लेखकगोगट्यांचा समीरयांनी गुरुवार, 20/08/2009 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
जसवंत सिंग यांचे नवे पुस्तक २ दिवसांपूर्वी प्रकाशित झाले.
बहुतेक जणांनी ( मी ही) वाचले नसेल, पण भाजपा ने त्यांना प़क्षातुन बरखास्त केले.
गुजरात मध्ये पूस्तकावर बंदी आली, हि प्रतिक्रिया फारच आडमुठी वाटते .
आधी त्यांनी पूस्तक तरी नीट वाचावे.
आपल्याला काय वाटते?
लेखकयुयुत्सुयांनी गुरुवार, 20/08/2009 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
बळेच शब्दा वेठीस धरूनी भाव नाना वाकवितो
असामान्य वा असो अमान्य बसुनी कविता कवि वितो
बुध्दीची मम झेप नवी ही नेते बरं का दिगंतरी
पाहून तिजला भरेल धडकी प्रिय मित्रा तव हृदंतरी
ग्रहगोलांची अगणित सूत्रे अणुरेणूंची पण तशीच ती
विश्वाच्या व्यापाहून भयंकर जीवघेण्या त्या मात्रांची
रे प्रिय मित्रा हितगुज करण्या मार्ग नवा मी अनुसरला
झटापटीने कविता करता शुद्ध कशाची नुरे मजला
व्याकरणाची फिकीर नसे पण प्रासासाठी व्याकुळता
काकुळतीने पणास लावी पणजोबांचे(*) पुण्य आता
* माझे पणजोबा कै. विठ्ठल सीताराम गुर्जर हे मराठीतले जुन्या पिढीतील नामवंत साहित्यिक होते. कै. राम गणेश गडकर्यांचे ते जीवश्च कंठश्च मित्र.
लेखकविशाल कुलकर्णीयांनी गुरुवार, 20/08/2009 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
लपवणे ते झाले सुरू, माझेच माझी यातना
राम न उरला काही, आरंभीच संपली कथा !
नसे अभंग नामयाचा, नच विरहिणी मीरेची
साकळली वेदना सारी, मी रचितो माझी गाथा !
विसरल्या सार्या श्रुती, अश्रुत भिजल्या आर्या
जखमा सार्या ओल्या, मी घोकतो जुन्याच संथा !
ना स्मरे मंत्र आता, ना आठवते मज हरिनाम
वेदनांचे हे वेद माझे, विसरल्या त्या जून प्रथा !
हे भोग मम प्राक्तनीचे, नकोत पळवाटा नव्या
संपते जिथे दु:ख जुने, जन्मा येते नवी व्यथा !
विशाल.
लेखकअनामिकयांनी गुरुवार, 20/08/2009 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
फोटो जालावरून साभार
आज श्रावणी अमावस्या, म्हणजे पोळा. घरच्या बैलांची पुजा करून त्यांच्या कामाबद्दल त्यांना धन्यवाद द्यायचा दिवस. महाराष्ट्रातल्या संपुर्ण ग्रामीण भागात आजही आनंदाने साजरा होणारा सण. हा सण येतोही अगदी श्रावण महिण्याच्या शेवटी, जेव्हा शेतातली पेरणीची कामे संपलेली असतात. शेतकर्याच्या डोक्यावरचा भार बैलांच्या मदतीने पुर्ण हलका झालेला असतो.
लेखकयुयुत्सुयांनी गुरुवार, 20/08/2009 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
Social Cohesion and Human Nature या बर्ट्राण्ड रसेलच्या निबंधाचा स्वैर अनुवादटीप - निसर्गाचे नियम समाजाच्या नियमांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात. निसर्गाला दडपायचे असेल तर माणसाला फार मोठी किंमत मोजावी लागेल. हा या रसेलच्या निबंधातील गर्भित इशारा मला खूप भावला म्हणून मी त्याचा अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. हा निबंध वाचताना आजच्या संदर्भांच्या अनुषंगाने काही विचार डोक्यात आले ते तळटीपा म्हणून दिले आहेत. या टीपा मूळ निबंधात नाहीत. - राजीव उपाध्ये
मानवासहित सर्व समाजप्रिय प्राण्यामध्ये सहकार आणि एकी या पायाभूत प्रेरणा आहेत.
लेखकलिखाळयांनी गुरुवार, 20/08/2009 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी !
आज बैलपोळा ! सर्व नवरोंबांसाठी आज धुणी-भांडी, केर-वारे या पासून विश्रांतीचा दिवस.
मस्त पुरणपोळी खाऊन लोळत पडण्याचा दिवस ;)
समस्तांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा :)
आज आपण दिवस कसा घालवणार ते (सांगण्यासारखे असेल ;) तर) सांगा.
आणि बैलपोळ्याला बैलाला सजवतात तर आपण काही खास नट्टापट्टा केला असेल तर ते सुद्धा सांगावे :)
--लिखाळोबा