Skip to main content

माझा झंपक पणा

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 23/09/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी सेशन जरासे लांबलेच. लोकांचे प्रश्न जसे संपतच नव्हते. सगळे आटोपुन पुण्यातून निघायला रात्रीचे साडेनऊ वाजले. स्वारगेटवर येऊन बस पकडली. बसने कात्रज पार केले कंडक्टरने तिकिटे सर्वाना दिली गेल्याची खात्री केली आणि स्वतःचे हिषोब संपवुन गाडीतले दिवे बंद केले. सेशन जोरदार झाला होता थोडे थकल्यासारखे झाले होते पण एखादे सेशन मनासारखे झाल्यानन्तर जो उत्साह असतो तसाच उत्साह वाटत होता.त्यामुळे झोप लागायचा प्रश्नच नव्हता. काही वाचायचे तर अंधारात वाचायचे कसे. मी सेशनची उजळणी करत बसलो. एका श्रोत्याने एक मस्त प्रश्न विचारला होता. मी थोडासा अडखळलोच होतो त्यावर .

साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...)

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 23/09/2009 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...) प्रिय ताई, माझ्या डोक्यातून (भूत कॉस्टींगचे...) काही उतरत नाही. आता तर सगळेच जण भुतांबद्दल न भिता काहीतरी लिहीत आहे. म्हणून मी पण माझ्या घंद्यातून वेळ काढून हे पत्र लिहून तुझा वर्तमानपत्रातून जाहीर सल्ला मागत आहे. तु इतर टाईमपास सल्ल्याप्रमाणे मला सल्ला देणार नाही ही अपेक्षा बाळगून आहे. असो. (मला माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राची पाल्हाळ लावायची सवय लागली आहे.

मी मी मी

लेखक प्रभो यांनी बुधवार, 23/09/2009 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार.....मस्त सुट्टीचा वार ..सकाळचे दहा-अकरावाजले होते. उनं उंडारायला चालू झाली होती. बेडरूमची खिडकी उघडीच राहिली होती बहुतेक काल रात्री. त्यातूनच उनाचे कवडसे मला झोपेतून जागं करण्याचा प्रयत्न करत होते. पडदाही फडफडत होता. हलकिशी हवा पडली होती. माझ्या कानाजवळचं गजराचं घड्याळही (तिच्यायचं ते घड्याळ...बारावी पास झलो नसतो तर ते पण नसतं मिळालं) टिक-टिक-टिक-टिक-टिक करून माझ्या साखरझोपेचं (सकाळी दहा-अकरा वाजता ????...आणी ही सकाळ होय???) खोबरं (ओलं का सुकं ..माहीत नाही बुआ) करण्याच्या प्रयत्नात होते. अचानक खनSSSSSन असा आवाज झाला. एका क्षणात झोप होत्याची नव्हती झाली.

आईस्क्रीम वडा

लेखक स्वाती राजेश यांनी मंगळवार, 22/09/2009 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
लंडन मधे एका भारतीय हॉटेल मधे हा पदार्थ खायला मिळाला...http://misalpav.com/node/1291 इथे याअगोदर चर्चा झाली आहे....पण हा प्रकार जरा वेगळा वाटला म्हणून जरा ओळख काढून, ज्या शेफ ने हा बनवला त्याला गाठला आणि त्याच्या कडून रेसिपी मिळविली (जरा मिन्त्या कराव्या लागल्या :))..पण मिळाली....त्याची कृती सुद्धा वेगळी आहे...ती खालीलप्रमाणे.... फोटो दिला तर कोणीतरी गचकेल...म्हणून सर्वांच्या तब्येतीच्या काळजी मुळे हा निर्णय घेतला...

पाणीपुरी

लेखक भोचक यांनी मंगळवार, 22/09/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
पाणीपुरी हा काय पदार्थ आहे? 'पाणीपुरी' आणि तीही 'खायची'? छ्या. पुरीत भरलेलं पाणी प्यायचं की खायचं? आणि त्यातलं पाणी महत्त्वाचं की पुरी? त्या क्षुद्र पातळ पुरीला खायचं काय? (आणि त्या पुरीतल्या पाण्यात असतं तरी काय? नुस्तं आंबटगोडपणा. उगाचच, दिवस गेलेल्या बाईसारखं वाटतं.) खाणं म्हणजे कसं असावं, ज्यातून आत्मानंद, परमात्मानंद मिळाला पाहिजे. एकेक घास खाता खाता परमोच्च आनंदाची प्राप्ती झाल्याचा फील आला नाही तर ते खाणं कसलं? त्यामुळे आंबटगोड पाणीपुरीविषयी अस्मादिकांची मतं अशी 'तिखट' होती. पण इंदूरला आलो नि पुदिन्याचं पाणी पिऊन दुसर्‍या दिवशी पोटाचं जे होतं, तसे सगळे समज-गैरसमज 'स्वच्छ' झालेत.

