Skip to main content

*आह्वानांची ऐशीतैश**

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 11/08/2011 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर मी कोणतच आह्वान दिलेले नाही. मी आह्वान स्वीकारायची तयारी दाखवली यात माझा काय हेतू होता, हे निसंदिग्ध पुढे यावे यासाठी हा लेख प्रपंच. मी आह्वान स्वीकारत नाही अशी काहींची तक्रार होती. अशा आह्वानतून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही किंवा निघत नाही, हे लोकांच्या पुढे आणायचे होते. एक ज्योतिषी जिंकला किंवा हरला हे ज्योतिष(शास्त्रा/विद्ये) बद्दल कोणतीही विधाने करण्यास करण्यास पुरेसे नाही. विज्ञानाची कास धरणार्‍यांना विज्ञानाच्या चौकटीत बसणारे आह्वान तयार करता येत नाही हे यातून अधोरेखित झाले.

साडू म्हणे कामच तोडू...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 11/08/2011 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
साडू म्हणे कामच तोडू... पूर्वाश्रमीचे घनिष्ठ मित्र असलेले व आता एकमेकांचे साडू बनलेले दोघेजण नेमक्या फ्रेंडशिप डे च्या दिवशी एकत्र येतात. त्यांच्यात पुढीलप्रमाणे संवाद घडतो... “काय साडू, लग्नाचे लाडू फुटल्यापासून तू चांगलाच सुटलाय की रे.” “आणि हे माझ्या प्रिय साडू तुझंही पोट फारच वाढू लागलंय त्याचं काय?” “अरे आज फ्रेंडशिप डे. विसरलास की काय?” “छे छे कसा विसरेन?” “मग बँड नाही आणलास? मागच्यावर्षी तर चांगले कोपरापर्यंत बँड बांधून फिरत होतास ना?” “अरे साडू, मागच्या आठवणी नकोस काढू..

अण्णांच्या मागे राहुल गांधी ??

लेखक ईश आपटे यांनी गुरुवार, 11/08/2011 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांच्या मागे कोण आहे ह्यावर बरीच चर्चा प्रसारमाध्यमात ही झाली आहे. काहींना वाटते त्यांच्यामागे संघीय शक्ती आहेत तर काहीना त्यांच्यामागे कम्यनिस्ट शक्ती दिसत आहेत. माझी स्वतःची अशी थेअरी आहे की अण्णांच्या मागे राहुल गांधी आहेत. १६ ऑगस्टला राहुल गांधी अण्णांची मागणी मान्य करुन पंतप्रधानांना लोकपालाच्या कक्षेत आणतील. व स्ट्राँग लोकपाल विधेयकाला मंजुरी देतील आणि भारतात भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे हिरो म्हणून पुढे येतील. (सरकारराज आठवतोय ?)संकेत असे आहेत की ममोंची घरी जायची वेळ झाली आहे.

ओळखा पाहू

लेखक आदिजोशी यांनी बुधवार, 10/08/2011 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखा पाहू ही नयनरम्य टेकडी कुठे आहे? ओळखणार्‍या माझ्याकडून ह्या परिसराची मोफत सहल. हिंट - हे ठिकाण मुंबईत / मुंबई जवळ आहे. नम्र सूचना - जे इथे येऊन गेले आहेत त्यांनी कॄपया उत्तर फोडू नये. नव्या लोकांना वाव द्यावा.

प्रॉमिस

लेखक जाई. यांनी बुधवार, 10/08/2011 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
कर्रर्र जोसेफविलामधिल घराची बेल वाजली. "शेखर आजगावकर" अशी पाटी लावल्येल्या घराचा दरवाजा उघडला. ''काय आज उशीर?" अंजलीने शेखरच्या हातातील बॅग घेत विचारले. ''हो, अग त्या स्मिथ अ‍ॅन्ड असोसिएट्च्या अ‍ॅनालिसिसच काम आलं.ड्योक्याचा पार पिट्टा पडला.संपता संपतच नव्ह्त. त्यात या पावसाने वैताग आणलाय.लींक रोडवरुन यायच म्ह्नजे आणखि ताप. "बरं! तू फ्रेश हो तेवढ्यात मी पानं घेतेच" "ठिक आहे. यश कुठय?" "उद्या ओबेरौयला जायचय ना? होमवर्क करतोय" "एरवी कंटाळा अभ्यासाचा. पण आता ओबेरौय म्ह्ट्ल की लगेच तयार!" "हो ना सगळ्या मित्राना सांगूनसुधा झालय" "छान. पण आता उदयाच्या वेळेच काय?" "का?

निरोधला विरोध!!!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 10/08/2011 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
निरोधला विरोध! पुरुष उवाच या तरुणाईच्या डोक्याला खुराक देणाऱ्या २००९च्या दिवाळी अंकात ‘निरोधला विरोध’ कोठे कोठे अन् कसा कसा होतो याचे मोठे अभ्यासपूर्ण रेखाटन केलेले होते. एका नामांकित लेखकाने एड्सग्रस्तांसाठी सामाजिक कार्य करतांना अनावधानानेच या विषयाला तोंड फोडले आहे. निरोधच्या वापराला विरोध जसा सुशिक्षितांकडून होतो त्याच प्रमाणात अशिक्षितांकडूनही होत असतो. यामागील कारणमिमांसा शोधण्याचा लेखकाने प्रयत्न केला व त्याचे निरीक्षण किंवा परीक्षण म्हणजे हा लेख होय. प्रथम त्याने ग्रामीण भागातील लोकांची मते जाणून घेतली. तेव्हा असे निष्कर्ष समोर आले की गावातील प्रत्येकाला प्रत्येकजण नावानिशी ओळखत असतो.

ब्राऊ..७..

लेखक गवि यांनी बुधवार, 10/08/2011 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
3

महावीर बंडू -

लेखक विदेश यांनी बुधवार, 10/08/2011 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
हाती फिरवत गदेस गरगर बंडू फिरतो भरभर घरभर , येणा-जाणाऱ्यास तडाखे बाल महावीराचे शंभर ! सोफ्यावरून खुर्चीवरती - खुर्चीवरून फरशीवरती , उड्डाणातुनी जखमी होतो पराक्रमी तो बंडू असतो ! ढगांची गडगड कानीं येता

गुमराह

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 10/08/2011 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे १२ वाजायला आले असतील, बाहेर पावसाची रिपरिप चालू होतीच. आज बाहेर पाऊस असून देखील मला खिन्न खिन्न वाटत होते. खरेतर पावसाळा म्हणजे माझा आवडता ऋतू. आज नेहमीप्रमाणे कॅफे बंद झाल्यावर कावेरी मातेचे यथासांग दर्शन देखील झाले होते, त्यामुळे हा पाऊस आणि अंगावर येणारी मस्त हवा आवडायला काहीच हरकत नव्हती. पण का कोणास ठावुक आज मन लागत नव्हते येवढे खरे. अचानक रात्री १२ च्या सुमारास फोन वाजला. येवढ्या रात्री मला सहसा कोणाचा फोन येणे अशक्यच. त्यात जागा असल्याने दुसर्‍या रिंगलाच फोन उचलला. पलीकडून काही क्षण फक्त श्वासोच्छ्वासांचे आवाज ऐकू येत होते.