Skip to main content

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण.१

लेखक अक्षय१ यांनी मंगळवार, 31/05/2016 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण...

लेखक अक्षय१ यांनी मंगळवार, 31/05/2016 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
…माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करुन देते.

महापुरुषांच्या जयंती निमित्त सोरा गावाने घालून दिला नवा आदर्श.(महापुरुषांची एकत्र जयंती)

लेखक विशाल चंदाले यांनी मंगळवार, 31/05/2016 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या दुष्काळावर बरीच चर्चा चालू आहे आणि सगळीकडेच त्याच्या उपाययोजनांवर चर्चा आणि कामे सुद्धा चालू आहेत. असंच एक काम हाती घेतलं होतं सोरा (ता. अहमदपूर, जि. लातूर) गावातील तरुणांनी. ह्या कामाचं विशेष म्हणजे निमित्त होतं ते महापुरुषांच्या जयंतीचं. गावातील तरुणांनी महाराणा प्रताप सिंह, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांच्या जयंती वेगवेगळ्या साजऱ्या न करता एकत्र साजऱ्या करायचा संकल्प केला होता.

राणीचा वाढदिवस

लेखक प्रणवजोशी यांनी मंगळवार, 31/05/2016 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या आपल्या लाडया राणीचा वाढादिवस. गेली ८०+वर्षे सेवा देणारी ही राणी अपवादात्मक परिस्थिती वगळता नेहमीच धावली आहे. मधे रेल्वेने हिचा डायनर कार डबा काढल्यावर लोक संतापली पण आता पुन्हा जोडलाय डबा. बाकी राणीची शान हल्ली जरा झाकोळलेली वाटते आता राणीला नव्हे तिच्या मालकांना राणीवर जाहिराती लावुन पैसे कमवायची दुर्बुद्धी झाल्ये. असो.तर महत्वाच हे की ऊद्या पुणे येथे सकाळी ७ वाजता राणीचा वाढदिवस साजरा होणार आहे.तसाच सोहळा छशिट येथेही आसतो का हे विचारणे हा आहे.जाणकारांच्या मताच्या प्रतिक्षेत. टिप- हा लेख केवळ जिलबी टाकावी म्हणुन लिहलेला नाही.

पार्टी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 31/05/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
सायंकाळी मित्रा समवेत घरी पार्टी चा बेत ठरला होता.. बीअर मद्य आदी आणुन ठेवले्लेच होते.. मटण आणायचे होते.... दुपारच्या रणरणत्या उन्हात तो खाटकाच्या दुकानांत आला.. १ किलो मटण अशी ऑर्डर दिली.. अन त्याचे लक्ष बाजुला बांधलेल्या उन्हाच्या चटक्यात पाण्याविना तळमळ्णा-या बक-या कडे गेली.. व त्याचे मन हेलावले... पण तो क्षणांत भानावर आला अन विचार करु लागला.... मी संवेदना क्षम व्यक्ति आहे का दांंभिक????

धन्यवाद गानू…

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 31/05/2016 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
"संध्याकाळची वेळ... ७.१० झाले असतील... एक माणूस बॅंकेत आला... गार्ड म्हणाला बैंक बंद झाली आहे ७ वाजताच, आता उद्या या, तो माणूस काय ऐकायला तयार नाही. गार्ड आला माझ्याकडे म्हणाला एक माणूस आलाय, म्हणतोय अर्जन्ट आहे, पैसे काढायचेत... मी म्हणालो, ठीके पाठव आत.. शटर अर्धवट उघडून गार्डनी पाठवलं त्या माणसाला आत... मी विचारलं चेक आहे का उत्तर नाही, पासबुक आणले का उत्तर नाही... डिमांड ड्राफ्ट आहे पण त्यावरून कॅश देणे जमणार नाही... कैशियर नाही, दिवासभराचा लेखाजोखा सम्पलेला आहे, उद्या या... हे ऐकून तो माणूस भडक्ला... अहो परिस्थिती समजून घ्या, मला पैसे हवेत हॉस्पिटलसाठी, तुम्हाला कळत नाही का...

गोनिदा...................

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी मंगळवार, 31/05/2016 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या १ जुन.......गोनिदा जाउन अठरा वर्ष होतिलं. १ जुन १९९८ ला पुण्यात ते अख्ख्या महाराष्ट्राला पोरकं करुन मोठ्या प्रवासाला निघुन गेले...कायामचे! आज जर अप्पा ( गोनिदांना) असते, अर्थातच ते आजही आपल्यातच आहेत...आठवनींच्या रूपात, त्यांच्या लिखाणाच्या रूपात, पण जर हयात असले असते तर येत्या ८ जुलैला १०० वर्षांचे झाले असते..असो. आज सहजच त्यांची आठवण आली आणि लिहीता झालो.

ती विलासींनी मदालसा,

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 31/05/2016 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
ती विलासीने मदालसा,मिठीत कैद होती अनंग कथा ऐकण्यात, ति जरा गुंग झाली असावी चुंबीत अधर लाल,लागता हात उरोजास कोवळी लावण्य कळी ,ती जरा लाजली असावी घुसता आरपार तो मदन शर हृदयात रतीसम सुंदरी ,ती जरा घायाळ झाली असावी कुरवाळीता ,त्या मोकळ्या रेशीम कुंतलास त्या काम गंधाने, ती जरा बेभान झाली असावी मधाळ हसून,टाकता कटाक्ष त्या दर्पणात तो भंगला पाहून,ती जरा चकित झाली असावी अर्पीता कोवळी कोरी तनू, ह्या पौरुषाला ती कोमलांगी ,पौरुषा पुढे हरली असावी Avinash

एक संवाद

लेखक अनाहूत यांनी मंगळवार, 31/05/2016 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
" अरे भाई काय मग कस काय ? दिसला नाय दोन दिवस ? " " काय नाय रे ते जरा दोन दिवस जेलमध्ये होतो ." " का भाई ? तुमाला आणि जेलमध्ये ? अस काय केल तुम्ही ? " " अरे काय नाय रे जरा भुक लागली होती आणि दुधाच पातेल कट्ट्यावरच होत . मग काय घातल तोंड आणि पित होतो . आणि मी काय सगळं संपवणार नव्हतो काय त्याला ठेवणार होतो ना . पण नाय साला कायतरी फेकून मारल डायरेक्ट पेकाटातच बसल ना आणि पाठीमागून वार केला ना . हिंमत आहे तर समोरून करायचा ना वार मग सांगितलं असत अपुन काय चीज आहे ते . चांगल बोचकारल असत आणि चावलो पण असतो . मग फिरत बसला असता इंजक्शन शोधत .