Skip to main content

पुणे शहरातील पीएमपी बसमध्ये डावीकडील स्त्रीयांची राखीव जागा आणि बिचारे पुरुष, मुलगे आणि वृद्ध

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 10/02/2010 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
--पुण्याच्या पीएमपी बसेस मध्ये डावीकडची पूर्ण बाजू स्त्रियांसाठी रविवार वगळता आठवडाभर राखीव असते, असा "स्त्री-पुरुष" समानतेच्या काळातही कायदा आहे. (स्त्री-पुरुष समानता पण हवी आहे, आणि प्रत्येक ठीकाणी आरक्षण सुद्धा) पण याचा नेहेमी स्त्रीयांकडून गैरफायदा घेतला जातो तो असा- (१) समजा डावीकडील सीट रिकामी आहे, आणि तरीही स्त्री उजवीकडच्या रिकाम्या सीटवर बसते, तर हा सुद्धा हा कायदा टोडण्याचाच प्रकार आहे. कारण, डावीकडची सीट रिकामी असल्यावर सुद्धा मुद्दाम मुली/स्त्रीया/आडदांड बाया, उजवीकडेच बसतात. थोडे काही म्हटले तर उगाच सगळ्या प्रवाशांचा रोष पत्करण्याची भीती. कारण बहुतेक कायदे पुन्हा स्त्रीकडून.

मिपासंबंधी..

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 10/02/2010 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपकरहो, मिपासंबंधी कुणाची काही तक्रार असल्यास, कुणा सभासदाचे सभासदत्व गोठवले/रद्द करण्यात आले असल्यास त्या संदर्भात काही विचारणा असल्यास कृपया मला व्यक्तिगत निरोप पाठवावा. मी सवडीनुसार उत्तर द्यायचा अवश्य प्रयत्न करीन. या संदर्भात येथे जाहीर विचारणा करण्यास/लिहिण्यास मनाई आहे. तरी असे धागे अप्रकाशित केले जातील याची कृपया नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, ही विनंती.. आपला नम्र, तात्या अभ्यंकर, मालक, मिसळपाव डॉट कॉम.

सतिश शेट्टी यांना मरणोत्तर सजग नागरिक पुरस्कार

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 10/02/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
७ फेब्रुवारी २०१० ला पुण्यात सजग नागरिक मंचा तर्फे सतिश शेट्टी यांना मरणोत्तर सजन नागरिक पुरस्कार देण्यात आला. संस्थापक विवेक वेलणकर यांनी पुरस्कारामागची भुमिका विशद केली. अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार होता परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येउ न शकल्याने त्याच क्षेत्रातील एक खरेखुरे आयडॊल सातारा जिल्ह्यातील शिवाजी राउत यांच्या हस्ते देण्यात आला. सतिश शेट्टी यांचे एक धाकटे बंधु संदीप शेट्टी व अमेरिकेतुन आलेले दुसरे बंधु संतोष शेट्टी यांनी तो स्वीकारला. माहिती अधिकार क्षेत्रात सामाजिक काम केलेले सतिश शेट्टी हे भारताच्या दुसर्‍या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा ठरले.

आज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है!

लेखक नीधप यांनी बुधवार, 10/02/2010 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली कधी कधी असे इमेल्स येतात की त्या वाचून मला जाम महत्वाची व्यक्ती झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी महत्वाच्या जागी बसलेली सर्वात खडूस व्यक्ती आहे असंही वाटायला लागतं. शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून बर्‍या आहेत. तेव्हा आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात... गेले १० वर्षं माझा नेट संचार मुक्तपणे चालू आहे. मायबोलीसकट इतरही अनेक पोर्टल्स आणि आता स्वतःचा ब्लॉगही अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो. या गेल्या १० वर्षात माझ्या आयुष्यात शिक्षण, करीअर इत्यादी संदर्भात अनेक उलथापालथी घडल्या.

बार्बेक्यू सॉस

लेखक स्वाती२ यांनी मंगळवार, 09/02/2010 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
बार्बेक्यू सॉस म्हटले की जीभेवर येते ती टिपिकल चव. काहिशी आंबट-गोड, काहिशी तिखट. टॉमॅटोचा बेस. आंबट पणा वाढवण्यासाठी विनेगर, गोडीसाठी ब्राऊन शुगर, कॉर्न सिरप, मध, काकवी वगैरे, मसाला म्हणुन कांदा-लसुण, मिरे,पाप्रीका आणि जोडीला तिखट. चव अजून वाढवायला वुस्टरशर सॉस, मोहरी कुट आणि शौकिन असाल तर चक्क थोडी रम किंवा विस्की देखील. माझ्या फाईलमधल्या दोन कृती देतेय.

हवी.....

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 09/02/2010 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली आत्महत्येचे खूपच प्रकार आणि कारणे ऐकू येतात्.....मन अगदी विषण्ण होते हे वाचून , ऐकून्.....म्हणून काही सुचलय ते मांडतोय..... हवी..... मरणाचा तुज ध्यास उगा का? जगण्याची ही आस हवी इतरांची सामान्य ठरावी... अपुली "स्टाईल" खास हवी ! गुणवत्तेच्या यादीवरती नाव असो वा नसो तुझे, 'पडलो तरीही अडलो नाही!' धडपडी अशी ही प्यास हवी ! कुणी कुणाला आवडते तर कुणास कोणी ठोकरते , जुने कशाला याद करावे? दाद सदा....नव्यास हवी ! उजेड कोणा जास्त भावतो मिणमिणता कोणास हवा ! कवाड ज्याचे तो उघडू दे, जळण्याची सवय्.....दिव्यास हवी !

नको आणखी

लेखक जयवी यांनी मंगळवार, 09/02/2010 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
फुलणे नव्याने नको आणखी उमलून मिटणे नको आणखी घायाळ व्हावे पुन्हा मीच का इष्कात झुरणे नको आणखी गंधात न्हालो तुझ्या साजणी निशिगंध चाफे नको आणखी येणे तुझे क्षणभराचेच का पेटून विझणे नको आणखी नजरेत जरबी कट्‌यारी तुझ्या बंदी, पहारे नको आणखी धुंदी चढावी सुरांनी तुझ्या कुठले बहकणे नको आणखी जगतोच आहे तुझ्याही विना आधार फसवे नको आणखी जवळीक नाही अताशा कुठे जखडून घेणे नको आणखी जयश्री अंबासकर