Skip to main content

त्या पडद्याच्या पल्याड वसते

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 25/04/2025 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पडद्याच्या पल्याड वसते गूढ असे "ते "काही (अंतर "त्या"च्या-माझ्या मधले घटते, कळतही नाही) भेट अटळ आहेच "त्या"ची मग वाट कशाला पाहू? (अस्तित्वाचा सूर्य ग्रासण्या अविरत टपला राहू) "अस्तित्वाच्या पूर्णविरामा- -नंतर काहीच नसते"- (माहित असले - तरी मानसी उत्कंठा का वसते?) त्या पडद्याचे धूसर दर्शन अधुनी मधुनी घडते ("जाऊनी वरती, परतुनी आले" ऐसी कुजबुज होते ) :)

अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 24/04/2025 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे खिशाला फुटतात शंभर फाटे तेवीस किलोत फक्त कपडे चार आवांतर सामानाची गर्दीच फार महिनाभर आगोदर येते यादी म्हातारी वादी, म्हातारा प्रतिवादी बुधानी,कल्याणी,चितळे, कयानी वडी,सांई,जरा बेतानी खर्च करा नी कलश,कालनिर्णय,कढाई,पेशवाई रोज पॅन्ट शर्ट तरी पैठणीची अपुर्वाई म्हातार्‍याची वडवड,चश्म्याची वाट पायाला भिंगरी अन कण्हारली पाठ सामानाची मांदियाळी बॅगा झाल्या भारी काय सांगू,अम्रिकेच्या आधी पुण्याची वारी तयारी झाली ,म्हातारीनं घेतली बॅक सिट म्हातार्‍याच्या नावानं फाडतीया तिकीट पिझ्झा, बर्गर...

शिवरायांचे औरंगजेबास पत्र (काल्पनीक)

लेखक OBAMA80 यांनी बुधवार, 23/04/2025 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
हे पत्र पूर्णपणे काल्पनीक असून त्यात कोणालाही दुखविण्याचा, धार्मिक तेढ वाढविण्याचा अथवा कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. ******************************* हे आलमगीर, बऱ्याच वर्षानंतर तुम्हांला पत्र लिहीण्याचा योग आला. तुम्ही हिंदूवर लावलेल्या जिझीया करासंदर्भातील तुम्हांला लिहीलेल्या पत्रानंतर बहुतेक आत्ताच योग आला. आता हे पत्र २१ शतकात लिहीत आहे तेव्हा या पत्राची भाषा देखील मराठी आहे. तुमच्या आयुष्याची शेवटची कित्येक वर्षे तुम्ही महाराष्ट्रात घालविल्यामुळे कदाचित तुम्हांला ही भाषा अवगत झाली असेल अशी अपेक्षा करतो.

मानवतेचं कलेवर

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 23/04/2025 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
आतंकवादी बेलगाम पुलवामा,पहलगाम....... होतच रहाणार कुठवर मानवतेचं कलेवर ॐ शांती म्हणत ओढत रहाणार रोज रोज कुठवर मरायचं XXX की औलाद, तोंडाला लागलयं रक्त भ्याड हल्ले बघत रहायचं कुठवर आसवं गाळायची कुठवर मेणबत्ती जाळायची एकजुट होणार,का? फक्त राजकिय पोळी भाजणार भळभळतीय जखम नकोय आता रकम,हवा डोळ्याला डोळा,गोळीला गोळी आतंक्यांची होळी,मगच पुरण पोळी नको अश्वासने नको वल्गना हवी गुरूवाणी,शिवगर्जना पुरे आता दया,क्षमा,शांती मिटवा एकदाची खाज त्यांची पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......

अयोध्या काशी यात्रा!