आणि तिथे भारतीय गरुड उतरला ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 22/09/2009 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
चीनच्या अतिक्रमणाच्या पार्श्वभुमीवर भारतीय वायुदलाने लद्दाख येथील अत्यानुधिक न्योमा विमानतळावर एक नवीन धावपट्टी तातडीने बांधुन घेतली आहे. चीनच्या हेलिकॉप्टर्सनी नुकताच हवाई हद्दीचा भंग करत खडकांवर लाल अक्षरांत मँडरिन भाषेमधून साइनबोर्ड रंगवल्यानंतर तातडीने हालचाल करत भारताने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. आतापर्यंत इथे फक्त हेलिकॉप्टर्स उतरत असत. पण नुकतेच वायुदलाचा शौर्यचक्र विजेता चमू, ग्रुप कॅप्टन एस. सी. चाफेकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ए एन ३२ जातीचे मालवाहु विमान न्योमा विमानतळावरील नव्याने बांधण्यात आलेल्या धावपट्टीवर उतरवले.

बाबा नवाथे!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 22/09/2009 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
तसे बाबा नवाथे जॉली होते. वयस्करच होते. ८० प्लस म्हणा ना! अलिकडेच वारले! सोसायटीत सर्वांशी तसे मिळून मिसळून वागायचे. गच्चीत जायच्या जिन्यावर नेहमी बसलेले असायचे. पण सोसायटीतलं पब्लिक नेहमी त्याची थट्टा-मस्करीच करायचं. आणि ती करताना बर्‍याचदा त्यांच्या वयाचा मुलाहिजा राखला जात नसे. पण बाबा नवाथे कधी कुणावर रागावायचे नाहीत! पुढे पुढे तर लोकं त्या म्हातार्‍याची जास्तच भंकस करू लागले, टेर उडवू लागले. नाही, तसं बाबांचही चुकायचं. म्हातार्‍याला बसण्या-उठण्याची जराही आदब नसे. उघडेबंब, आत लंगोट नसलेली चट्टेरीपट्टेरी हाफ चड्डी घालून बघावं तेव्हा म्हातारा गच्चीत जायच्या जिन्यात बसलेला असायचा.

खळबळजनक बातमी... हे असे आणखी किती दिवस चालणार?

लेखक मड्डम यांनी मंगळवार, 22/09/2009 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
खालची बातमी वाचा हे असे आणखी किती दिवस चालणार? गँगरेपनंतर महिलेला जीवंत जाळले मुंबई मुंबईच्‍या एन्टॉप हिलमध्‍ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार करून त्यानंतर तिला आगीत टाकून दिल्‍याची खळबळजनक घटना घडली असून आगीत मोठ्या प्रमाणावर भाजलेल्‍या या तरुणीचे येथील सायन हॉस्पिटलमध्‍ये उपचारा दरम्‍यान निधन झाले आहे. या 24 वर्षीय महिलेला दोन मुले असून पोलिसांनी या क्रुर घटनेतील चार आरोपींना अटक केली आहे. या चार आरोपींपैकी एकाचे या महिलेवर एकतर्फी प्रेम होते त्‍यातून त्याने हे कृत्य केले आहे.

जबरदस्त

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 22/09/2009 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
"पश्या रात्री माझ्याकडे झोपायला येतोस का आज?" नंदु अगदी अजीजीने विचारत होता मला. "साल्या कोणी ऐकले तर काय म्हणेल ? खी खी खी" मी तेव्हड्यात नंद्याची खेचुन घेतली. "आय एम सिरीयस यार. आई बाबा बालाजीला गेल्यापासुन ३ दिवस मी काढले कसे तरी पण एक तर नविन घर आणी त्यातुन आज अमावस्या...." "बर बर चल दस्ती बंद कर आता, १०.०० पर्यंत येतो मी बाटली घेउन" मी नंद्याला डोळा मारत म्हणालो. साधारण १०.३० च्या सुमारास मी नंद्याच्या घरी पोचलो. "का रे येव्हडा उशीर झाला ?" "यार नंद्या, तुमच्या सोसायटीच्या कॉर्नरला कोणीतरी माणुस अचानक रस्त्यातच मरुन पडलाय रे, भवतेक त्याला जोरदार हार्ट अ‍ॅटॅक आलेला दिसतोय.

भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 22/09/2009 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११२४ मूळ इंग्रजी लेखः ग्लोबल वॉर्मिंग: मीन्स टु अरेस्ट मूळ इंग्रजी लेखकः गोरा चक्रबोर्ती २६ जुलै २००६ रोजी एकाच दिवसात संततधार ९४४ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या काही वर्षांत कॅटरिनासारख्या वादळांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. डिसेंबर २००६ मधे दोहा शहर अनैसर्गिकरीत्या, पावसासहित आलेल्या वादळाने पंगुवत झाले होते. गेल्या वर्षी, २००७ साली, राजस्थानच्या वाळवंटी क्षेत्रांत, जैसलमेर जिल्ह्यात हिरवळ उगवली होती.