Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२० - पाककृती - खुसखुशीत करंज्या (साठ्याच्या)

लेखक पियुशा यांनी शनिवार, 22/08/2020 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 खुसखुशीत करंज्या (साठ्याच्या) गणपती गौरींच्या नैवेद्यासाठी खुसखुशीत साठ्याच्या करंज्यांची रेसिपी देत आहे.

श्रीगणेश लेखमाला २०२० - || श्री गणराया ||

लेखक Giriratn Raje यांनी शनिवार, 22/08/2020 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 जय देव, जय देव श्री गणराया, हो स्वामी गणराया, आरती ओवाळू, भावार्थी ओवाळू तुज बाप्पा मोरया ||ध्रु. ||जय देव जय देव......

श्रीगणेश लेखमाला २०२०- प्रस्तावना

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 22/08/2020 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
1 नमस्कार मिपाकर्स.. सालाबादप्रमाणे गणरायांच्या आगमनाचा दिवस आला आहे. आज आहे मिपा परिवाराचा १४वा वर्धापनदिन! आणि हाच तो दिवस जेव्हा येते मिपाची श्री गणेश लेखमाला. दरवर्षी आपण एका संकल्पनेभोवती लेखमाला गुंफतो आणि ती वाचकांसमोर सादर करतो.

नेवरी/नेवर्‍या/करंजी

लेखक देवीका यांनी शुक्रवार, 21/08/2020 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
गणराया निघालाच आहे , तर गौरीचे आगमन आता थोड्याच दिवसात होणार आहे. आमच्या घरी, गोव्यात गौराईला नेवरी करायची पद्धत आहे. इतर वेळी सुद्धा, मोदकांबरोबर बहिण म्हणून 'नेवरी' करतातच. पण पाच सवाष्ण स्त्रियांना, नेवरी ओटीत द्यावी लागते. आता, जुनी प्रथा आहे. पदार्थ बनवण्याची आवड आणि उत्साह असल्याने तर त्या( प्रथेच्या) निमित्ताने आनंद म्हणून केली जाते व सर्वांनाच खाउ घालतो. हि सगळ्याच घराची पद्ध्त नाही. गौरी बसल्या की, पाच ते दहा गोडाचे पदार्थ असतातच. पण हा मुख्य पदार्थ. तर नमनालाच घडीभर तेल झालेय. मी, माझी आई जशी करते तसेच लिहिले आहे. रेसीपी काही नवीनच नाही. मोदकाचीच आहे पण आकार वेगळा ..

Food - Kitchen Affairs - १. चहा

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 21/08/2020 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
किचन मध्ये पुन्हा थोडासा शिरकाव करण्याचा प्रयत्न आता करावा म्हणतो आहे. कधीकाळी रुम वरती थोडाफार स्वयपाक केल्याचा अनुभव होता.. पण त्या नंतर कित्येक वर्ष मात्र किचन मध्ये काहीच केले नाही.. बेसिक गरज : किचन हे स्वच्छ असावे .., फोटो देताना पण किमान निदान स्वच्छता दिसलीच पाहिजे. (अवांतर - नाहीतर मध्ये फेसबुकवरती, केतकी चितळे ने साबण कमी वापरुन त्याचा परिपुर्ण वापर कसा केला पाहिजे हे सांगायला बाथरुम मधला साबन कापण्याचा विडीओ दिला, आणि तिचे अतिशय घाणेरडे बाथरुम बघुनच किळस आली. कसे कळत नाही बरे लोकांना. असे निदान पाककृती विभागात झाले नाही पाहिजे, किचन छानच हवे.

हरतालिका

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 21/08/2020 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
हिमाचल प्रदेशातील हिमवान राजाची पार्वती  ही कन्या. तेव्हा तिचे ऐश्वर्य काय वर्णन करायचे ? सर्वगुणसंपन्न अशी ही कन्या राजाची अत्यंत लाडकी होती. कन्या वर्षाची, दोन वर्षाची, तीन वर्षाची, चार वर्षांची झाली. अशा त-हेने ती वाढत असता राजाला आता तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. आपल्या बाळ मैत्रिणींसह खेळताना-हिंडताना-नटताना-मुरडताना तिला पाहून त्याला धन्य वाटायचे आणि हे रत्न दुसऱ्याला द्यायचे याबद्दल दुःखही व्हायचे! अशा परिस्थितीत असतानाच नारदाची स्वारी झाली. राजसिंहासना जवळच हे कन्यारत्न होते. नारदांनी लगेच भविष्य सांगितले, “ही तुझी कन्या एका तपस्व्याचा पती म्हणून स्वीकार करील !

