Skip to main content

विचार ( हायकू)

लेखक रानरेडा यांनी बुधवार, 18/08/2021 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
विचारांच्या चिखलात लोळत होता मनरुपी डुक्कर

सत्य

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 17/08/2021 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा सहा ऋषी जनकल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन सत्याच्या शोधात हिमालयात पोहचले. एका हिमाच्छादित पर्वतावर त्यांनी कठोर तपस्या सुरु केली. सत्य त्यांच्या समोर प्रगट झाले. सर्वांनी सत्याला तपासले. आनंदाने सर्वांनी सत्याचे वर्णन करणे सुरु केले. प्रत्येकाने केलेल्या सत्याचे वर्णन वेगवेगळे होते. सर्व प्रज्ञांवंत होते. सर्व विचार करू लागले, आपल्यापैकी कुणीही असत्य बोलत नाही. सर्वच सत्यधर्म पाळणारे आहे. मग प्रत्येकाने सत्याचे वेगळे स्वरूप कसे काय अनुभवले. शेवटी त्यांच्यापैकी एका वृद्ध ऋषीने मौन सोडले, तो सर्वांना उद्देश्यून म्हणाला, बहुतेक प्रत्येकाचे सत्य वेगळे असते.

नियतीचे वर आणि माणसाची निवड (कथा परिचय : ९)

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 17/08/2021 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख: १ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! २. एका आईचा सूडाग्नी ३. कुणास सांगू ? ४. ‘भेट’ तिची त्याची ५. नकोसा पांढरा हत्ती ६. ती सुंदर? मीही सुंदर ! ७. ‘लॉटरी’.....अरे बापरे ८. तीन मिनिटांची ये-जा ................................... आपणा सर्वांचे लेखमालेच्या नवव्या भागात स्वागत ! इथे एका बोधकथेचा परिचय करून देतोय आणि त्याचे लेखक आहेत मार्क ट्वेन. हे लेखक 19 व्या शतकातील एक नामवंत अमेरिकी साहित्यिक होते.

अभियांत्रिकीचे दिवस-२

लेखक पाटिल यांनी सोमवार, 16/08/2021 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
"ती मला नाही म्हणाल्यामुळं माझ्या आयुष्यात एक जबरदस्त पोकळी निर्माण झालेली आहे..आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी, तू आम्हाला आणखी एक ओल्ड मंकचा खंबा ताबडतोब आणून दे..!'' अशा विव्हळ स्वरात रात्री-बेरात्री कुणीतरी फोन करायचं.. होस्टेलच्या टेरेसवर आम्हा लोकांचं प्यायला बसणं, हे नेहमीचंच..

स्मरण चांदणे३

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 16/08/2021 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
        स्मरण चांदणे 3    गावात  एक साधुपुरुष ,ब्रम्हाजीबुवां (उच्चारी  बरमजीबाबा)होऊन गेले.त्यांचे मंदिर गावाचे पूर्वेस आहे.त्यांच्यावर लोकांची फार श्रध्दा.आजाराना कंटाळलेले लोक ब्रम्हाजीबुवाला साकडे घालतात. देवळाचे आवारात,राहून सेवा करतात.वेगवेगळ्या कारणांसाठी नवस बोलतात.'बाळगोपाळ घालणे',म्हणजे लहान मुलांना 'वरण भाकरीचे'जेवण देणे,त्यापैकी एक. जेवणात कधी कधी शिरा,नुक्ती पणअसे.मुले आपापल्या घरून ताट वाटी तांब्या घेऊन येत.यजमानाचे घरासमोर रस्त्यावर पंगती उठत. 'बरमजीब्वाच्या विशिष्ट ताला सूरातील,भक्ती रचना (आस्तुक्या) मौखीक स्वरुपात आ

