Skip to main content

पत्राचे दिवस ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 21/04/2011 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी कसे छान दिवस होते तारुण्याचे कसे एक गाणे होते पत्र येईल येईल म्हणून मन वाट बघायचे निळ्या पत्रात मन हरवून जायचे शब्दांची रांगोळी कशी छान वाटायची निळ्या निळ्या आभाळात कशी पाखरे उडायची तिच्या घरासमोरचा पिंपळ सळसळताना दिसायचा संध्याकाळी ती खिडकीतून दूरवर नजर टाकीत वाट बघायची [अशी कल्पना त्याच्या डोक्यात यायची] नुसत्या आठवणीने किती बहरून जायचे मन जुनी पत्र चाळताना किती हरवून जातेय मन ...! पोस्टमनची वाट बघता बघता कसा दिवस हरवून जायचा स्वप्नात तिचा भास छळत राहायचा ..!! पत्राची एक निराळीच गंमत होती तिच्या लिहिलेल्या शब्दाशब्दावर जीव फुलत होता अधून मधून चोरून पत्र वाचत र
काव्यरस

पेअर चॉकलेट केक

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 21/04/2011 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांनी एक नवी केकृ खास इस्टर निमित्त-
साहित्य- १५० ग्राम बटर, १५० ग्राम साखर,३०० ग्राम मैदा,५० ग्राम ओट फ्लेक्स, ४ अंडी, ३ चहाचे चमचे बेकिंग पावडर, १ चमचा रम,१ चमचा कोको पावडर, १०० ग्राम कुकिंग चॉकलेट,१/२ चमचा जायफळ पावडर+१/२ चमचा दालचिनी पावडर,४ चमचे दूध, ८५० ग्रामचा पेअरचा टिन.( ४ पूर्ण + अर्धे पेअर असे ९ अर्धे पेअर ), १ चिमूट मीठ सजावटीसाठी- चॉकलेट आयसिंग, व्हाइट चॉकलेट कृती-पेअर चाळणीवर टाकून पाक निथळून घेणे. बटर भरपूर फेटणे

वासंतिका‏

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 20/04/2011 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्वागता पुन:र्मिलनाच्या उत्तरा अन रविच्या घेऊन बहार साचा आला वसंत आला || विरह तो सहा मासांचा तिज शुष्क थंड शिशिराचा गर्भात फुलवीत आशा पुन:रुपी वसंत आला || रंगेल सोहळा आता विरहीत दोन जीवांचा उभारीत गुढ्या पर्णांच्या विलासी वसंत आला || लेऊन गर्द हिरवाई कोरून पुष्प काशिदाही रसरशीत फळे ही पदरी मिलनास अधिर अवनी ही || आला वसंत आला .......... __/\__ अपर्णा
काव्यरस

पोटपाल

लेखक तिमा यांनी बुधवार, 20/04/2011 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोणा एका राज्यात भ्रष्टाचार अतोनात माजला होता. राजा देखील या मलिन प्रतिमेमुळे अतिशय त्रस्त झाला होता. पण त्याच्या भोवतीचे कोंडाळे, प्रधानजी, राजाच्या पूर्वजांनी अनेक वर्षे पोसलेले वतनदार या सगळ्यांपुढे तो काहीच करु शकत नव्हता. स्वतः साधे रहाणे यापलिकडे तो लोकांसमोर कुठलाही आदर्श ठेवू शकत नव्हता. प्रजा ही एके काळी साधी होती. परन्तु सततच्या भ्रष्टाचारामुळे तीही अशा गोष्टी गृहीत धरु लागली होती. संपूर्ण लोकसंख्येमधे अतिशय स्वच्छ चारित्र्याचे फारच थोडे लोक राहिले होते. ज्यांना कुठे ना कुठे हात मारता येत होता ते यथेच्छ ओरपत होते. ज्यांना संधीच मिळत नव्हती ते नाईलाजाने प्रामाणिक राहिले होते.

खिमा पाव

लेखक गणपा यांनी बुधवार, 20/04/2011 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
परवा प्रभ्याशी गप्पा हाणताना खिम्याचा विषय निघाला. तसा तो खुप आधी पासुन माझ्या मागे लागला होता की खिम्याची पाकृ दे एकदा. पण योग जुळुन आला नव्हता. असो तर ही पाकृ खास आपल्या प्रभ्याच्या आग्रहा खातर. साहित्यः १ लहान चमचा हळद. १ मोठा चमचा मसाला (मालवणी/वाढवळ) १ लहान चमचा गरम मसाला. १ मोठा चमचा शाहीजीरे/जीरे. १ मोठा चमचा धणे पुड. १ मोठा चमचा जीरे पुड.

कळले नाही ....

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 20/04/2011 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
भिजलो उन्हात इतका .... पावसात वाळलो नाही ... मेलो पुन्हा पुन्हा इतका ..... जगण्यास भाळलो नाही ... पिकलो कधीच नव्हतो .... गळलो कसे कळले नाही ... पेटलो कधीच नव्हतो.... जळलो कसे कळले नाही ... खेळलोच नाही कधी .... हरलो कसे कळले नाही ... विसरली नव्हतीस कधी .... स्मरलो कसे कळले नाही ... आणले उसने अवसान .... गळले कसे कळले नाही ... दुख्खास ह्या सलत्या ... गिळले कसे कळले नाही .... होतो स्वप्नवत निद्रेत .... जागलो कसे कळले नाही .... होतीस तू माझा श्वास .... अजून जगलो कसे कळले नाही .... होतीस तू माझा श्वास .... अजून जगलो कसे कळले नाही ....
काव्यरस

भातुकलीचा खेळ ...

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 20/04/2011 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच वर्षांची आपली निस्सीम मैत्री "संपवून" ठरवले करूयात दोनाचे चार हात ... वरवरून सगळे छान होते सगळा आनंद होता ...

मुंबई विरुध्द पुणे ( आयपील क्रिकेट सामना)

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 20/04/2011 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत मुंबई विरुध्द पुणे अशा चर्चा/ भांडणे आपण अनेक ठिकाणी, अनेक वेगवेगळ्या संदर्भाने पाहिल्यात , रंगवल्यात या दोन्ही शहरांच्या नावापुढे 'कर' जोडून दोन्ही संस्कृतीतील फरक, स्वभावपैलू विविध ठिकाणी, अगदी संकेतस्थळांवरही विक्रमी चर्चा आपण केल्या आहेत. आज आयपील सामन्याच्या निमित्याने आज ही दोन्ही शहरे एकमेकांविरुध्द लढण्यास सज्ज झाली आहेत.

तरी का ?

लेखक उगा काहितरीच यांनी बुधवार, 20/04/2011 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी ! वरीष्ठ मिपाकरांची आज्ञा /ईच्छा मानुन बर्‍याच दिवसानंतर येतोय . आशा करतो कि विसरले नसनार ( तशी मराठी मानसाची स्मरणशक्ती दांडगी हो!:) ) मागच्या काही दिवसापासुन आमच्याकडे माझी आजी आलेली आहे. आणि तिला टि.व्ही. वरच्या सगळ्या मालिका जाम प्रिय (star plus च्या हो !) तिच्यामुळे मलाही IPL च्या ब्रेकमध्ये का होईना पण पाहाव्या लागतात :( मला कळत नाही की लोकांना या प्रकारच्या मालिका पाहवतात तरी कशा ?