Skip to main content

बाप्पाचा प्रसाद्-पंचखाद्य.

लेखक ज्योति प्रकाश यांनी रविवार, 04/09/2011 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणात सध्या गणपतीची धामधूम सुरु आहे.रोज वेगवेगळा नैवेद्य.बाप्पाच्या आगमनाने घर भरलेलं आहे. पंचखाद्य हा बाप्पाचा खास प्रसाद्.आज त्याची रेसीपी. आमच्या घरी विराजमान झालेले गणपती बाप्पा.

मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 04/09/2011 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत......

"बॉडीगार्ड"

लेखक स्पा यांनी रविवार, 04/09/2011 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय सलमान जी खान यांचे wanted , दबंग, आणि रेडी हे चित्रपट माझ्यासारख्या अभागी माणसाने चित्रपटगृहात जाऊन न पहिल्याने जे पाप माझ्या डोक्यावर चढलेल होत, त्याच क्षालन करण्याची संधी परमेश्वराने मला "बॉडीगार्ड" च्या रूपाने दिली आहे, असे माझ्या हापिसातल्या मित्रांनी जेंव्हा मला समजावून सांगितले तेंव्हा मी सुद्धा भारावून जाऊन त्यांच्या बरोबर चित्रपट केंद्रात जाऊन चित्रपट बघण्यास तयार झालो, सलमान च्या डबल अश्या आमच्या टीम मधल्या तीन काकवा, सलमान च्या अर्धे असे माझे दोन मित्र, आणि पाव असा पापी मी, संध्याकाळी ६ च्या मुहूर्तावर १२० रुपयांची दक्षिणा देऊन जेंव्हा आतमध्ये पोचलो, तेंव्हा आतमध्ये उपस्थित

आंबाड्याचे रायते.

लेखक ज्योति प्रकाश यांनी रविवार, 04/09/2011 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः- ५-६ आंबाडे. लाल तिखट. गूळ. मिठ. मोहरी. एक वाटी खवलेले खोबरे. फोडणीसाठी तेल. कृती :-प्रथम आंबाड्यात थोडे पाणी घालून शिजत ठेवावे. आच बंद करावी व थंड करत ठेवावे.थंड झाल्यावर आंबाडे कुस्करून घ्यावे.पाव चमचा मोहरी भाजून घ्यावी.खवलेले खोबरे घेवून त्यात भाजलेली मोहरी लाल तिखट,चवीप्रमाणे गूळ्,मिठ घालून वाटून घ्यावे.वाटण कुस्करलेल्या आंबाड्यात घालावे व परत शिजत ठेवावे.चांगली उकळी आली की आच बंद करावी.वरून मोहरीची फोडणी द्यावी.

मोदक

लेखक निमिष ध. यांनी रविवार, 04/09/2011 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज मित्राकडे गणपतीची पूजा आहे आणि फ्रीज उघडून पहिला तर ओले खोबरे हाताशी होते मग म्हणालो व्हा सुरु आणि बनवा मोदक. आता पहिलाच प्रयत्न होता त्यामुळे काही उकडीचे मोदक करून चौका मारायचा प्रयत्न नव्हता फक्त आपले साधे तळलेले मोदक केले. मि पा च्या सगळ्या बल्लवाचार्य आणि सुगरणीना नमस्कार करून पाककृती टाकतो. पहिल्यांदा एका मित्राला सकाळी सकाळी फोन करून उठाव आणि लवकर मदत करायला ये असे सांगा .. मग तो येण्याची वाट पहा, तो पर्यंत ओले खोबरे फ्रीज मधून काढून ठेवा. जर नारळ वापरणार असाल तर तो फोडून आणि खोवून घ्या. मी तरी मोदक कणकेचे साधे केले होते.

निशाणी

लेखक शैलेन्द्र यांनी शनिवार, 03/09/2011 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
छेडूनी धुंद ओली , हळवी तुझी विराणी , मी मागतो पुन्हा का, फिरुनी नवी निशाणी. पावूस चांदन्यांचा भिजवून काल गेला, ग्रीष्मात मोगरयाने फसवून वार केला, हे जाणुनी पुन्हा का, मनमोर गात गाणी, होतो अतृप्त जरी मी अव्यक्त खंत होती , निशब्द वेदना ही मुरली निवांत होती , का छेडली पुन्हा तू, ती रागिणी दिवाणी , अव्यक्त भावनांचे मी गूढ गीत गातो, स्वरमेळ ना तयाला तो तुझ्यातुनी वाहतो, ओठांत गुंफुनी माझ्या दे आता नवी कहाणी..
काव्यरस

"दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसून कापूस वाटी!"

लेखक सुधीर काळे यांनी शनिवार, 03/09/2011 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांच्या आंदोलनात सरकारची फजीती! परिस्थिती अंगाशी आल्यावर माणूस काय नाहीं करत? पण ती तशी अंगावर येईपर्यंत कांहींच न करणारा माणसाला काय म्हणावे? कदाचित् अशा व्यक्तींसाठीच "दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसून कापूस वाटी![१]" ही म्हण रूढ झाली असावी! एप्रिलच्या मध्यापासून ऑगस्टच्या मध्यापर्यंत केंद्र सरकारने ’रेटारेटी’त घालविलेले दिवस आणि १६ ऑगस्ट ते २७ ऑगस्टच्या दरम्यान चांदण्यात बसून (घाईघाईने) वळलेल्या वाती हे या म्हणीचे सार्थ उदाहरण आहे!