Skip to main content

इव्हेंटफुल रात्र

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 13/12/2024 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग क्र. १.... खाडकन झोपमोड झाली. घड्याळ बघीतले रात्रीचे पावणे तीन वाजले होते.घाई घाईत खाली गेलो. पार्किंग मधे माझी लाडकी पाढंरी बजाज चेतक दिसली नाही. इकडे तिकडे शोधले पण कुठेच दिसत नव्हती. चिंताग्रस्त अवस्थेत परत घरात आलो. बिछान्यावर बायको घोरत होती. तीला उठवून विचारण्यात काही अर्थ नव्हता. शेजारील टीपाॅय वरच्या बाटलीतून एक घोट पाणी प्यालो व लगेचच पुन्हा झोप लागली. ________________________________________ प्रसंग क्र-२.... "सापडली,सापडली", झोपेतच जोर जोरात ओरडत उठलो.बायकोची पण झोपमोड झाली होती.

वावटळ

लेखक सुजित जाधव यांनी गुरुवार, 12/12/2024 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक_परिचय: वावटळ लेखक: व्यंकटेश माडगूळकर जानेवारी २०२४ मध्ये मिपावर व्यंकटेश माडगूळकर यांच्या करुणाष्टक कादंबरीबद्दल लिहले त्यावेळी @मिसळपाव यांनी मला माडगूळकरांची वावटळ कादंबरी वाचण्यासाठी सुचवले होते. त्यानंतर ३-४ महिन्यांनी मी वावटळ वाचून काढली. कादंबरी वाचली त्याच रात्री या लेखातील काही भाग टंकून ठेवला होता आज जवळजवळ सहा महिन्यानंतर तो संपादित करण्याचा योग जुळून आला. ______________________________________________ ३१ जानेवारी १९४८ चा दिवस. नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने पिस्तुलाने गोळ्या झाडून महात्मा गांधीजींची हत्या केली.

हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग १ : प्रवास

लेखक गोरगावलेकर यांनी बुधवार, 11/12/2024 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दहा वर्षांपासून होणारी कौटुंबिक हिवाळी सहल यावेळी रद्द झाली. त्याला कारण मे महिन्यात ग्रुपने एका यात्रा कंपनीतर्फे केलेली हिमालयीन चारधाम यात्रा. कंपनीचे मूळचे पॅकेज स्वस्त दिसत असले तरी थोड्या चांगल्या रूम , ग्रुपसाठी स्वतंत्र वाहन असे करत किंमत वाढत गेली . त्याचबरोबर पिट्ठू , घोडा, पालखी, मधल्या वेळातले जेवण यावर बराच खर्च झाल्याने सगळ्यांनी दुसरी मोठी सहल करण्याचे टाळले . यात्रेसाठी आमच्या नावाचीही नोंदणी झाली होती पण मुंबईहून जळगांव जाणारी रेल्वे सोळा तास उशिराने सुटणार असल्याने आम्हाला जळगावपासूनची कनेक्टेड गाडी मिळणे शक्य नव्हते .

धाग्याबाबा, प्रतिसादक आणि वाचकाची गोची

लेखक जोनाथन हार्कर यांनी सोमवार, 09/12/2024 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
पात्रे: 1. धाग्याबाबा - राजकीय लेख लिहिणारा, वाद निर्माण करण्यात पटाईत 2. प्रथम प्रतिसादक - लेखावर जोरदार समर्थन करणारा 3. द्वितीय प्रतिसादक - लेखावर चिरफाड करणारा 4. वाचक - वादाच्या गोंधळात सापडलेला साधा नागरिक --- (पडदा उघडतो. एका कॅफेच्या कोपऱ्यात धाग्याबाबा लॅपटॉपवर टाइप करत बसलेला आहे. प्रथम आणि द्वितीय प्रतिसादक फोनवर चर्चा करतायत. वाचक एका टेबलवर शांत बसून वर्तमानपत्र वाचतो.) --- धाग्याबाबा: (लॅपटॉपवर टाइप करत) "आजच्या सरकारच्या निर्णयांनी देश प्रगतीच्या वाटेवर आहे.