जिंदगी फिर भी.....

लेखक ज्येष्ठागौरी यांनी शुक्रवार, 21/08/2020 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
जिंदगी फिर भी..... लेकीची नुकतीच एक मोठी( सत्व )परीक्षा झाली त्यात ती उत्तीर्णही झाली आणि द्विपदवीधरही झाली आणि अगदी नजीकच्या भविष्यकाळात काही काळ शिकायचा मनसुबा नसल्याचं तिनं जाहीर केल्यावर मी जरा मऊ(!) आवाजात तिला विनंती केली की तिनं आता तिची खोली आवरावी.

चुका

लेखक rushikapse165 यांनी गुरुवार, 20/08/2020 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी नववीत होतो,तेरा वर्षांचा.बाल्यावस्था संपून मी नुकताच किशोरावस्थेत प्रवेश केला होता.मनात विचारांच काहूर माजलं होत.चेहर्‍यावरती दाढी-मिश्यांच्या कोवळ्या खूणा उमटल्या होत्या.मला त्याचे त्यावेळी खूप नवल वाटायचे.दिवसातून कित्येक वेळा मी आरश्यासमोर उभा राहायचो.नकळतच हात गालांवरुन फिरायचा,आणि मी स्वत:शीच हसायचो. सारं काही बदलत होत,शारीरिकच नव्हे तर मानसिक बदलही होत होते.एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणार्‍या भावना अचानकच बदलू लागल्या.सुरुवातीला अस का होतय?काहीच कळत नव्हत.एखाद्या मुलीकडे,माझ्या जुन्या मैत्रिणींकडे नकळतच खेचल्या जाऊ लागलो.त्यांच्याबद्दल मनात फक्त आता मैत्रीची भावना उरली नव्हती,ती

शालेय जीवनाची गतस्मृती बाबत कविता

लेखक एस.बी यांनी गुरुवार, 20/08/2020 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
मला आज शाळेत परत जायचं आहे त्या गावातल्या पडक्या शाळेत आज मला परत जायचं आहे.. पूर्वी वाहून न्यायचो पुस्तकाने भरलेले दप्तर ... फुटके ढोपर आणि गुडघे घेऊन.... आज त्याच वाटेवर अनुभवाची फाटकी बोचकी घेऊन थकलेली पावलं ओढत चालायचं आहे.. धूळ जमलेला फळा...आणि कट्टी करून गप्प झालेल्या त्या घंटेला.. शाळेच्या बाहेरचे प्रश्न विचारायचे आहे... माझ्या भूगोलाच्या अभ्यासक्रमात ,"पृथ्वी गोल असते" पण ," हे माणसाचं जग नक्की कसं असतं ? " हे का नाही शिकवलं??

अव्यक्त स्पंदने

लेखक तेजल दळवी यांनी बुधवार, 19/08/2020 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
...आणि मलाच माझी दया आली... इतका जीव लावतो आपण काही माणसांना .. त्यांच्या वागण्यात जरा जरी बदल झाला तरी कळवळून येत मनात.. कधीकधी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करायला लागतो आपण.. त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो ...पण त्रास काही संपत नाही.. असं का वागवस वाटलं असेल त्या व्यक्तीला माझ्याशी हे काही केल्या उमगत नाही.. मग अशावेळी काही हक्काची माणसं आठवतात ... जी कायम सोबत असतात सावलीसारखी ...या अशा काळात त्यांची जास्त आठवण येते.. कधीकधी वाटत खूप गृहीत धरतो आपण त्यांना.. तुम्ही खूप महत्वाचे आहात हे सांगायचंच राहून जातं बऱ्याचदा.. ही माणसं रक्ताच्या नात्यांनी बांधलेली नसतात..