Skip to main content

सुमारांच्या तावडीत...

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 05/12/2008 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर एकदाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (तसे हे पद केवळ राजकीय सोयीचेच, आवश्यक तर नाहीच) ठरले. शत्रूंने चढवलेल्या एका भीषण हल्ल्यातून देशाच्या आर्थिक राजधानीला सावरण्याची वेळ जेव्हा होती तेव्हाच ही राजधानी असलेले राज्य नेतृत्त्वहीन ठेवण्याची किमयाही देशाच्या राजकारण्यांनी साधून घेतली. मुंबईवरील, देशावरील हल्ल्यानंतरचा गेला आठवडा उबग आणणारा ठरला तो राजकारण्यांच्या, आणि केवळ त्यांच्याच नव्हे तर प्रशासकांच्याही, सुमारपणानेच गाजला. राज्यकर्त्यांची कोंडी कशी झाली होती त्याचे हे काही दाखले - १. एखाद हादसा - माजी उपमुख्यमंत्री आर. आर.

राणेंचे बंड : वस्तुस्थीती की दिशाभूल

लेखक कवटी यांनी शुक्रवार, 05/12/2008 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाणांचे नाव जाहीर झाल्याबरोबर राणेनी पक्षश्रेष्ठींविरोधात जळजळीत विधाने करून सबंध महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. सर्व मिडियामधून सध्या हिच ब्रेकींग न्युज झळकत आहे. राणे आता काय करणार? काँग्रेसमधेच रहाणार की काँग्रेस सोडणार? काँग्रेस हायकमांड त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार की त्याना काँग्रेसमधून काढून टाकणार अश्या चर्चांना उधाण आले आहे. पण हे खरेच बंड आहे की लोकांचे लक्ष अतिरेकी हल्ल्यावरून वळवून दुसरीकडे नेण्यासाठी टाकलेला डाव आहे?

सत्य अंगिकारले आहे का ?

लेखक शंकरराव यांनी शुक्रवार, 05/12/2008 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
नुसते हिंसा-अहिंसा विषयावर वाद विवाद करुन अहिंसा कशाशी खातात हे समजणे कठीन आहे. सत्य हे तत्व अंगिकारल्या शिवाय कोणी ही अहिंसावादी होउ शकत नाही. अर्जूनाला श्रीक्रुष्णांनी सत्याचा बोध दिल्यावर कळले कि हिंसा-अहिंसा काय आहे. जिथे लोकांमधिल धर्म (अंतरिक सत्व\सत्य ) नष्ट झालेले (कौरव) त्यांना मारने हि हिंसा होत नाही तर मानवाच्या उत्क्रांती साठी केलेले योग्य कर्म ठरते. तसेच अहींसा हि माणसातील एक व्रूत्ती आहे. अहींसेतून परिवर्तन अपेक्षित आहे. अहींसेच्या नावावर डास, कोंबड्या न मरने हे अ-नेसर्गीक वाट्ते व असल्या गोष्टींवर वाद होउ शकत नाही .

भडकमकर मास्तरांचे स्वागत

लेखक कवटी यांनी शुक्रवार, 05/12/2008 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
कित्तेक दिवस अज्ञातवासात गेलेले भडकमकर मास्तर आज पुन्हा मिपावर अवतीर्ण झालेले दिसले. त्यांच्या अनुपस्थीतीमुळे बरेच दिवस त्यांचे नर्मविनोदी लेख, पुस्तक्-नाटक-चित्रपट परिक्षणे, शिल्प/चित्रकला , निदान गेला बाझार फोटो इ. मिपावर आलेले नव्हते. आता हा सगळा ब्याकलॉग लवकरात लवकर भरून काढा अशी मी त्याना विनंती वजा धमकी देत आहे.

२४ X ७ वाहिन्यांच्या विरुद्ध हायकोर्टात जनहित याचिका

लेखक मोहन यांनी शुक्रवार, 05/12/2008 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
संगीतकार जोडी विशाल - शेखर मधल्या विशालने २४ X ७ वाहिन्यांच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल कराचे ठरवले आहे. मिपावर काही मंडळींची या आधी काही दिवस अश्या अगोचर वाहिन्यांच्या विरुद्ध मते वाचली . ज्यांना या जनहित याचिकेत सहभागी व्हायचे असेल त्यांच्या करता हा दुवा देत आहे. http://smallchange.in/ आपला मोहन

झुंज त्याची व्यर्थ गेली

लेखक पुष्कराज यांनी शुक्रवार, 05/12/2008 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
लाख दिवे विझु नये त्याने स्वताचीच वात केली तुंम्ही दिवस पाहिला त्याची कायमची रात झाली नभी चंद्र्मा खेळ्तो खाली माझा रवी तळपे हा सार्‍या दगड्-धोंड्यात माझा एक तारा झळके हा घाव सोसले सोसले त्याने ह्रद्याची ढाल केली तुंम्ही दिवस पाहिला त्याची कायमची रात झाली वीर गती मिळे त्याला डोळा पाणी का आणावे पण लाख मेल्या मनांसाठी एक त्याने का मरावे? तरी झुंजला झुंजला त्याने वाद्ळाला मात दिली तुंम्ही दिवस पाहिला त्याची कायमची रात झाली हार्-फुले फिके शब्द सारा क्षणाचा देखावा धग चितेची तशीच खेळ सत्तेचा पहावा आज माझा रवी मावळला उद्या तुमचा जाइल आज बैल सत्तेवर उद्या राज्य रेड्या
Taxonomy upgrade extras

पुरे झाले चंद्र सूर्य!

लेखक केदार केसकर यांनी शुक्रवार, 05/12/2008 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, ही माझी नवीन कविता. कशी वाटतेय ते नक्की सांगा. एका स्त्रीचे मनोगत रेखाटण्याचा हा प्रयत्न कितपत यशस्वी झालाय? कशी सुचली हे नंतर सांगेनच.