Skip to main content

'किल्ले जंजिरा': तिथले तथाकथित गाइड आणि त्यांचं ज्ञान!

लेखक बाबय यांनी सोमवार, 01/11/2010 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! किल्ले जंजिरा इथला एक अनुभव 'शेअर' करतो... काही दिवसांपूर्वी जंजिरा किल्ला बघायला गेलो होतो. बरोबर कंपनीमधले मराठी/अमराठी, किल्ला पुर्वी बघितलेले / न बघितलेले असे लोक होते. मी हा किल्ला तिसरयांदा बघत होतो. पण यावेळी बरेच जण होतो आणि होडीवाल्याने 'गाइड' बनायची तयारी दाखवली म्हणून पहिल्यांदाच 'गाइड' घेतला. आणि आमची 'गाइडेड टुर' सुरु झाली. गाइड बर्यापैकी माहिती देत होता. किल्ल्याचा उल्लेख वारंवार 'अजिंक्य' असा करत होता. मला ते थोडं खटकलं, पण म्हटलं ऐकू तर काय काय सांगतोय.... नंतर त्याने शिवाजी, संभाजी यांनी किल्ला जिंकायचे केलेले अनेक अयशस्वी प्रयत्न इ.

मानवनिर्मित वातावारणबदल (climate change)

लेखक निकित यांनी सोमवार, 01/11/2010 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
सोयीस्कर असत्ये लोकसत्तेमध्ये काही महिन्यांपूर्वी मुग्धा कर्णिक यांचा “गैरसोयीची असत्ये” हा लेख प्रकाशित झाला. त्यामध्ये त्यांनी जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदल हे नैसर्गिकच असून त्याला कार्बन डाय ऑक्साईड व इतर हरितगृह वायू जबाबदार नाहीत अशा प्रकारचा दावा केला आहे. त्याकरिता त्यांनी काही शास्त्रज्ञांचे दाखलेसुद्धा दिले आहेत. तथापि, त्यांच्या लेखातील अनेक मुद्दे हे सोयीस्कररित्या अपुऱ्या व अवैज्ञानिक माहितीवर आधारित आणि हास्यास्पद आहेत.

अपेक्षित

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी सोमवार, 01/11/2010 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
गेले २ दिवस ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या बद्दल काही तरी लिहिला जाण्याची वाटच बघत होतो पण तशी काही चिह्ने दिसत नाहीयेत;हे तुम्हा सगळ्या लोकांना इतके अपेक्षित होते का? असो बरीच मिपा कर मंडळी फोरेनर आहेत त्यांना सांगण्यासाठी हि लींक http://72.78.249.107/esakal/20101101/5442208261395513630.htm http://72.78.249.107/esakal/20101031/4989233220531104330.htm आता मत-प्रदर्शनाला सुरुवात होऊ द्यात. मा मु अशोक रोजी चावण यांनी राव नावात जोडल्या मुळे असा

कोलाज.... पुन:प्रयत्न..

लेखक चिगो यांनी रविवार, 31/10/2010 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
हातात कॅमेरा घेतल्यावर काही ना काही टिपल्या जातंच.. त्यातल्या त्यात डिजीटल कॅमेरा, म्हणजे तर "क्लिकक्लिकाट"च.. एवढ्यात भरपूर भटकंती झाली.

‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 31/10/2010 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन नमस्कार मित्रांनो, माझा ‘रानमेवा’ हा पहिलावहिला काव्यसंग्रह बुधवार दिनांक, १० नोव्हेंबर २०१० ला शेगाव (जि.बुलढाणा) येथे मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात लाखो शेतकर्‍यांच्या साक्षीने मा.शरद जोशी यांचे शुभहस्ते प्रकाशित होत आहे. आपणही उपस्थित राहून आपले आशिर्वाद द्यावेत, यास्तव हे आग्रहाचे निमंत्रण. ११२ पृष्ठे असलेल्या या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ.