Skip to main content

मिहार

लेखक दवबिन्दु यांनी रविवार, 17/05/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
कोनतीबी सोसायटी म्हनली कि डोल्यापुढ आपसात भांडनारे सोसायटी मेंम्बर येतात. सगल्याना इगो आस्तो. पन कान्दीवली मधी चारकोपला येक मिहार नावाची हायफाय हौसिंग सोसायटी हाए तिथ कोन्त्याबी मेंबराकड लग्न, एन्गेजम्येंट आस कायबी आस्ल तर सोसाटीतले सगले लोक एकसाथ येतात. एकमेकाना लागल ति मदत करतात. नंतर लग्न, एन्गेजम्येंटच्या ४-५ दिवस आधि सर्वे मिळुन रातभर नाच गाणी म्हंतात. मी गेल्या वेळला तिथ गेलो व्हतो आमच्या पाव्हन्याकड लग्न होत तर सर्वे जमले आनि परत्येकान सारी रात जुन्या हिंदी पिक्चरामधली गानी म्हटली. सोबतीला ढोल्की होती आनी घुंगरु, पन्जाबी चिपल्या आस काय काय होत. जास्त करुन लताजीची गानी म्हटली.

श्रेय

लेखक स्वप्नयोगी यांनी रविवार, 17/05/2009 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या या कवितेचे सारे श्रेय तुझे कवितेचा आशय तू शब्द मात्र माझे

लालू प्रसाद यादव ह्यांचा निवडणूक निकाल..

लेखक अनुप कोहळे यांनी रविवार, 17/05/2009 03:17 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो, नमस्कार, २००९ च्या निवडणूकी चा निकाल लागला. लालू पाटलीपुत्र येथून निवडणूक हरले आणि सरण येथून जिंकले. हे कसे काय? कुणी स्पष्टीकरण देईल का?

लोकशाही २००९

लेखक विकास यांनी रविवार, 17/05/2009 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसंख्येने जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारतात आज १४ व्या लोकसभेचे सूप वाजले आणि १५ व्या लोकसभेच्या आगमनाची तुतारी. काँग्रेससह संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार येणार हा केवळ औपचारीकतेने होण्याचा विधी उरला आहे. सर्वप्रथम त्यानिमित्त काँग्रेस आणि सपुआचे अभिनंदन. वृत्तपत्रातील बातम्यांचा विचार केला तर, या वेळेस उत्तरप्रदेशात वेगळी चूल मांडून एका अर्थी धोका पत्करत, विशेष करून त्या निर्णयास काँग्रेसमधील ढुढ्ढाचार्यांचा विरोध असूनही यश मिळवून दाखवल्याबद्दल राहूल गांधींचे पण अभिनंदन.

कारुण्याशा

लेखक शरदिनी यांनी रविवार, 17/05/2009 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
कारुण्याशा... एक कारुण्यडगरीवरचा रौद्रभीषण चिपसेट मत्तदुर्दैवाच्या औक्षणधुंद करालदाढा कर्र कर्र कर्र कर्र सत्यवानाच्या तहवैभवाने टाकलेले सुन्नगारूड अन जवनिकेतून कर्णिकेकडे खळाळणारा रुधीरप्रवाह लब डब लब डब नयनांच्या दलदलीतला हलताडुलता वंचनदाह स्व-टाहोने लिंपून घेतलेला शारीर खुळखुळा खुळा रे खुळा, खुळा रे खुळा... एका स्वप्नपिंपळपानावरून पुनश्व हरि ओम पीतवल्लरींच्या अनुमानात कडाडबूम मेघवर्षा धो धो धो... अन मग सारंच शांत.. पुढच्या पिंपळपानापर्यंत... १६ मे २००९ , पुणे
Taxonomy upgrade extras

तयांचे व्यर्थ न हो बलिदान ( अंदमान पर्व)

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 16/05/2009 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
ध्येयाने भारलेला मनुष्य जेव्हा संग्रामात उतरतो तेव्हा त्याला जीवनाची आशा नसते आणि मृत्युचे भयही नसते. अखेर बलाढ्य शत्रूही अशा वीरांपुढे हतबल होतो. हिंदुस्थान प्रजासत्ताक सेना, युगांतर, अनुशिलन चे क्रांतिकारक हे ध्येयवादाचे प्रतिक आहेत. हाती शस्त्र घेउन रणांगणात उतरलेले हे योद्धे. काही आपल्या कार्यात धारातिर्थी पडले, काही शत्रूच्या गोळ्यांना बळी पडले, काही फासावर चढले आणि आपल्या हौतात्म्याने हिंदुस्थानच्या इतिहासात अजरामर झाले. मात्र या सशस्त्र संग्रामपर्व गाजविणाऱ्या संघटनांमध्ये कार्यरत असलेले अनेक वीर इंग्रजांच्या हाती जीवंत सापडले आणि अभियोग दाखल होऊन जन्मठेपेला गेले.

लाल झेंडा अमर रहे !!

लेखक विंजिनेर यांनी शनिवार, 16/05/2009 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे आशास्थान: कॉ. बंधू आणि भगिनींनो, आपल्या पूजनीय आणि "आदर्श" लाल झेंड्याचा लोकसभा निवडणूकांत सपाटून पराभव झालेला आहे. स्थिती इतकी वाईट आहे की देशाचे आशास्थान सोडाच पण ह्या निवडणूकांत झालेल्या या पानिपतातली लक्तरे कुठल्या वेशीवर टांगायची हा प्रश्न "साध्या राहणीच्या" प्रकाशजी करत यांना पडला आहे. प.

ओझं

लेखक स्वप्नयोगी यांनी शनिवार, 16/05/2009 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं, उंच भरारी घेणार्‍याला आभाळाचं ओझं नसतं.