मिसळपावच्या सर्व सदस्यांना व वाचकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा.
लहानपणापासून स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण आपण साजरे होताना पाहत असतो. शाळांमध्ये जेवढ्या उत्साहात हे सण साजरे होतात, तेवढे कॉलेज, विद्यापीठ किंवा ऑफ़िसांमधून साजरे होताना दिसत नाही. मी कॉलेजात गेलो होतो तेव्हा आठवतंय - मी, माझा वर्गमित्र आणि आणखी १५-२० विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कॉलेजातले काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून साधारणपणे ५०-६० लोकंच वेळेवर उपस्थित असत. काही शिक्षक उशीरा का होईना? पण निदान हजेरी तरी लावून जात. पुणे विद्यापीठात एम्.एस्.सी. करत असताना सकाळी लवकर उठून झेंडावंदनासाठी मेन बिल्डिंगपाशी गेलो तेव्हा तर फारच निराशा झाली. सायन्स आणि आर्ट्सच्या विभागांची संख्या विपुल असल्यामुळे दिसायला गर्दी बरीच होती. पण आमच्या रसायनशास्त्र विभागातून विद्यार्थी, शिक्षक मिळून दोन हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच मंडळी हजर होती. राष्ट्रगीत झाल्यानंतर चहा प्यायला मात्र सर्वजण हजर!
नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये मात्र उत्साहवर्धक चित्र होतं. एन्.सी.एल्. मेनगेटपाशी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण, राष्ट्रगीत होतं आणि त्यानंतर संशोधन-विद्यार्थ्यांच्या गोल्डन ज्युबिली होस्टेलमध्ये डायरेक्टसह अनेक वैज्ञानिक आणि कर्मचारी ९ वाजताच्या ध्वजारोहणासाठी हजेरी लावायचे. डायरेक्टर येणार असल्यामुळे आठवडाभर आधीपासून होस्टेल स्वच्छ करणं, सजवणं इत्यादि कामं तिथले संशोधनाचे विद्यार्थी करतात.
इथे बिट्स, पिलाणीमध्ये आज स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि देशभक्तिपर गीतांचं गायन झालं. विद्यार्थ्यांची उपस्थिती तशी बेताचीच होती, पण टीचिंग आणि नॉनटीचिंग स्टाफ़मधले जवळजवळ सर्वजण उपस्थित होते (आठवडाभरात सुमारे पन्नासएक लोकांशी तोंडओळख झाली, त्यातले जवळजवळ सर्वजण उपस्थित होते. तेही सहकुटुंब).
आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून ६२ वर्षे झाली. त्यात काय कमावलं, काय गमावलं, भविष्यात काय करायला हवं, यावर अनेक थोरामोठ्यांनी अनेकदा विचारमंथन केलेलं आहे. आज भारताला गरज आहे ती भारतीय माणसाने भारतीय माणसासाठी वेळ देण्याची. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर बिट्स पिलाणीचे व्हाईस चान्सेलर, कम्युनिटी वेलफ़ेअर डिपार्टमेंटच्या चीफ या लोकांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीजवळ येऊन हस्तांदोलन, नमस्कार करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात भाषणबाजी करण्यापेक्षा हे अधिक महत्त्वाचं आहे. नाही का?
वाचने
3070
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिसळपावच्
भारतमाता की जय !!
महाविद्या
शुभेच्छा
In reply to महाविद्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाकरांना..
सर्वांना
शुभेच्छा!!
रक्तदान !
जय हिंद!!
सर्वांना
शुभेच्छा!!