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी मंगळवार, 22/04/2025 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र बाहुबली यांना अयोध्या-काशी जाण्याचा योग आला! काही कामानिमित्त मला उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जावे लागले. काम आटोपून १ दिवस होता म्हणून जवळच १३४ किमीवरील अयोध्येतही जाऊन यावे असा विचार केला. गोरखपूरहून बस पकडून अयोध्येत पोहोचलो. राममंदिराबद्दल आस्था होती आणि बाबरी कांडाबद्दल बरेच काही ऐकून असल्याने उत्सुकता होतीच. अयोध्येत पोहोचल्यावर राममंदिराच्या दिशेने जाणारा “रामपथ” पाहिला – अतिशय छान बनवलाय, वॉकिंग ट्रॅकसह! घरांचे अतिक्रमण तोडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. रस्ता मोठा केल्याचे आवडले. त्यामुळे रहदारीला व परिसराला शोभा आली.

Schindler List शिंडलर लिस्ट

लेखक Bhakti यांनी सोमवार, 21/04/2025 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
Q दूरस्था: पर्वता: रम्या:,वेश्याः च मुखमण्डने । युद्धस्य तु कथा रम्या,त्रीणि रम्याणि दूरतः ॥ अर्थ :- पर्वत,गणिकेचे मुख शृंगार और युद्धाच्या कथा रम्य असतात पण हे सर्व दूर असताना. खरोखरच या श्लोकाचे तंतोतंत उपययोजना 'शिंडलर लिस्ट' सिनेमा पाहताना समजली. द

जर्द पिवळी विजार

लेखक वामन देशमुख यांनी रविवार, 20/04/2025 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
जर्द पिवळी विजार, तीतून द्वार ठोठावत आलेले आतड्यांतुनी साठलेले पोटी आवळून धरलेले संधी मिळाली नाही तेंव्हा आडोशाला बसण्याची जे त्याज्य ते त्याग करूनी मोकलाया दाही दिश्यांची आधी असं झालं नाही कधी पिवळं झालं नाही त्या कातर वेळी मात्र रोखून धरणं झालं नाही मग जनाची ना मनाची कसली लाज कुणाची निसर्ग-हाकेला ओ देऊन क्लांत शांत होण्याची - (साधी सुती विजार घालणारा) द्येस्मुक् राव्

हिंदी सक्ती - मुख्यमत्र्यांना खुले पत्र

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 20/04/2025 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
श्री० देवेन्द्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र स० न० वि० वि० सध्या हिंदी १ली पासून शिकवली या मुद्द्यावरून बरेच चर्वितचर्वण चालू आहे. यात होणारा विरोध हा भावनिक आणि राजकीय अंगाने होत आहे असे वाटते. याशिवाय आणखी एका अंगाचा विचार व्हायला हवा, तो म्ह० चेताविज्ञान म्ह० न्युरोसायन्स. मी चेताविज्ञानातील प्रशिक्षित तज्ज्ञ नसलो तरी याविषयातील ताजे संशोधन भरपूर वाचत असल्याने काही मुद्दे पुढे ठेवावेसे वाटतात. या मुद्द्यांचा प्रशिक्षित तज्ज्ञ साक्षेपाने विचार करतील याची खात्री आहे - ० शालेय विद्यार्थ्यांवरील ताण आता पराकोटीला पोचला आहे.

शर्यत

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 19/04/2025 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
शर्यत ------------------------------------------------------------------------------------- ‘आक्या, यंदा तुमचा शर्यत जिंकायचा काहीच चान्स नाही ! ‘ राक्या म्हणाला. तसं आकाशला वाईट वाटलं. खूप वाईट वाटलं कारण त्याचे अप्पा दवाखान्यात होते. संध्याकाळची वेळ. शाळा सुटलेली . पोरं घोळक्याने घरी चाललेली . त्यावेळची ही चर्चा. आकाश आणि राकेश दोघे एकाच वर्गात होते .आठवी तुकडी क मध्ये. त्यांचं गाव मध्यम आकारात पसरलेलं होतं. हिरवं, निसर्गसंपन्न आणि शेत जमिनींचं.