Skip to main content

भुकेच्या ज्वाळा

लेखक चांदणशेला यांनी शनिवार, 22/12/2018 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
दूर निघाली पाखरे शोधाया दाणा भवताली साऱ्या भेगाळलेल्या दुष्काळाच्या खुणा तडफडणाऱ्या उभ्या झाडाच्या सावलीत दमून आली पाखरे निवारा शोधीत पोटात पेटल्या होत्या भुकेच्या ज्वाळा कंठात झाला होता जीव गोळा थकलेल्या उदास डोळ्यांच्या आडोशाला पाण्याच्या एक थेंब हळूच पाझरला घरट्यात राहिलेल्या आपुल्या पिलांसाठी एखादा दाना जाऊ बांधून गाठी पेटलेल्या ऊन्हात पुन्हा पाखरे उडाली एका दाण्यासाठी हिरव्या देशी निघून गेली

लोकशाहीला नाही वर्ज्य

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 22/12/2018 12:07 या दिवशी प्रकाशित केले.

कुणी म्हणाले दलित भटक्या कुणी म्हणाले हाडाचा कुणबी तो ठणकावून सांगितले बिनकाम रित्या डोक्यांना विषय चघळाया नवा खडा तुरट जातीचा बेशर्म जिभांना हवा स्वये श्रीरामप्रभू मातले जनचर्चा त्या बाधली जनसामान्य इथे तर सारे नेत्यांच्या आधीच हवाली देवळाबाहेरच्या रांगेतला एकेक मोजला जाईल हक्काचा मतदार, त्याची जात पडताळणी होईल लोकशाहीला नाही वर्ज्य कुणीही, माणूस वा देव तुझ्यावरच आले आता मारूतीराया, तुझी जात समोर ठेव \p> - संदीप चांदणे (२२/१२/२०१८)

मुंबई धडे - २

लेखक मालविका यांनी शनिवार, 22/12/2018 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई धडे - २ मागच्या लेखात मी चुकून २००५ साली मुंबई ला आल्याचा उल्लेख केला आहे . मी २००६ साली कोकणातून मुंबई मध्ये आले . जूनच्या मध्यावर साधारण क्लास सुरु झाला. मुंबई लोकलची, गर्दीची नि पावसाची हळूहळू ओळख आणि सवय व्हायला लागली. आधी कितीतरी वेळा लोकल मधून होणाऱ्या चोऱ्यांविषयी ऐकलं होत त्यामुळे जाता येता ओढणी गळ्याभोवती गोल फिरवून घ्यायचे. म्हणजे कुणी गळ्यातली चेन ओढायला नको कि ओढणी कुठे अडकायला नको. लहानपणापासून एकटीने प्रवास केला असल्याने स्वतःची नि स्वतःच्या सामानाची काळजी घेण्यास मी समर्थ होते. पण लोकल माहितीची नाही त्यामुळे एक अजाणता भीती मनात होती.

सिंहगड

लेखक मनो यांनी शनिवार, 22/12/2018 05:38 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या चार-पाच वर्षात बऱ्याचदा असं वाटलं की सिंहगडाबद्दल लिहायला हवं. जुने कागद हुडकताना भरपूर नवे काही या गडाबद्दल सापडते, त्यातले जे काही अजूनही आठवते ते इकडे एक लेखात मांडतो आहे. लेख आवडला असेल तर प्रतिक्रियेत जरूर कळवा. पुढचा भाग - सिंहगडाची अखेरची लढाई आणि त्यानंतर ब्रिटिश काळातील एक अप्रकाशित जाहिरात टाकेन, जर उत्सुकता असेल तर ... सिंहगड म्हणले म्हणजे प्रथम आठवतात तानाजी मालुसरे आणि त्यांनी गाजवलेला पराक्रम. इथे अनेकदा शशिकांत ओक आणि इतरांनी त्याबद्दल लिहिण्याचा आग्रह केला होता, पण दुर्दैवाने तानाजीच्या पराक्रमाबद्दल फार थोडे अस्सल तपशील आपल्यापर्यंत पोहोचले आहेत.

