मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आता फक्त काढ दिवस

श्रीकृष्ण सामंत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
त्या दिवशी प्रो.देसाईंचा वाढदिवस होता.मला संध्याकाळी तळ्यावर जेव्हां भेटले तेव्हां म्हणाले “सामंत,दगडाला शेंदूर फासून लोक त्याला देव मानतात.देव मानायला श्रध्दा असावी लागते.ती कमी झाली की मग देवाचे देवपण कमी होतं नाही काय?वयोमान वाढल्यावर परावलंबन वाढतं.छोटे छोटे प्रसंग पण मनाला लागतात.मग अशा वाढदिवसा सारख्या दिवशी पण असं वाटतं,कसले वाढदिवस? आता फक्त राहीले काढ दिवस. या विषयावर एखादी कविता लिहाल कां?” त्यासाठी ही कविता सुचली. काढ दिवस वय झाले आता सत्तर कसे म्हणू आता झाले तरी बेहत्तर आता कसले वाढदिवस राहीले ते फक्त काढदिवस पर्वताच्या उतरणीवर दिसू लागले आभाळ चढणीच्या वाटेवर स्वैर पक्षांचा थवा हेरण्याचा गेला तो काळ अपेक्षा लोपून गेली उमेदीने पाठ फिरविली नैराशाने गांठ बांधली भुतकाळातील यातनां भविष्यकाळातील स्वपनें मिसळती एकच वेळी चेहऱ्यावरी दिसती दुःख अन कष्ट राहूं कसा मी संतुष्ट? म्हणावे त्याला जाणकार कल्पनेने जाणतो भविष्यकाळ झाले आता वंय फार आता कसले वाढदिवस राहिले ते आता काढदिवस

वाचन 1253 प्रतिक्रिया 0