Skip to main content

चेतनची शोकांतिका

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 20/07/2011 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या व्यक्तिचे विचार, त्याचे महात्म्य जगाला कळतच नाही. सॊक्रेटीसला त्याच्याच समाजातील विद्वान ओळखू शकले नाहीत, ज्ञानेश्वर आदी भावंडांचे मोठेपण तर त्यांच्या जन्मगावातील लोकांनाच कळले नाही.

माझ्या बागेतील फुले.

लेखक ज्योति प्रकाश यांनी बुधवार, 20/07/2011 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढी एकादशी झाली.वारकर्यांप्रमाणे फुलांनीही पंढरीची वारी संपवून आता फुलायला सुरुवात केली. आमच्या बागेत सध्या कवठी चाफा,ब्रह्मकमळ्,कमळ्,जास्वंद ही फुले फुलायला लागली.त्याचे काही फोटो देत आहे. १)हा कवठीचाफा. 2)ही देवपुजेसाठी काढलेली कवठीचाफ्याची फुले. 3)हे ब्रह्मकमळ्.दोन दिवसामध्ये एकूण ८८ फुले फुलली होती.झाड फुलांनी भरून गेलं होतं.म

भार गेला, शीण गेला, अवघा झाला आनंद.....

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 20/07/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
अप्पा गेले. नाही विश्वास बसत अजून. अप्पा जाणं कसं शक्य आहे? अहो आत्ता उठतील आणि फिरायला जातील, भगवदगीतेतील श्लोक म्हणतील, नातू- नातींशी गप्पा मारतील, तब्बेतीची चौकशी करायला आलेल्याचीच काय चाललंय म्हणून चौकशी करतील, हसत हसत फिरकी घेतील, एखाद्या गोष्टीबद्दल सल्ला न मागता, न विचारता देतील, असे कसे जातील? नाही. खरंच अप्पा गेले. जीवन जगावं कसं आणि मरणाला स्वीकारावं कसं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अप्पा. पु ल देशपांडे म्हणाले होते, ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय उरले नाहीत. माझं सुदैव की असे पाय मला,आम्हाला लाभले.

पुणे पारपत्र कार्यालय: एक सुखद(?) अनुभव

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 20/07/2011 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच पुण्यात कामानिमित्त जाण्याचा योग आला. हा योग आला नसता तर मी एका दुर्मीळ अनुभवला मुकलो असतो. या एका अनुभवामुळे मला अध्यात्मीक उन्नत्तीचा साक्षात्कार झाला. सहजयोग , विपश्यना , सिद्ध समाधी योग ( एस एस वाय) आर्ट ऑफ लिव्हिंग, ज्ञानेश्वर , तुकाराम , आणि रजनीश ( ऑब्झर्व्ह द ऑब्झर्व्हर) या सर्वांच्या सांगण्याचा एकाचवेळेस प्रत्यय आला. आणि म्या पामराची अवस्था भक्ताला देव भेटल्याचा साक्षत्कार व्हावा काहिशी तैसीच झाली.त्याचे असे झाले मला पारपत्रा संबन्धात मला पुण्यात पारपत्र ( पासपोर्ट ) कार्यालयात जावे लागले. पाऊस अक्षरशः धो धो पडत होता. त्यात अजिबात कंजुशी नव्हती.

वरचा "सा"

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 20/07/2011 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमच्या लग्नाचा आठवा वाढदिवस ..... आज आमच्या संसाराच्या सुरावटीने वरचा "सा" गाठला ... पहाटे पहाटे उगाच मला पल्लवी जोशी चा भास झाला ... आणि ती कर्ण कर्कश्श आवाजात ओरडली "एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, वरचा "सा", वाः क्या बात है !". मी आपले सगळे स्पर्धक करतात तसे खोटे खोटे "हि हि हि, धन्यवाद" वगैरे केले ... आणि उठलो. पहिले तर गेल्या आठ वर्षातले सगळे चढ उतार समोर परीक्षक म्हणून उभे होते ... अनेक वेळा डेनजर झोन मधून बायकोच्या साथीने मी शिताफीने बाहेर आलो ... कित्येक वेळा फ़क़्त तिच्याच मतांचा आधार होता. दिवसाची अशी अपेक्षित सुरुवात झाल्यावर कसे अगदी routine मध्ये असल्यासारखे वाटते ...

मरणाची अवस्था

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 20/07/2011 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
विषय तसा बोजड, सर्वसामान्यांना न आवडणारा आहे. या पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक सजीव कधीना कधी मरतोच. त्याच्या मरण्याच्या तर्‍हा, कारणे वेगवेगळी असू शकतात. पण होणारा मृत्यू एक शाश्वत घटना असते. एकांतात मनात मृत्यूविषयी विचार कधीकधी येतात. रातीच्या वेळी अर्धवट झोपेत कधीकधी मरतांनाची स्थितीची कल्पना येवू शकते. माझा झोपेत श्वास अडकतो. झोपेत चुकून छातीवर झोपल्या गेले तर हमखास असे होते. मोठ्याने ओरडून जागे व्हावे लागते. नेटवर पाहिले असता जीभ मागे जावून श्वासमार्गात अडथळा आणते असे काहीतरी आजाराचे स्वरूप आहे.

गुगल वर मराठी यावी म्हणून मागणी

लेखक निनाद यांनी बुधवार, 20/07/2011 05:48 या दिवशी प्रकाशित केले.
गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषांतराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन मागणी बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे. आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे.

मेदुवडा

लेखक गणपा यांनी बुधवार, 20/07/2011 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली किचन मध्ये जाउन काही खास बनवण्याचा उत्साह नसतो. पण दुपारी एका मित्राने फोन केला. फोनवर माझ्या ब्लॉगच बरच कौतुक केल. (आमच विमान लगेच हवेत.) मग त्याने हळुच पिल्लु सोडलं की तो संध्याकाळी घरी येतोय. (हवेतल्या विमानाच क्रॅश लँडिंग.) आता आयत्या वेळी काय करावं बरं? थोडा वेळ डोक खाजवल्यावर संध्याकाळच्या खादाडीसाठी मेदुवडे करायच ठरवलं. लंच टाईम मध्ये घरी जाउन डाळ भिजत घातली.

पंढरीची वारी: मूल्य शिक्षण व व्यवस्थापन अभ्यासाचे अद्वितीय माध्यम.डा. संजय होनकळसे

लेखक dr sanjay honkalse यांनी मंगळवार, 19/07/2011 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
पंढरीची वारी: मूल्य शिक्षण व व्यवस्थापन अभ्यासाचे अद्वितीय माध्यम.डा. संजय होनकळसे :M.A.,M.Phil.,M.D.,M.Com.,LL.B. भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे .भारतात संस्कृतीची गुंफण समाज व धर्म यांच्याशी सांगड घालून शास्त्रोक्त पद्धतीने सण, उत्सव, व्रत वैकल्ये, तीर्थाटन साजरी होतात व याला पारंपारिकता आहे. एवढी विविधता व परंपरा इतर कुठल्याही देशात व धर्मात आणि ती ही शास्त्रोक्त बैठकीवर आधारलेली आढळत नाही. तीर्थाटन, शिक्षण व निरीक्षण हे भारतात परंपरेने तीन महागुरू म्हणून संबोधले जातात. तीर्थे ही ऊर्जास्त्रोत मानली जातात. भारतातीय इतिहास व संतही याचे समर्थनच करतात.

ब्राऊ-२

लेखक गवि यांनी मंगळवार, 19/07/2011 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
3