बापाचे मुलीस पत्र..

लेखक प्रियाभि.. यांनी शुक्रवार, 21/12/2018 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
पोरी, देतो तुला आज माझ्या प्रेमाची शिदोरी कर स्विकार प्रेमाने ठेव जपून तू उरी.. जरी सांगे माय-बाप तुला जगायची रीत शिकशील तुझी तूही पुढे जगाच्या शाळेत.. पोरी, अंतरी ग तुझ्या प्रेम राहो निरंतर थारा द्वेषाला नसावा दूर राहुदे मत्सर दुःख दाबून उरात ठेव मुखावर हसू परी नसावी शरम कधी ढाळण्या

EVM

लेखक चिगो यांनी गुरुवार, 20/12/2018 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
(डिस्क्लेमर : हा लेख EVM बद्दलची माहिती देणे व त्याबद्दलचे गैरसमज दुर करणे, ह्या हेतूने लिहीण्यात येत आहे. सदर माहिती ही लेखकाच्या निवडणुकांबद्दलच्या अनुभवांवर तसेच भारत निर्वाचन आयोगाद्वारे बनवलेल्या नियम, प्रोटोकॉल्स आणि निर्देशांवर आधारीत आहे. कुणाही वाचकाला जर ह्या विषयावर सखोल माहिती हवी असेल तर ती माहिती भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाचकांना नम्र विनंती आहे, कि त्यांनी त्यांना असलेल्या शंकांना कृपया राजकीय वळण न देता विचाराव्यात.

चित्रपट सृष्टीत एकाच कलाकाराचे , एकाच नावाचे दोन चित्रपट....

लेखक srahul यांनी गुरुवार, 20/12/2018 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट सृष्टीत ब्रेक मिळणे , त्यानंतर यश मिळणे , त्यानंतर दीर्घ काळ टिकणे यासाठी नशिबाची साथ लागतेच , पण त्याच बरोबर परिश्रमाची तयारी , बदलाला सामोरे जाण्याची तयारी हे गुण लागतात. अशा प्रकारे काही कलाकारांची प्रदीर्घ कारकीर्द झाली त्यात एक योगायोग असा झाला त्यांनी एकाच नावाचे दोन सिनेमे केले. मला सापडलेली हि यादी आणी काही नवीन असेल तर ऍड करा. १)नास्तिक (१९५४) अजीत , नलिनी जयवंत नास्तिक (१९८३)अमिताभ बच्चन , प्राण , हेमा मालिनी , नलिनी जयवंत २)अफसाना (१९५१) अशोक कुमार (दुहेरी भूमिका),वीणा, कुलदीप कौर अफसाना (१९६६) अशोक कुमार , प्रदीप कुमार , पद्मिनी ३)हिफाजत (१९७३)विनोद मेहरा , आशा सचदेव , अ

"मोहिम बागलाणची" भाग पहिला

लेखक दिलीप वाटवे यांनी बुधवार, 19/12/2018 00:42 या दिवशी प्रकाशित केले.

"मोहिम बागलाणची"

दिवस पहिला

मुल्हेर, मोरागड, हरगड

महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटाची म्हणजेच आपल्या सह्याद्रीची मुख्य रांग नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यापासून सुरु होऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या पारगडापाशी संपते. या मुख्य रांगेच्या उत्तरेकडे असणार्‍या बागलाण तालुक्यात सेलबारी आणि डोलबारी नावांच्या दोन उपरांगांवर महाराष्ट्रातील उंचच उंच आणि चढाईस दमवणारे असे काही किल्ले आहेत. त्या भागात अहिराणी भाषा बोलली जाते. अहिराणीत बारी म्हणजे डोंगररांग ओलांडणारी वाट किंवा खिंड.