कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने अखेर डाव साधला
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने अखेर डाव साधला. मनसेच्या आमदारांनी सभागृहात घातलेल्या गोंधळाचे भांडवल करून मनसेच्या चार आमदारांना चार वर्षासाठी निलंबनाचा ठराव विधीमंडळ कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मांडला असून त्याला बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले.
मिसळपाव
गेले चार सहा दिवस
खरतर ह्या अॅनीमेशनपटाची कथा आपल्या बॉलीवुड स्टाईलचीच म्हणता येईल. पण सादरीकरण मात्र अतिशय प्रभावी, उच्च आणी खिळवुन ठेवणारे. दिग्दर्शक रॉजर एलरला ह्या बद्दल अगदी पैकीच्या पैकी मार्कस.
काल पु.लंची जंयती आणि त्याच्या एक दिवस आधी सुनीताबाईंच्या जाण्याने अवघे साहित्यविश्व हळहळले. वरुन कडक शिस्तीच्या आणि करारी व्यक्तिमत्वाच्या पण आतुन मृदू स्वभावाच्या सुनीताबाई ‘आहे मनोहर तरी...’ नंतर केवळ पुलंच्या पत्नी म्हणून नव्हे तर एक उत्तम सिद्धहस्त लेखिका म्हणून साहित्यविश्वाला समजल्या. पु.लंच्या जडणघडणीतही त्यांचा वाटा मोठा आहे. आम्हा वाचकांना पु.ल. आणि सुनिताबाई त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातुन आणि थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या आठवणीतून उमजले, भावले.