Skip to main content

आय लव चप्पाती :)

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 07/05/2009 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
पोळ्यांचा नकाशा तिला कळला नाही पोळपाटाची अदा मला वळली नाही वाटत होत मला (स्वयंपाक)घरात बोलायचं काम नसतं पण नंतर कळलं कितीही बोल्ल तरी कणीकान फक्त तींबूनच घ्यायच आसत आता असं वाटतंय तिला भेटावं .सर्व काही सांगाव (मी पीठ/पाणी घालाव) तीने कणीक फक्त तेवढ मळाव नाही मिळाली हेल्प तरी बोलण्याच समाधान मिळणार आहे ''आज मी फक्त चपात्याच करणार आहे '' असं (एकदा स्वप्नात तरी)मी तिला ठणकावणार आहे .

तिसरी आघाडी हेच देशाचे आशास्थान !

लेखक मेथांबा यांनी गुरुवार, 07/05/2009 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या मृणालताई कुलकर्णींना कमीत कमी ४-५ इंग्रजी शब्द बोलल्याशिवाय एक सलग वाक्य बोलता येत नाही त्यांना राजा शिवछत्रपती मालिकेत नाईलाजाने का होईना शुद्ध मराठी बोलावे लागत आहे. तशीच स्थिती केंद्रात काँग्रेसची झाली आहे. ज्या कम्युनिस्ट पक्षाला हरवण्यासाठी बंगालमध्ये तृणमुलच्या ममता दिदिंशी काँग्रेसने अभद्र युती केली. त्याच युतीला आता विसरुन कम्युनिस्ट पक्षाचे पाय धरायची वेळ आलेली आहे. यालाच काव्यगत न्याय म्हणता येईल.

कृष्ण

लेखक दशानन यांनी गुरुवार, 07/05/2009 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण पाडवांच्या विंनती नूसार हस्तिनापूरला दुर्योधनासमोर पांडवांचा संधी प्रस्ताव घेऊ निघाले होते... त्यांच्या सारथी दारुक कृष्णाला विचार मग्न पाहून विचारतो की "महाराज, आपण दुखी आहात की आनंदी हे आपल्या चेह-याकडे पाहून मला समजले नाही कृपया आपण स्वतःच सांगा" "सारथी दारुक! तो बघ अस्ताला चालेला सुर्य ! प्रभात काळी तो विजेता असतो.. एकदम तेजस्वी...व जेव्हा अस्ताला चालेला असतो तेव्हा देखील तो अक्राळस्तेपणा न करता धीर गंभीर पणे.. शांत... रक्तमय लालीमा अंगावर खेळवत... आपला पराजय खुल्या मनाने स्वीकारत.... पुन्हा लढण्याची... उद्या उगवण्याची तयारी करत चाललेला असतो !

गाठोडं

लेखक जागु यांनी गुरुवार, 07/05/2009 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टिंना ठेवावे जतन करुन आठवणींच्या गाठोड्यात गाठ बांधून ! जतन करावी एखादी ओळ गाण्याची रिकाम्यावेळी अर्थासकट गुणगुणायची ! स्मरणात ठेवाव एखाद सुख छोटसं, दु:खावर फिरवण्यासाठी मोरपिस हलकसं ! जपुन ठेवावी एखादी शाब्बासकी, खिन्न मनाची पाठ थोपटण्यासाठी ! लक्षात ठेवावं एखादं स्वप्न आगळ, उत्कर्षाच्या मार्गावर हलकेच शिपंडावं ! आठवणीत ठेवावी एखादी कथा, योग्य वळण लावण्यासाठी स्व: गाथा ! स्मरणात ठेवावी एखादी मैत्री, साठेलेलं सुख-दु:ख वाटप करण्यासाठी !
Taxonomy upgrade extras