वाहुनी तू रहावे

लेखक रोहन जगताप यांनी रविवार, 08/12/2024 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
नसे सोय बोलून सत्यात काही जगाला हवे ते असत्यात राही उगा मौन राखून विश्वा पहावे वहात्या जगा वाहुनी तू रहावे
घळे आसवांतून पाषाण लेणी मुकी साचताना उरी दैव देणी अबोलाच बोलून गाईल गाणी स्थितप्रज्ञ राहूनही काळ वाणी
झरे ज्ञान मर्मातले होत ओळी जरी सांडले वेचले घेत झोळी शिदोरीच वाटेत ही चालवावी उपाशी जिवा तेवढी चाखवावी
निसर्गास वाटेल जेही मनाशी अनाहूत साकार होई जगाशी जुळल्यास योग कृतीही करावी नसे अन्यथा शांतता बाळगावी

जीवाभावाचा "सोबती": सोबती सेवा फाउंडेशन

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 06/12/2024 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
✪ रोगाकडून आरोग्याकडे नेणारी वाट ✪ अवघड जागची दुखणी आणि संवादाची सोबत ✪ "मला मरण हवंय!" ✪ देखभाल करणार्‍यांसमोरच्या अडचणी ✪ मोबाईल व्यसनमुक्ती ✪ आनंद घेण्याचा अधिकार आणि अपराधभाव ✪ योग्य वेळी थांबण्याची कला नमस्कार. आज ५ डिसेंबर रोजी एक वेगळा शुभारंभ अनुभवता आला. माझी काकू सौ. वर्षा वेलणकर व माझा काका श्री. चंद्रशेखर वेलणकर ह्यांनी सुरू केलेली ही नवीन संस्था! खरं तर काका त्याच्या व्यवसायातून नुकताच "रिटायर" झाला आहे! पण तो आणि काकू ही नवीन इनिंग सुरू करत आहेत. हिन्दीमध्ये निवृत्त होणे ह्यासाठी "अवकाश प्राप्त" त्यामुळेच म्हणत असावेत!

वाचावे ते नवलंच - 'अमीश' जीवनपद्धती! (पूर्वार्ध)

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 05/12/2024 19:24 या दिवशी प्रकाशित केले.

एखाद्या देशात आजही काही लाख लोकसंख्या असलेले कुठल्याशा धार्मिक पंथाचे लोक फक्त आठवी पर्यंत शालेय शिक्षण घेतात, उपजीविकेसाठी शेती, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन आणि हस्तकौशल्यावर आधारित उद्योग करून आपली उपजीविका चालवतात, आपल्या दैनंदिन जीवनात वीज वापरत नाहीत, टि.व्ही.

देणाऱ्याचे हात घ्यावे

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 05/12/2024 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
लोकलच्या फूटबोर्डाच्या सांडव्यावरून फलाटावर धो धो कोसळणाऱ्या बेफाम गर्दीचा बेहाल थेंब बनायची सवय करतानाच्या काळातली गोष्ट... ...एक दिवस दोन उघडीवाघडी भिकाऱ्याची लेकरं गर्दीबरोबर फलाटावर सांडताक्षणी चट्दिशी उठून वाहत्या गर्दीच्या काठावर गेली एक नेहमीसारखा खाली बसला अन् दुसरा ऐटीत उभा राहून स्वतःच्या भिकेतले नाणे बसलेल्याच्या ओंजळीत टाकून निर्व्याज हसू लागला मग आनंदाच्या फेर वाटपासाठी भूमिकांची अदलाबदल.. ...विंदांच्या "घेता" कवितेच्या शेवटच्या दोन ओळींची लव्हाळी गर्दीच्या महापुरातही अनवधानाने जिवंत ठेवणारी ती लेकरं पुन्हा दिसलीच नाहीत कधी

तो परत आला...

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 04/12/2024 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
जातीयवादींचे प्राण झाले कासावीस, परतून पुन्हा आलेच देवेंद्र फडणवीस !! अपमानाचे पचवले हलाहल, शांत राहिले, पाहून कोलाहल ।। जातियवादींचा विषारी अपप्रचार, देवेंद्र फक्त महाराष्ट्र विकासविचार ।। अति केला द्वेष कारण ब्राम्हण, आता तरी हा सक्षम आहे म्हण ।। चीत केले देवाने देशद्रोही धार्जीणे, लाजीरवाणी त्यांची हार व जीणे ।। योग्य वेळी हिंदूशक्ती एकवटली, घराणेशाहीने सफशेल धूळ चाटली ।। देवेंद्रच आहे भगव्याशक्तीचा शिल्पकार, राखेतून घेतली झेप,विजय स्वप्नसाकार ।।

गाथा इराणी (ऐसी अक्षरे -२१)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 03/12/2024 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
गाथा इराणी -लेखिका मीना प्रभू A इराण हा देश आंतरराष्ट्रीय राजकारणात सतत गाजत आला आहे. सर्वप्रथम या विषयी भयावह भावनाच येते. तिथे झालेल्या 'इस्लामिक क्रांती' १९७९ नंतर हा देश खूपच गूढ झाला. हळू हळू वाचनातून समजत होतेच की इराण हा आर्याचा देश होता.