(सकाळी सकाळी)
पेरणा अर्थात मनोज यांची सकाळी सकाळी
घाण उग्र भपकारा
लांबूनच आला
क्वार्टर टाकून आला
सकाळी सकाळी
फेसाळत्या सोड्यात
बर्फाचा मनोरा
लिंबू जाउन बसले
जरासे बुडाशी
पाय जड झाले
दृष्टी नाही डोळी
अवस्था ही झाली
सकाळी सकाळी
किती पेग गेले
घशातून भरारा
म्हणे आठवांचा
सुटण्या येरझारा
घरचे निष्ठुर
म्हणती पितो देशी
विदेशी न मिळता
सकाळी सकाळी
रिकामी बाटली
अन पुडी फरसाणाची
जणू साक्ष देती
नादान पणाची
दिसे उभे घेउन
कुणी हाती जोडे
का भास व्हावा
सकाळी सकाळी
क्षणात डोळे
खाडकन उघडावे
कुणी तरी खाडकन
थोबाडी हाणावे
पैजारबुवा,
काव्यरस
सकाळी सकाळी
कभिन्न काळा
मेघ भरून आला
बरसून गेला
सकाळी सकाळी
चहाच्या कपावर
वाफेचा मनोरा
तरी थंड आहे
जरासा बुडाशी
किती गर्द वाटे
धुके दाटलेले
दिसते न काही
सकाळी सकाळी
जरी खोल जावे
मनाच्या तळाशी
तरी आठवांचा
न सुटे येरझारा
एकांत निष्ठुर
अश्या दूरदेशी
उभा खिडकीपाशी
सकाळी सकाळी
निष्पर्ण झाडे
स्तब्ध गोठलेली
जणू शोक करती
ती पाने गळाली
दिसले उभे दूर
कुणी पाठमोरे
का भास व्हावा
सकाळी सकाळी
क्षणात डोळे
भरून यावे
कुणी आठवावे
पुन्हा ते नव्याने
दोसतार - ५६
. एल्प्या डाव्या बाजूला गेला. अंदाजा प्रमाणे आदर्शचा दम संपायला लागलाय. तो परत फिरणार आता. तरीपण जाताना जमले तर पाहुया म्हणत आदर्शने हात फिरवला. एल्प्याने त्याचा हात चपळाईने पकडून ओढला. आदर्शचा तोल गेला. तो बाजूच्या रेषेच्या बाहेर गेला. अगोदर आम्हाला कळालेच नाही. पण बाहेर बसलेल्या टीमने है.म्हणत मैदान डोक्यावर घेतले. एका गुणाने आम्हाला निसटता विजय मिळाला होता. सातवी क ने एकदम शेवटपर्यंत झुंजवले .
पुढची मॅच . आठवी ड बरोबर.
मागील दुवा : http://misalpav.com/node/47076
आठवी ड सोबत मॅच तशी अवघड होती . त्यांचे गडी आडदांड होते.
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण 15 - दृष्टांत आणि सिद्धी
या प्रकरणात दृष्टांत आणि सिद्धींविषयक भगवान रमण महर्षींचा अभिप्राय आपण जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
ध्यानधारणेमुळे होणारे अवांछित परिणाम काही वेळा साधकांना विस्मयचकित करतात. ध्यानावस्थेत असताना अकस्मात देव देवतांचे दर्शन झाल्याची, अद्भुत सुगंध दरवळल्याची तसेच क्वचित प्रसंगी अतिंद्रिय सिद्धी (उदा. सुदूर असलेल्या गोष्टींचे दर्शन होणे, इतर व्यक्तींच्या मनातले विचार ओळखता येणे, हवी ती वस्तू प्राप्त होणे इ. ) प्राप्त झाल्याची नोंद कित्येक साधकांनी करून ठेवलेली आहे.
( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )
( प्राचीताई माफ करशील ना ग? )
जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,
आणि तुला नाक्यावरच्या वडापावची खूप खूप आठवण येईल ना
आणि तेव्हा जेव्हा मी बटाटेवड्याची रेसिपी पहात असेन
तू म्हणशील, "अवघड आहे! या जन्मी मिळतील का?"
मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग बटाट्यांना कोंबेन कुकरमधे.
"अगं, शिट्टी!"
मी मग चिडून शिट्टी लावेन.
"जमलं!", तू म्हणशील.
मग मात्र मला रहावणार नाही.
मी तुझा फरसाणाच्या डब्यातला हात काढून घेईन,
कुकरजवळ नेईन.
तू घाबरशील..म्हणशील, हात भाजतील
मी म्हणेन भाजू देत.
शिट्ट्या होतीलच कुकरला.
गुलाबी कागद निळी शाई....1 अनामिक
गुलाबी कागद निळी शाई
Hiiii
पत्र पाहून आश्चर्य वाटलं ना? गंमत सांगू, मलाही वाटलं. :) कारण शाळेतलं पत्र लेखन संपल्यावर पुन्हा कधी खरंखुरं पत्र लिहिलंच नाही बघ. तसंही बोअरींगच होतं ते. तिथं हमखास मार्कस् जायचे. मराठीच्या मिस् तर छळायच्याच मला. माझे निबंध आणि पत्र भर वर्गात वाचली जायची. लेखन कसं नसावं याचं उदाहरण म्हणून. सगळे चिडवायचे मग. Science घेतलं आणि सुटले त्यातून. ते जाऊदे.
तर काय सांगत होते? हं तर तुला लिहिलेलं पत्र. त्याचं काय आहे,
तसा तू मला नेहमी भेटतोस. भेटतोस म्हणजे दिसतोस. कँटीनमध्ये, टी कॉर्नर वर.
शब्द
बोलणं जे जिवंत
कागदावर त्याचं प्रेत
बोलणं जे भाबडं मुक्त
कागदावर तेच अडचणीचं
बोलणं अधीर ओथंबलेलं कोवळं
कागदावर विचारपूर्वक शुष्क निबर
बोलणं गरमागरम लालबुंद
कागदावर डीप्लोमसीटाईप गुळमुळीत
बोलणं, वार्यावर विरून जाणारं
कागदावरचं, आयुष्यभर पायगुंता होऊन बसणारं
बोलणं, अगदी वैयक्तिक, थेट ओंजळभर.
कागदावरचं, वाचणाराच्या मूडनुसार हरवणारं गवसणारं.
बोलताना जे गाणं,
त्याचं कागदावर संदर्भासहीत स्पष्टीकरण.
एकेकाळी, बोलणं, प्रपोज करायला घाबरणारं.
त्याचकाळी, लिहिणं, चिठ्ठी पाठवायची सोय असणारं.
बोलणं, मनस्वी, हळवं, जखडून टाकणारं.
कागदावर तेच, तुफान विनोदी रडगाणं.
बोलणं, माझ्यासारखं, आधी.
लिहिणं
काव्यरस
दोसतार - ५५
"काय शिकवतात म्हणजे! रेड कशी मारायची. पाटी कशी दाबायची. बोनस कसा मिळवायचा पटात घुसून रेडरला कसा उचलायचा. सगळं दाखवतात. कबड्डी कबड्डी म्हणताना दम कसा टिकवायचा. ते पण शिकवतात.सोप्पे नाहिये ते. मंडळातला नर्या गायकवाड आख्खी दोन मिनिटे दम टिकवतो. अजिबात श्वास सोडत नाही." आता इतर सगळे खेळ बाजूला पडले. वर्गाची कबड्डी ची टीम . त्यात कोणकोण असणार आणि प्रॅ़क्टीस कधी करायची यावरच सगळे बोलणे एकवटलेमागील दुवा : http://misalpav.com/node/47071 कोण कोण ? हा एक मोठा प्रश्न . कारण कबड्डीला निदान बारा खेळाडू लागतात.
मिसळपाव