Skip to main content

'नव'कविता

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 08/09/2009 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या मनुची नवी माणसे, नवहृदयाची नवभाषा नवे रंग हे नवीच आशा, नवक्षितिजे अन नव्या दिशा नवजीवनाच्या रांगोळीत हे, भरून टाकशी रंग नवे सुखदु:खाच्या ठिपक्यांमधली, जागा भरूनी काढू सवे शरद नको अन ग्रीष्म नको हो, वसंत तो झालाच जुना नव्या ऋतुची नवी पालवी, त्यावर अपुल्या पाऊलखूणा गाऊ आपण गीत नवे, तो राग नवा, हा ताल नवा नव्या बंदीशी, नवीन भाषा, अपुला गावा ख्याल नवा अपुले असतील प्रश्न नवे, उत्तरे नवी, अन चुका नव्या नव-वाटेचे नवीन फाटे, ध्येय नवी अन दिशा नव्या वळूनी बघता पाठीमागे, आठवणींचा गोफ दिसे किती भासले सुंदर तरीही, गोफ नसे ते जाल असे हातामध्ये हात देऊनी, चल टाकू पाऊल पुढे नवपर्वाच्या सुरवातीला

मिरजेत दंगल , कारण..

लेखक ओंकार देशमुख यांनी मंगळवार, 08/09/2009 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
http://pune-marathi-blog.blogspot.com/2009/09/blog-post.html मी १० वीत असताना वडीलांची बदली मीरजेत झाली त्यामुळे तीकडे जाण्याचा योग आला. मुस्लीम बहुसंख्य असलेलं मीरज हे अत्यंत बकाल शहर आहे. लहान रस्ते , मधे फ़िरणारी जनावर , कत्तलखाने , चौका चौकतले दर्गे आणि लहान गल्या असं लहान शहर..म्हणायला इथे एक ब्राम्हण आळी आहे.

समिधा

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 07/09/2009 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
उभ्या जन्मात मी बहुधा तुझ्या यज्ञातली समिधा || कधी मी सावली झाले तुला ग्रीष्मात जपणारी तुझ्या बहरात मी झाले कळी गंधात रमणारी बहरले धुंद मी कितीदा तुझ्या यज्ञातली समिधा || कधी अभिसारिका झाले, प्रिया झाले, सखी झाले रमा नारायणाची, शंकराची पार्वती झाले कधी कृष्णा तुझी राधा तुझ्या यज्ञातली समिधा || तुला पाहून माझ्या अंतरी प्राजक्त दरवळतो कुठेही जा, तुझ्यासाठीच माझा जीव घुटमळतो प्रिया, तू सूर्य मी वसुधा तुझ्या यज्ञातली समिधा ||
काव्यरस

गोष्टी योगायोगाच्या

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 07/09/2009 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नागिरीच्या दौऱ्याविषयी गेल्या वेळी लिहिलं होतं. याच प्रवासात आणखी एक गंमत घडली. "मोकळे' होण्यासाठी आम्ही मलकापूरच्या पुढे एका ठिकाणी सहज थांबलो. शेजारीच एक छोटा ओहोळ आणि त्यावर पूल होता. पलीकडे एक छोटीशी टपरी होती. अचानक हर्षदाला आठवलं, "अरे, रत्नागिरीच्या पहिल्या दौऱ्याच्या वेळी आपली एसटी इथेच बंद पडली होती!' मीदेखील आसपास पाहिलं आणि ओळखीच्या खुणा पटल्या. तीच छोटी टपरी, तोच सुनसान रस्ता आणि तेच वळण. लग्नानंतर पहिल्यांदा रत्नागिरीला गेलो, तेव्हाच्या प्रवासात आमची रात्रराणी बंद पडली होती तिथे. पहाटे चारचा सुमार असेल. अंधुकसं फटफटलं होतं. गाडी काही लवकर दुरुस्त होणार नव्हती.

(घजळ )

लेखक चेतन यांनी सोमवार, 07/09/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
यशोधरांची सुंदर गझल http://misalpav.com/node/9264 वाचून मला ही लिहावसं वाटलं :& ~X( ~X( ~X( असे चोंदले, राहिला श्वास नाही घसे शेकले, थांबला त्रास नाही उरी कोंडला, पूर बेभान सारा असो भेसुरा! कोरडा खास नाही मला धाप लागे, उरी दाटल्याने कुणा हाक देईन, आवाज नाही किती क्षोभ नाकातुनी शेंबडाचा मिळाली सर्दी साथ, आराम नाही जसे होतसे प्राण नाकात गोळा जरी पाहिजे, मोकळा श्वास नाही किती झीट झाले, तरी पार नाही उतारे ठरे फोल ईलाज नाही चेतन अवांतर: कधीपासुन ही सर्दी काही पाठ सोडत नाही आहे.
काव्यरस

भंगार रथ

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 07/09/2009 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
भट्टीत भंगार भरणे (भभभ) Charging the EAF

'नव' निर्माण होण्यापुर्वीच

लेखक वि_जय यांनी सोमवार, 07/09/2009 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रविण महाजन, श्वेता परुळेकर, आणी आता संजय घाडी, संजना घाडी 'नव' निर्माण होण्यापुर्वीच राजसाहेबांचे नवे नवे खंदे शिलेदार बाहेर पडतायत.. काय वाटत मिपाकरांना? राजसाहेबांच काही चुकतय?

हम जब होंगे.....

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 07/09/2009 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांनी रिकामा वेळ मिळाला. ९.३० वाजेपर्यंत झोप काढली. दादरला जायचे होते. पण ते दुपारी ३ नंतर. त्यामुळे आता करायचे काय हा प्रश्न उभा राहीला. 'सर्वसाधारण गृहस्थ 'ही भुमिका निभावुया आज असे वाटले. हातात झाडु घेतला. घरातली जळमटे कढली. जास्त नव्हती. लगेच आटोपले. संडास बाथरुम पावडर टाकली. रद्दी विकुन आलो. ट्युबलाईट बदली केली. ब्रशने संडास बाथरुम साफ केले. जवळ जवळ १० वर्षाने 'नॉर्मल हजबंड' ची कामे करताना बघुन सौ.