल असते. काहींच्या मते फलज्योतिषावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा जोपासणे. पण तरीही बहुतेकांच्या मते ते शास्त्र आहे.श्रद्धेपोटी काहीजण फलज्योतिषाच्या माध्यमाद्वारे आपला भविष्यकाळ ज्ञात करुन घेण्यासाठी यथाशक्ती,यथाबुद्धी प्रयत्न करतात.अशिक्षित अडाणी समाजामध्ये सुद्धा फलज्योतिषाचा उपयोग सोयरिक जुळवण्यासाठी केला जातो.

तू!

लेखक उमेश कोठीकर यांनी गुरुवार, 23/04/2009 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
तुझेच नाव स्वप्नांच्या ओठी "तू"च निघे मोती शब्दांच्या पोटी निळ्या या नभात भासे तुझे रूप पृथ्वी सर्व वाटे तुझेच स्वरूप! दिसे फक्त तूच नेत्री येई पाणी ऐकू येते फक्त नाव तुझे कानी आरशात तूच दिसते साकार एकांतही घेतो तुझाच आकार! तळ्यात चंद्र तुझेच बिंब फुलांत तूच दवाने चिंब होउनी श्वास जाई तू आत स्पंदते नित्य तू हृदयात मंदिरी मूर्तीत हसते तूच कणीकणी माझ्या वसते तूच!
Taxonomy upgrade extras