Skip to main content

अतिशय गाजलेलं भंपक पुस्तक

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 17/08/2011 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच बहुचर्चित अल्केमिस्ट हे पुस्तक वाचलं. पाऊलो कोएलो यांच्या पुस्तकाचं जगभरात प्रचंड कौतुक झालेलं असून त्याच्या अनेक भाषांत कोट्यावधी प्रती विकल्या गेल्या आहेत (अशी माहिती सदर पुस्तकाच्या शेवटच्या पृष्ठावर होती). याचं अजिबात आश्चर्य नाही की अशी पुस्तकं लिहीली जातात. याचं देखील आश्चर्य नाही की अशी पुस्तकं छापली जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक अशी पुस्तकं पैसे (आणि त्याहून ही मुल्यवान असा वेळ) खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर अनेक ठिकाणी छापून आलेल्या या कादंबरीच्या अवास्तव कौतुकाला बळी पडूनच मी या कादंबरीच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला.

टून

लेखक कोदरकर यांनी बुधवार, 17/08/2011 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
cartoon

पंख मोकळे नभात..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 16/08/2011 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाच जन्म मिळतो, घेउ दे मला जरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा गर्भ राहिला म्हणून, माय-बाप हर्षिले वाटले जसे अकाश बोट एक राहिले मास हे नऊ असे बहरु दे मला जरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा जन्मण्याअधीच मी, 'गुन्हा'च जाहले कशी माय! सावली तुझीच, वाढते तुझ्या कुशी अंतरी तुझ्या निवांत, पाहते चराचरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा "मी न भार!' सांगतेय, मांडते अकांत मी 'स्त्रीच जाहले म्हणून, का तुम्हा नकोय मी?? मी तुझाच श्वास माय, दे तुझाच आसरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा मी नसेन तर जगात पाळणा हलेल का? माय अन बहीण..
काव्यरस

अण्णा हजारे

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 16/08/2011 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही एकटे नाही आता, साथीला आम्ही सारे आहोत. एकच अण्णा नाही आता, सारे अण्णा हजारे आहोत. वावटळ आहे वादळ आहे अन अण्णांचे पायदळ आहे तुम्हा वाटले आम्ही सारे संध्याकाळचे वारे आहोत दिशाभुल करण्या अमुची, तु ध्रुवाला लपवले आहे ठावुक नाही तुम्हाला आम्ही सारे ध्रुव तारे आहोत (मिसळपाव च्या अण्णा हजारेंना पाठिंबा देणार्‍या सर्व सभासदांना नम्र विनंती आहे, कि या कवितेत आणखी कडव्यांची भर घालावी अन हि कविता जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. मी या कवितेला हक्कमुक्त करत आहे.)

सणांचे नैवेद्य व फराळाचे प्रकार २) नारळी पौर्णिमा - ओल्या नारळाची करंजी

लेखक जागु यांनी मंगळवार, 16/08/2011 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे नारळी पौर्णिमेच्या दिवशी ओल्या नारळाच्या करंज्या करण्याची प्रथा आहे. साहित्य : पुरणः १ ओला नारळ खरवडून पाव किलो गुळ खसखस चारोळी/काजु/आक्रोड/मनुका वेलची/केसर तुप पारी: गव्हाचे पिठ अर्धा किलो १ चमचा रवा चिमुटभर साखर मिठ तेल पहिला गव्हाच्या पिठात मिठ, रवा, साखर टाकुन घ्या मग मिसळून २ चमचे तेलाचे मोहन (एका भांड्यात तेल तापवुन ते पिठावर ओता) टाका. आता थोडे थोडे पाणी टाकत पिठ घट्ट मळा.

हिरव्यागार सृष्टीच सहवास--शिवथरघळ

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 16/08/2011 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
हिरव्या डोंगरावर पांघरलेली पांढ-याशुभ्र ढगांची चादर , डोंगरातून झेपावणारे शुभ्र धबधबे ,हिरव्यागार सृष्टीचा सहवास आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनाला नवी चेतना देणारा अध्यान्माचा स्पर्श ....हे सारं अनुभवायचे असेल तर शिवथरघळीसारखे सुंदर ठिकाण नाही.समर्थांनीही ज्याचे वर्णन विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे , अशा शब्दात केलेले आहे त्याची अनुभुती येथे आल्याशिवाय मिळत नाही.दासबोधाची जननी असणारी शिवथरघळ पहावी ती पावसाळ्यातच !.दाट वनराई मध्ये नजीक असणा-या धबधब्याशेजारीच शिवथरघळ आहे .सुंदरमठ असे यथोचित या ठिकाणाला नाव आहे. घळीकडे घेऊन जाणारा प्रवासही अत्यंत सुखकर.हिरवीगार फुलले

"संभवामि युगे युगे" असे वचन देऊन गेलेले भगवान श्रीकृष्ण अण्णांच्या रूपात आले आहेत!

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 16/08/2011 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीची कैरोच्या दिशेने वाटचाल? अलीकडे पैसे खाऊन ते पैसे स्विस आणि इतर बँकांत ठेवलेल्या पैशांचा हिशेब करताना त्यात इतकी शून्ये असतात कीं दोन्ही हाताचीच काय पण सोबत दोन्ही पायाची बोटे सुद्धा पुरत नाहींत! आताशी तर हे चोरलेले पैसे शून्ये न वापरता 10‌^6, 10^8, 10^10 असे लिहायची गरज भासू लागली आहे. लहानपणी शिकलेले (पण कधीही न वापरलेले) अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंख, महाशंख, परार्ध असले एकक (units) नव्याने वापरावे लागत आहेत. अगदी अलीकडचे गुंडांनी वापरलेले "पेटी", खोका" हे शब्दही अपुरे पडत आहेत.
काव्यरस

अण्णांचे लोकपाल बिल v/s सरकारी लोकपाल बिल

लेखक उदयन यांनी मंगळवार, 16/08/2011 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=9619669 अण्णांचे लोकपाल बिल आणि सरकारी लोकपाल बिल हे दोन्ही यात आहे... दोघांचे अवलोकन करण्यात यावे.. यात मुख्यतः संघर्ष खालील प्रमाणे १) प्रकरण ७ मधे.... पंतप्रधान, संसद सदस्य आणि न्यायमुर्ती यांच्या विरोधात कोणाला ही खटला आणि तपास सुरु करण्या पुर्वी खंडपीठाच्या ७ सदस्यी समिती ची परवानगी घ्यावी लागेल.. अण्णांच्या लोकपालात कोणाविरुध्द ही तपास आणि खटला भरता यावा.. २) प्रकरण ८ मधे.. अण्णांच्या लोकपाला मधे..लोकपालाला हवे असल्यास संशय असल्यास तो संबधीत व्यक्तीच्या घराच

मुलगी का नको?

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 16/08/2011 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला. मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते.पण समाजाचा मुलीबद्दल असलेला दृष्टीकोन लक्षात घेताना काही गोष्टी लक्षात येतात. ० मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही.