Skip to main content

प्रिये..!

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 28/04/2009 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
तात्यांच्या सूचनेवरुन ..( पण खास जमली नाही असं वाटतं ) झाकला ग तुझा चेहेरा काळ्याकुट्ट बटांनी आकाशीचा चंद्र जणु ग्रासला ग नभांनी.. !! ******** नसेल तुझ्या गालांवर लाली निळी कमळंसुद्धा तळ्यात फुलतात नसतील तुझे ओठ गुलाबी काळी द्राक्ष सुद्धा रसरशीत असतात !!
Taxonomy upgrade extras

खरेदी - कोणता घेऊ?

लेखक समजा मी क्ष यांनी मंगळवार, 28/04/2009 06:56 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बूट चप्पल फेकण्याची टूम निघाली आहे. त्यावर मला सुचलेले हे चित्र.
Boot
माझी चित्रकला हलकी घ्यावी हे सुजाण प्रेक्षकांना कळेलच :) अद्वैत.

आला वसंत (कलादालन)

लेखक अनामिक यांनी मंगळवार, 28/04/2009 03:57 या दिवशी प्रकाशित केले.
खालचे सगळेच फोटो ऍटलांटा बॉटनीकल गार्डनमधे घेतलेले आहेत.

अक्षय तृतियेचा आणी आंबे खाणे याचा काय संबंध आहे??

लेखक निशिगंध यांनी सोमवार, 27/04/2009 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षय तृतियेचा आणी आंबे खाणे याचा काय संबंध आहे. आमच्या घरी अक्षय तृतिया नंतरच आंबे खाण्याची परवानगी आहे. व का खायचे हे विचारायची पण सोय नाही X( . एक दोनदा विचारले पण उत्तर मिळाले " आम्ही आमच्या तीर्थरुपांना असले प्रश्न नाही विचारले, विचारले असते तर तुम्हाल उत्तर दिले असते" :W :W मला आंबे खुप आवडतात व मी चोरुन (घरच्यांपासून) ती खुप खातो. अगदी पहील्या दिवसापासुन ( जेव्हा प्रथम दिसतील) पाउस पडेपर्यंत जवळपास रोजच आंबा पोटात जातोच. :D :D :D पण राजरोस घरी आणून खाण्यासाठी अक्षय तृतीयेची वाट पहावीच लागते. आणी तोपर्यंत रोज मनात भिती की, आंबे संपतील. पण असे काय? याला काय धार्मिक आधार आहे काय?

मुखवटे

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 27/04/2009 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
कोणास दोष देऊ..? मी ही गर्दीतला .. जात्यातला कधी , तर कधी सुपातला . माझ्याच सोबत्याची , अंत्ययात्रा हो निघाली , सण्डे होता म्हणुनी , मी ही अटेण्ड केली . दूरुनच जरा घेतले , दर्शन पार्थिवाचे , उपचार जरासे केले , अंत्ययात्रेत चालण्याचे . दुरुन उपचार सारे , मग आंघोळ तरी कशाला..? मी करुनी विचार ऐसा , बाजार सण्डेचा केला . सारे असेच होते , जे भेटले तिथेही , हायसे वाटले मलाही कि त्यांच्यातलाच मी ही घरे कसली आमुची ..? हे अड्डे संभावितांचे ..! भेटतील इथे मुखवटे .. प्रत्येक चेह-याचे..!!

आदरांजली !!!

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी सोमवार, 27/04/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रसिध्द सिने अभिनेते फिरोज खान यांचे दुर्धर आजाराने निधन झाले आहे फिरोज खान हे खुप दिवसांपासुन कॅन्सर सारख्या असाध्य रोगाने आजारी होते रविवारी रात्री बेंगळुरु ईथल्या त्यांच्या फार्म हाउसवर त्यांचे निधन झाले फिरोज खान म्हणजे बॉलिवुडमधील बोल्ड आणी स्टाइलिश व्यक्तीमत्व होत त्यांचे गाजलेले चित्रपट म्हनजे कुर्बानी, दयावान अशा या जांबाजला भावपुर्ण आदरांजली

भाविष्यकाळातील मिपाकर!

लेखक रम्या यांनी सोमवार, 27/04/2009 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या शेजार्‍याचा शाळकरी चिरंजीव भारीच हुशार, तल्लख बुद्धीमत्तेचा, उत्साही आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, चित्रकला, हस्तकला, वैज्ञानिक प्रयोग यावरील नाना प्रश्न विचारून मला हैराण करतो नुसता. विमान कसं काय हवेत उडतं? या प्रश्नाचं उत्तर देताना त्याला राईट बंधूंची कथा सांगितली तर पठ्ठ्या भारावला. आपण सुद्धा विमान बनवू म्हणून मागे लागला. चर्चा रिमोट कंट्रोल्ड विमाना पर्यंत चालत आली. रिमोट कंट्रोल्ड विमानाचं फक्त इंजिन कसं बनवायचं सांगा बाकीचं विमान मी स्वतः बनवतो म्हणून माझं डोकं खाऊ लागला. कुठून दुर्बुद्धी झाली आणि राईट बंधुंची कथा त्याला सांगितली असं होऊन गेलं. त्याची समजूत काढता काढता नाकीनऊ आले.