मनाचं मंथन
आज पुन्हा आभाळ भरून आलं होतं
असं कित्तीदा तरी होतं..कित्तीदा तरी झालंय आणि होतंच राहलंय ...
का कुणास ठाऊक पण आज मात्र बरसेल असं वाटलं आणि तस्संच झालं ..
बरसून गेलं आणि सारा आसमंत कसा शांत झाला. गुलजारच्या इजाजत मधल्या "त्या" - बरस जायेगी तो अपनेआप थम जायेगी डायलॊगची आज पुन्हा आठवण झाली.
खरतर बरसत आत होतं बाहेर तर फ़क्त पाऊस पडत होता ..!! पण आजचा पाऊस जरा वेगळाच होता..मनातली जळमटं, काजळी धुवून काढणारा! नेहमीसारखा पुन:पुन्हा त्याची वाट पहायला लावणारा उकाडा आज पावसानंतर नव्हता.
ब-याच दिवसांच्या आत दाटलेल्या वेदनेला मोकळी वाट मिळाली ..हो डोळ्यांनीच ती करून दिली.
मिसळपाव
