Skip to main content

अदला बदली

लेखक अमोल मेंढे यांनी गुरुवार, 03/11/2011 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
" ए भाई किसीको तो पुछ लो" शेवटी माझा वैतागलेला मेंदु बोलला. रात्री १०.३० ची वेळ. शंभू, नरेश, राजु व मी मित्राच्या लग्नाला गेलो होतो. घरुनच निघायला उशीर झाल्यामुळे उशीरा पोहचणं स्वाभाविकच होतं. मुख्य रस्ता सोडुन गाडी कच्च्या रस्त्याला लागली आणि आमचे हाल व्हायला सुरुवात झाली. त्यात आमचा ड्रायव्हर त्याच्या बाजुची काच उघडी ठेवुन गाडी चालवत होता. ( काय तर म्हणे थंडीत गाडीच्या सगळ्या काचा बंद केल्या तर काचेवर धुकं जमा होऊन काहीच दिसत नाही. ) त्यामुळे आम्ही थंडी + धक्के असा दुहेरी मारा झेलत होतो. आठ वाजायला आले तेव्हा धुकं एवढं पडायला लागलं की काहीच दिसत नव्हतं.

स्वगत एका मध्यमवर्गीय गार्गीचे

लेखक विनीता देशपांडे यांनी गुरुवार, 03/11/2011 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
स्वगत एका मध्यमवर्गीय गार्गीचे मी गार्गी, माझ्या संसाराची चौकट चार चौघंसारखीच, नवरा विजय, मुलगा अक्षय आणि मुलगी अनया.या संसारातच माझ विश्व..समाधान आणि आनंद...........पण एक क्षण असा माझ्या आयुष्यात येईल अस कधीच वाटलं नव्हतं..... " माझी आजची संध्याकाळ रोज सारखीच होती. तसं संध्याकाळी घरी एकटं रहायचा खुप कंटाळा आला होता. पण करणार तरी काय ? जो तो आपआपल्या विश्वात रमलेला. मुलं ..कॉलेज, क्लास आणि मग मित्र-मैत्रीणीं -ते रात्रीच परत यायचे, आल्यावर ते आणि त्यांच कंप्युटर, नाही तर मोबाइलवर गप्पा.यामधुन ते वेळ काढुन माझी विचारपुस करत मग आमच्या थोड्याशा गप्पा.

आंघोळ

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 03/11/2011 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीच्या पहाटे आंघोळ करताना उटणे लावले जाते. ते नेमके का लावतात? त्या मागचे शास्त्रिय कारण काय? एकतर आज काल तर नोव्हेंबर मधे थंडीचा मागमुस सुद्धा नसतो. त्यात तेल लाउन आंघोळ म्हणजे अत्याचारच होतो. आता बाथरुम मधे ए.सी.लावण्याइतकी जागिरदारी काय उतु जात नाहीये. आणि हे वर उटणे लावायचे कंपलशन. मी तर दिवाळीच्या दिवशी उटण्याच्या पाकिटाला हातच लाउ देत नाही. आंघोळ चालेल. पण उटणे फक्त शास्त्रापुरता. उटणे लावायच्या परंपरेची कारण मिमांसा होइल काय?

स्वगत

लेखक विनीता देशपांडे यांनी गुरुवार, 03/11/2011 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
स्वगत विरघळलेल्या आशेमधून माझ्यातलं मी पण उठून उभ राहिलं-मला म्हणालं असच जाउ देते मला तळहातावर घेउन बघ तळहातांवरच्या रेषांमधून माझ प्राक्तन मला शोधत मनात आलं-मला म्हणालं असच जाउ देते मला डोळ्यात साठवून बघ डोळ्यातले स्वप्न दडलेल्या विचारांमधून वाट काढत ओठावर आलं-मला म्हणालं असच जाउ देते मला एकदा नवा श्चास घेउन बघ घुसमटलेल्या श्वासांमधून उसासे बाहेर पडले तळमळत मला म्हणाले-केव्हा पासून या मोकळ्या आकाशाची वाट बघत होतो.

जन्मठेप

लेखक नगरीनिरंजन यांनी गुरुवार, 03/11/2011 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
हजार पायांच्या गोमीसारखी लपलपत चाललेली ही लोकल आणि तिच्या अंगावरच्या असंख्य सूक्ष्म चिकट तंतूंसारखी तिला चिकटलेली लोचट आणि घामट माणसं. पायाखाली टचकन फुटणार्‍या शेंबड्या गोगलगायीसारखं आपलं लिबलिबीत आयुष्य गोंजारत निघालेली. त्या गिळगिळीत गोगलगायीने गळ्यापर्यंत गिळलेला एक रिटायरमेंटला आलेला म्हातारा गर्दीत उभा राहून शिवलीलामृत वाचतो आणि त्या गोगलगायीचं उरलेलं गिळणं सुखद व्हावं म्हणून गदगदत प्रार्थना करतो.

ओल

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 03/11/2011 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
ओल चुकवले वार शस्त्रांचे , सुकल्यात सर्व जखमा नाजूकशी फुलांची,पण्.....ती चीर चिघळती आहे ! थकली कधीच गात्रें , आता आधार लागे तरिही उरांत कुठली , ही धाव उधळती आहे? सांजावले कधीचे, बघ, पक्षी उडून गेले "घे,भरारी घे" ची पण साद हुरळती आहे ! शमवीत वेदनांना धन्वंतरी उगाच "होकार" ऐकण्याची सणक उसळती आहे ! सरणावरी कधीचे, अश्रू सुकून गेले फुटल्या घड्यांत मात्र.....ती "ओल" निथळती आहे.....ती "ओल" निथळती आहे ! ---------------------------------------------------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे-----------------०३-नोव्हेंबर २०११, दु. २ वा.------

गरजूला मदत करावी का?

लेखक मन यांनी गुरुवार, 03/11/2011 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
गरजूला मदत करावी काय? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी काहीजण लगेच "हो" असे देतील. आता हा गरजू जर "पाकिस्तान" असेल, तर आपले धोरण काय असावे? http://72.78.249.107/esakal/20111102/5137155085083760384.htm इथे छोटिशी बातमी वाचायला मिळाली. पाकिस्तान आपल्याकडे वीजेची मागणी करु शकते. अर्थातच आपण वीज देणार म्हणजे निव्वळ जनहितार्थ देणार असे नाही. ती वीज"विक्री"च असेल. पण सध्या आपले आणि "त्यांचे" संबंध लक्षात घेता, हे करणे पटते का?

गजरा (३)

लेखक फिझा यांनी गुरुवार, 03/11/2011 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
3