गोविंदा आला रे आला | आता करू या गोपालकाला
ज्वारीच्या लाह्या, साळीच्या [तांदळाच्या] लाह्या, पोहे, चुरमुरे थोड्या ताकात ओलसर होतील असे भिजवून घ्यावे, त्यात भिजवून ठेवलेली हरभर्याची दाळ घालावी, गाजर, काकडी, पेरू, सफरचंद अशा फळांच्या बारीक फोडी, डाळिंबाचे दाणे [ऐच्छिक] घालावे, लिंबाचे आणि आंब्याचे लोणचे घालावे, खोवलेला नारळ, मीठ, साखर चवीनुसार घालावे, हिरव्या मिरच्या वाटून घालाव्या, आलं बारीक चिरून किंवा खिसून घालावं. म्हणजे चांगली चव येते. अगदी बशा भरतेवेळी किंवा वाटप करायच्या वेळी वरून दही घालावे, सगळे पदार्थ चांगले मिसळावेत आणि हिंग, जिरे-मोहरी घालून तेलाची किंवा तुपाची फोडणी आवडीप्रमाणे द्यावी. फोडणीत हळद मात्र घालू नये.
मिसळपाव