माझ्या जमीनीच गाणं

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 07/05/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी. लई दिवसापास्न मी तुम्हास्नी माझ्या शेतावर घेवुन जायच म्हनत होतो. तो योग आज आला बघा. चला तर मग माझ्या शेतावर. माझ्या जमीनीच गाणं हि जमीन माझी काळी काळीभोर हि जमीन माझी लई दिलदार || ध्रु || हिच्यामंदी करीतो मी जोंधळा लावीतो कधिमधी हरभरा पेरावं मुठभर तर धान्य देई पोतभर || १ || हि जमीन माझी ... कोंबडी शेळी बकरं मेंढरं तसच पाळीतो मी रानपाखरं गोठ्यामंदी असती गाईगुरं वासरं || २ || हि जमीन माझी ... हि विहीर माझी लईलई भारी सतरा झरं तिच्यामंदी पानी भरी अहो मोटर चाले तास चार || ३ || हि जमीन माझी ...
Taxonomy upgrade extras

कामगार सभा

लेखक अमृतांजन यांनी गुरुवार, 07/05/2009 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी पं. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली गाणी ऐकत होतो...आणि नॉस्टॅल्जिक झालो. लहानपणी (५-६ वर्षाचा असेन) कामगार सभा हा रेडीओवर (व्हॉल्व्हचा) सकाळी ११.०० वाजता लागणारा होणारा कार्यक्रम मी उन्हाळ्याच्या सुटीत/इतर सुटीच्या दिवशी नेहमी ऐकत असे. "ऐरणीच्या देवा तुला..." वगैरे गाणी तोंडपाठे असत. त्यावरील अनेक गाणी कानावर पडल्यावर आजही त्या रम्य दिवसांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. मला कित्येक वर्षात माझे एक अत्यंत आवडते गाणे मात्र कुठेही मिळाले नाही- "माहेराला जा.." अशा आशयाचे ते गाणे होते. आणि दुसरी ओळ "झिम्मा खेळु" वगैरे अशी आहे. कोणाला आठवते आहे ते गाणे?

...तोच आहे.

लेखक अंकुश चव्हाण यांनी गुरुवार, 07/05/2009 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
...तोच आहे. बासरीत सूर ओतले ज्याने, नंदनवन गोकुळी फुलवीले ज्याने, तुजवरी छाया कृपेची धरणारा मुरारी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! कालियाचे मर्दन केले ज्याने, कन्साचे ताड्न केले ज्याने , तुज वादळात सावरणारा गिरिधारी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! तुलसिदलात स्वत:ला तोलले ज्याने, द्रौपदिचे लज्जारक्षण केले ज्याने , तुज दु:खाच्या भवसागरातुन तारणारा हरी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! कौरावांविरुद्ध पांचजन्य फुंकला ज्याने, अर्जुनास गीता सांगितली ज्याने, तुज आत्मबळ देणारा सुदर्शनधारी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! ही कविताही जर माझ्याकडून पुनर्प्रकाशित झाली असेल तर क्रुपया मला तसे सांगा.

उदासबोध

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 07/05/2009 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रशेखर महामुनींच्या या धाग्यावर जेव्हा प्रतिसाद आले त्यावेळी ही चर्चा अशी वळण घेईल असे त्यांना वाटले नव्हते. ते म्हणतात
आस्तिक - नास्तिक हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला एखादि गोष्ट जर नसेल पटत तर किमान समोरच्या व्यक्तिच्या भावनांचा आदर करावा असे मला मनापासुन वाटते.
सहमत आहे. या विषयी नरहर कुरुंदकरांचे विचार पटतात. ' माझा देवावर विश्वास नाही. माझा धर्मावर विश्वास नाही.

ती माझी कविता

लेखक गोगट्यांचा समीर यांनी गुरुवार, 07/05/2009 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
ती , अल्लड ,अवखळ ,चंचल सरिता ती, अद्भुत, अनोखी नव परिकथा , ती , सुन्दर,सोज्वळ,गौर रूपगर्विता, ती ,आसमन्ती, अकस्मात झलके विद्युल्लता ती माझी कविता, तीच माझी कविता ॥
Taxonomy upgrade extras