Skip to main content

[ज्योतिष] ४ जानेवारी २०११ चे सूर्यग्रहण कुणाला शुभ ठरेल?

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 24/12/2010 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ४ जानेवारी २०११ रोजी होणारे काही व्यक्तीना भाग्यदायी ठरायची शक्यता आहे. यापैकी ज्यांना ते विशेष भाग्यदायी ठरेल त्यांच्या जन्मतारखा पुढे देत आहे.

यमक

लेखक शरद यांनी शुक्रवार, 24/12/2010 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
यमक आज एका शब्दालंकाराची माहिती घेऊ,(मिसळपाव काही शाळा नाही की जेथे उपमे नंतर उत्प्रेक्षा यावयालाच पाहिजे.) खरे म्हणजे यमक हा अनिर्वार्य अलंकार नाही. संस्कृतमध्ये तर नाहीच नाही, पण मराठीत मात्र तो पहिल्यापासून लोकप्रिय [की कवीप्रिय म्हणू ? ] आहे, अट्टाहासाने निर्यमकी कवितेला सुरवात करे पर्यंत यमक नाही म्हणजे कवीची शब्दसंपत्ती अथवा प्रतिभा कमी दर्जाची आहे अशीच समजूत होत असे.

मदत हवी आहे - पुण्यनगरी - स. पे. मध्ये रहाण्याची सोय.

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 24/12/2010 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी १६ जनेवारी ते २४ जानेवारी दरम्यान पुण्यात सदाशिव पेठेतील चाणक्य मंडलच्या अभ्यास महोत्सवासाठी येणार आहे. या १० दिवसांसाठी राहण्याची सोय कुठे होऊ शकेल याची माहिती देण्याची नम्र विनंती मिपाकरांना करतो. माझ्या अपेक्षा: १. रुम अन्य एक दोन व्यक्तीं सोबत शेअर करण्याची तयारी आहे, मात्र डॉर्मेटरी नसावी. २. अंघोळीसाठी गरम पाण्याची उपलब्धता असावी. ३. शक्यतो सदाशिव पेठेतच हे ठिकाण असावे, मात्र ऑटोने किफायतशीररित्या जाता येईल इतपत दूर असल्यास चालेल. आणि सर्वात महत्त्वाचे: ४.

साहित्य संमेलन का उधळवता ?

लेखक अमोल देशमुख यांनी शुक्रवार, 24/12/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
तब्बल २२ वर्षांनी ठाण्यामध्ये अखिल भारतीय साहीत्य संमेलन होत आहे, ठाणेकरांसाठी ही गौरवाची गोष्ट आहे. ठाणेकरांनीही त्याची जोरदार तयारी केली आहे, संमेलनाच्या संयोजकांनी साहीत्य संमेलनातील मंचाना, प्रवेशव्दारांना थोर साहीत्यीकांची नांवे दिलेली आहे, त्यात सावरकरांपासुन ते शाहीर विठ्ठ्ल उमाप यांच्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे, असे हे सर्वसमावेशक संमेलन काही विषीष्ट जातीयवादी संघटनानी केवळ क्रिडा संकुलाच्या नावावरुन संमेलन उधळवुन लावु अशी धमकी दिली आहे.

प्रार्थना ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 24/12/2010 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रार्थनेचे सूर येतात दूरवरून लांबून ..पहाडातून किती नि कसे छान वाटते हिरव्या माळरानावरून तरंगत येतात ते दैवी सूर मन कसे शांत नि शांत होते बघा एकदा अनुभवून पाखरांचा स्वर त्यांचा वावर झाडाचे असणे फुलणे निळ्या निळ्या डोंगरावरून येणारी झुळूक ही सगळीच प्रार्थनेची टिंबे,उदगारचिन्हे ,वेलांट्या नि मात्रा नि कडवी मन जाते हरवून बघा एकदा अनुभवून हिरव्या मैदानावचे गुरांचे चरणारे कळप ती शांत नागमोडी नदी पाखरांचे आवाज फुलपाखरांचे फुलाभोवती गिरकत राहणे हेपण असतात प्रार्थनेचे सूर बघा एकदा अनुभवून देवाजवळचा दिवा समयी ..निरांजन त्याचा मंद प्रकाश किती पवित्र वाटतो घ्या मन
काव्यरस

नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 24/12/2010 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी कोणी म्हणेल, "आ गाय मुझे मार" असा हा उद्योग आहे. पण रोज मरे त्याला कोण रडे? मेलेले कोंबडे आगीला भीत नसते. तेव्हा मी प्रथम आगीत उडी घेतो! १) तोंडात तीळ न भिजणे. सततची बडबड करूनही ह्यांच्या घशाला कोरड कशी पडत नाही, हे काही उमगत नाही. साधी आज घडलेली घटना सांगायची असेल तर दोन महिन्यापुर्वी घडलेल्या तिसऱ्यांच्या गोष्टी पासून सुरवात करून पूर्ण गावाच्या गप्पा ऐकवून शेवटी आज काय घडले ते सांगणारच नाही. फोनवर नुसता निरोप कधीच सांगणार नाहीत. एकदा फोन हातात घेतला, की दोन तासांची निच्छिती! २) उड उड ग चिउ.

दादोजी कोंडदेव

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 23/12/2010 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे - लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटवून त्याच्या जागी शहाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज (गुरुवार) घेण्यात आला. लाल महालात बाल शिवाजी सोन्याच्या नांगराने पुण्याची भूमी नांगरित असल्याचे समूह शिल्प काही वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. त्यामध्ये दादोजी कोंडदेव यांचे शिल्पही उभारण्यात आले आहे. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढून टाकण्याबाबत पुण्यातील संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही होत्या. त्या पार्श्‍वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला असावा. सकाळ पेपरातली बातमी

भ्रष्ट भारतीय पत्रकारिता

लेखक बेभान यांनी गुरुवार, 23/12/2010 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच देशाला हादरवून ठेवलेल्या २जी घोटाळ्याबाबत मिसळपाववर उदासिनता ? मला यावर बी.बी.सी.वरचा (http://www.bbc.co.uk/blogs/thereporters/soutikbiswas/2010/11/indian_medias_credibility_crisis.html) सौतिक बिस्वास यांचा हा लेख मिपाकरांबरोबर शेअर करण्यास आवडेल. त्यालेखावरील प्रतिसाद वाचण्यास विसरू नका. भारतीय भ्रष्ट सरकारचे पत्रकारितेसोबत असलेले साटे-लोट्याचे संबंध यातून बाहेर आले.