रिपोर्ट (कथा - पात्रे व प्रसंग काल्पनिक)
रिपोर्ट
दीपक पळत पळत एकत्र जमायच्या ठिकाणी आला. वर्गातली मुलं वाट पाहतच होती. आणखी एक दोघं बाकी होती. ते आल्यावर सगळे बसमधे बसले. सरांनी मोजणी केली. दहाच्या दहा हजर होते. केशरी सूर्य हळहळू वर सरकू लागला व बसही वेगाने धावू लागली.
भेंड्या खेळताना प्रवास लवकर संपला. बस वाडीच्या आधी असलेल्या गावाशी पोचली. सरांनी आधीच गावातल्या लॉजचं बुकिंग केलं होतं. उतरल्या उतरल्या सगळ्यांनी चहा घेतला आणि आपापल्या खोल्यांमधे जाऊन बॅगा टाकल्या. दीपक, शेख, हरवंदे, गोखले यांचं सूत जास्त जमलेलं होतं. सगळे लॉजमधून बाहेर आले व सरांच्या पुढच्या सूचनेची वाट पाहू लागले.
जेव्हा तुझ्या बटांना (कथा)
केतनने नेहमीप्रमाणे हाय टाकलं. जाईने उत्तर दिलं. तीही ऑनलाईन होती. बरेच दिवस ते ऑनलाईन बोलत होते. जाईची ब-यापैकी माहिती त्याला कळली होती. तिच्या आवडीनिवडी कळल्या होत्या. तिला एकदा पाहायचं होतं. मनात तुंबलेला प्रश्न विचारायचा होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर केतनने विचारलं.
"कधी भेटायचं ?"
"भेटू रे."
हे जाईने तिस-यांदा तरी ऐकवलं होतं. आता मात्र केतन वैतागला.
"भेटू रे, भेटू रे खूप दिवस चाललंय तुझं. नक्की सांग. आपण असं किती दिवस चॅटिंग करणार ? गेले दोन आठवडे तू टाळत आहेस.एकदा भेटूच ना.
250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक
राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना.बेसुरा मी
तुम्हाला एखाद्या व्यक्ती बद्दल मन कलुषित करायच आहे, सोप्प आहे, आपण आपल्या परिचितांच्या कानात फक्त एव्हढच बोलायचं कि “बाबारे त्या अमुक तमुक पासून जरा जपून बरं!!” बस्स, ती व्यक्ती कितीही चांगली असली सगळ्यांशी किती हि आपुलकीने वागू दे, सगळे जण त्या व्यक्ती पासून थोडं फटकूनच वागतात. तुम्ही म्हणाल कि आता हे काय मध्येच. पण मंडळी हो, मागील काही दिवस Selective Ignorance चा इतका दीर्घ अनुभव घेत आहे.
आपल्या भारत देशात तुम्ही सरळमार्गी असणे म्हणजे जगण्यासाठी नालायक. आणि सध्या जे काही तज्ञ त्यांचे ज्ञान पाजळतात ते एकदम दिव्य.
पुस्तक परिचय-वॉकिंग ऑन द एज-लेखक प्रसाद निक्ते
नमस्कार मंडळी
अंगात भटकंतीचा किडा असल्याने मी भटकत असतो आणि जेव्हा भटकत नसतो तेव्हा भटकंतीविषयक काही मिळाले तर आधाशाप्रमाणे वाचत असतो. तेव्ह्ढीच दुधाची तहान ताकावर. तर असाच कुठेतरी या पुस्तकाचा उल्लेख वाचला आणि पुस्तक मागवले. पहीली एक दोन प्रकरणे वाचुन झाली, पण नंतर पुस्तक कपाटात गेले आणि हापिसच्या कामांच्या गडबडीत जरा बाजुला पडले. पण विकांताला आठवण झाली आणि पुस्तक बाहेर काढुन जवळपास एका बैठकीत संपवले. त्यापायी दुपारच्या साखरझोपेवरही मात केली. कारण पुस्तकच तसे आहे.
मनाचा पहिला श्लोक
मनाचा पहिला श्लोक
मनाचा पहिला श्लोक कोणीही का समजून घ्यावा?
मनाचा पहिला श्लोक समजून घेणे ही एक आध्यात्मिक गरज नसून एक साधी सामाजिक आणि वैयक्तिक गरज आहे. आपले जीवन सुरळीतपणे जगण्याकरता आपण आपल्या ब्रह्मांडाचे एक साधे विभाजन करू शकतो. आपला देह, आपले मन किंवा आपला सूक्ष्म देह, आपला भोवताल, आपल्या समजेच्या आणि भोवतालच्या पलीकडचे अशा चार विभागात हे साधे सोपे विभाजन होऊ शकते. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध या त्यांच्या ग्रंथामध्ये या चारही बाबींचे सविस्तर विवरण केलेले आहे.
मिसळपाव