स्मरण चांदणे३

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 16/08/2021 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
        स्मरण चांदणे 3    गावात  एक साधुपुरुष ,ब्रम्हाजीबुवां (उच्चारी  बरमजीबाबा)होऊन गेले.त्यांचे मंदिर गावाचे पूर्वेस आहे.त्यांच्यावर लोकांची फार श्रध्दा.आजाराना कंटाळलेले लोक ब्रम्हाजीबुवाला साकडे घालतात. देवळाचे आवारात,राहून सेवा करतात.वेगवेगळ्या कारणांसाठी नवस बोलतात.'बाळगोपाळ घालणे',म्हणजे लहान मुलांना 'वरण भाकरीचे'जेवण देणे,त्यापैकी एक. जेवणात कधी कधी शिरा,नुक्ती पणअसे.मुले आपापल्या घरून ताट वाटी तांब्या घेऊन येत.यजमानाचे घरासमोर रस्त्यावर पंगती उठत. 'बरमजीब्वाच्या विशिष्ट ताला सूरातील,भक्ती रचना (आस्तुक्या) मौखीक स्वरुपात आ

(कळेना मला)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 16/08/2021 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा संदीपभाउंची ही कविता http://misalpav.com/node/49141

(कळेना मला)

डोळ्या समोर तारे कसे चमकतात हे तुमच्या तासाला पहिल्यांदा बसल्यावर... ...मला कळालं! जीभ कशी अडखळते हे तुम्ही पहिल्यांदा प्रश्र्न विचारल्यावर... ...मला कळालं! हृदय कसे धडधडते हे तुमच्या समोर पहिल्यांदा हात पुढे करताना... ...मला कळालं! आता पुन्हा पुन्हा मार खायचा आहे हे माहीत असूनही घरी जाताना, दरवेळी गालावर उठलेली तुमची बोटं कशी लपवावी हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही! पैजारबुवा

कळेना मला

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 16/08/2021 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
मनात मोर कसे नाचतात हे तुला पहिल्यांदा पाहिल्यावर... ...मला कळालं! जीभ कशी अडखळते हे तुझ्याशी पहिल्यांदा बोलताना... ...मला कळालं! हृदय कसे धडधडते हे तुझा हात पहिल्यांदा हातात घेताना... ...मला कळालं! पुन्हा भेटायचयं हे माहीत असूनही तुझा निरोप घेताना, दरवेळी डोळ्यातलं पाणी कस अडवावं हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही! - संदीप चांदणे
काव्यरस

वर्तन विपर्यास

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 15/08/2021 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. अर्थात, तुम्ही म्हणाल या विधानात नावीन्य ते काय? प्रश्न माणसांसोबत कधी नव्हते? अगदी खरंय, ते आहेतच आणि असतीलही. समजा, तसे ते नसते तर प्रगतीच्या परिभाषा ना त्याने शोधल्या असत्या, ना परिमाणे वापरून परिणाम तपासले असते. एक मात्र खरंय की, काळाच्या ओघात अन् आयुष्याच्या प्रवासात पुढ्यात पडलेल्या प्रश्नांच्या व्याख्या बदलत असतात. कुणी म्हणेल की, बदल नावाचा प्रकार न बदलणारं वास्तव आहे. बदल हीच एक गोष्ट अशी असावी की, जी बदलता नाही येत कुणाला. बदलांना वेग असतो. चेहरा नसतो. तो द्यावा लागतो. मग तो माणूस असो की, अन्य कुणी.

तुटक तुटक..

लेखक पाटिल यांनी रविवार, 15/08/2021 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
१. रस्त्यावर वाढलेलं कुत्रं चुटकी वाजवून बोलावलं की लगेच शेपूट हलवत पायाशी येतं.. झोंबाळतं.. त्याच्या उचंबळून येण्याचा प्रवाह चहुदिशांना मुक्त असतो.. पण पाळलेल्या कुत्र्यांच्या प्रेमाचा ओघ त्यांच्या मालकांपुरताच वाहतो.. २. आकाशाने भुरकट ढग धरून ठेवले आहेत.. समोर स्तब्ध पाण्याच्या पृष्ठभाग.. तलम पापुद्र्यासारखा.. थरथरतोय अधूनमधून.. बहुतेक वाऱ्याच्या झुळकीचा हलका स्पर्श होतोय तिथे.. झाडाला विचारलं की हे खरंय का? तर त्यानंही होकारार्थी फांदी डोलावली... ३.