Skip to main content

आणि बांध फुटला

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 01/07/2009 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या घरात पालक आणि मुले ह्यांच्यात अभ्यासावरुन भांडणे असतात त्यांना मी एक प्रश्न न चुकता विचारतो. " काहो, मुलाला जवळ बसवुन पाठीवरुन किंवा डोक्यावरुन हात फिरवल्याला किती दिवस झाले"? बहुतेकांच्या चेहेर्‍यावर 'कुठल्या येड्चापाच्या नादाला लागलो 'असे भाव असतात. ___________________________________________________________ चिरंजीव माझी कुठलीही मदत न घेता आपणच मिळवलेल्या नोकरीवर जाण्याचा पहीला दिवस. बुट घातले आणि दरवाजा उघडणार इतक्यात मी त्याला हाक मारली, "बेबी"( मला मुलगी नाही, आणि आहे ती खुप लांब असते). तो वळला, आणि माझ्या ओठाचा चंबू बघुन परत फिरला. हसत हसत गालाचा एक छान पापा दिला.

मृगजळ- (अंतिम)

लेखक प्राजु यांनी बुधवार, 01/07/2009 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
मृगजळ -१ मृगजळ - २ माय.. ए माय! उठ गं.. थोडं जेवून घे. आज रात्रिच हे वाळवंटातलं जगणं संपणार आहे.. बघ तू. हितनं लांब जायचंय आपल्याला. खूप लांब." ताट वाढता वाढता ती बोलत होती.. मायचं ताट वाढून घेऊन ती माय जवळ आली.."माय... ए माय... माय गं!!! माऽऽऽऽऽऽऽऽऽय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!" हातातलं ताट थाडकन् खाली पडलं.

धोंडोपंत कुठे गेले?

लेखक हळवा जीव यांनी बुधवार, 01/07/2009 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस त्यांचे लेखन वाचयला मिळाले नाही म्हणुन विचारल हो. गेले कुठे?

वांद्रे वरळी सागरी सेतु

लेखक प्रशु यांनी मंगळवार, 30/06/2009 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज अखेर वांद्रे वरळी सागरी सेतु वापरण्यासाठी खुला झाला. बरीच वर्ष हे काम चालु होत. पण आज अशी बातमी आहे कि या सेतुला स्व. राजी व गांधी यांचे नाव देण्यात येत आहे. माझ्या माहीती प्रमाणे हया सेतुची पायाभरणी शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते झाली होती आणी ह्याचे नाम करण स्वातंत्रवीर सावरकर सागरी सेतु असे त्यावेळी करण्यात आले होते. मग आज अचानक राजी व गांधी यांचे नाव कसे पुढे आले. आणी हे नाव पुढे करणारे पहिले शरद पवार आणी हि घोषणा करणारे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. हे कोंग्रेस वाले त्यांचा सावरकर द्वेष कधी थांबवणार आहेत?

आभाळ ..

लेखक मनीषा यांनी मंगळवार, 30/06/2009 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
कोसळोनी यावे .. आभाळ आज वाटे ओसंडोनी जावे अन् .. जळं साचलेले | गुंफलेली माला जणू .. व्हावे त्या सरींनी ओघळलेले मोती व्हावे .. थेंब पावसाचे | चमचमत्या किरणां सवे .. इंद्रधनू रेखावे शीळ घुमावी वार्‍याची .. हिरव्या, ओल्या बना मधे | सळसळत्या पानांतूनी .. संगीत नवे जन्मावे रंग रंगी, सुरेल कंठी .. खगांनी मग ते गावे | रंगीत-गंधीत धात्रीने .. साज सुखाचे ल्यावे मेघश्याम आभाळ तीला .. क्षितीजावर भेटावे |

चिल्ड्रन ऑफ हेवन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 30/06/2009 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
जागतीक चित्रपटांमध्ये एक मानाचे स्थान पटकावुन असलेला हा इराणी चित्रपट. सुंदर ह्या शब्दाशिवाय अन्य उपमाच ह्याला शोभणार नाही. बहिण भावाच्या प्रेमाची एक निर्व्याज कथा आणी त्याच्या आजुबाजुने येणारे भावनीक प्रसंग, त्या त्या काळचे सामाजीक संदर्भ हा ह्या चित्रपटाचा आत्मा. दिग्दर्शक माजिद माजीदी सारखा ताकदवान माणुस. चित्रपटाची भाषा पर्शीयन आहे पण खरे सांगायचे तर ह्या चित्रपटाला बघताना भाषेची गरजच जाणवत नाही इतकी प्रत्येक फ्रेम हृदयाचा ठाव घेते. अली आणी झारा हे दोघे भाउ बहीण. अली ९ वर्षाचा तर धाकटी झार ७ वर्षाची.

लय आणि ताल शरिरातून व्यक्त करणे

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 30/06/2009 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
लय आणि ताल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्या शरिरात व्यक्त होताना त्यांचा घनिष्ठ संबंधही आहे. तालाबद्दल तात्यांनी लेख लिहिला, त्यात त्यांनी आठवण करून दिली हृदयाच्या ठोक्यांमधला ताल हा आपल्या सर्वांमध्येच असतो. पुढे या ठिकाणीच मी वसंतराव देशपांड्यांची एक ध्वनिफीत ऐकली, त्यात त्यांनी सांगितले की हृदयाच्या ठोक्यातून येणारी अचल लय असते, तिच्यातून बदलती लयकारी येऊ शकत नाही - कारण हृदयाची लय अचानक बदलली तर जीव घाबरा होतो, सौंदर्यानुभव येत नाही. पण तरी तात्यांनी म्हटल्यासारखे हे खरेच जाणवते, की आपल्या शरिरात एकाप्रकारची लय असते.