Skip to main content

जोकशाही

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 05/05/2023 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
हा मुख्यमंत्री की तो मुख्यमंत्री सामान्यांच्या हाती वाणसामानाची जंत्री भाडोत्री बँडवाले अन् भाड्याचे वाजंत्री आकड्यांची कुतरओढ लोक'शाई'ची जोकतंत्री लोकल ला अजून लटकतात ट्रॅफीकमधे अजून अटकतात तरुण नोकरीसाठी भटकतात शेतमाल दलाल अंग झटकतात ह्याची वटवट की त्याची खटपट सिहासन चित्रपट कि राष्ट्रपती लागवट हा मुख्यमंत्री की तो मुख्यमंत्री जनतेला पडत नाही फरक. त्यांना रोजचाच झालाय समस्यांचा नरक !!

नारळी पाव

लेखक सुनील यांनी गुरुवार, 04/05/2023 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
दोन महिन्यांपूर्वीच्या बुलेट्प्रूफ कॉफी या माझ्या पाककृतीत म्हटल्याप्रमाणे आहारातून कार्ब्स कमी केले. त्यामुळे वजन कमी झाले ते अद्यापही ६० किलोच आहे. आता कार्ब्स कमी करायचे तर माझा आवडता पाव हा पदार्थ खाता येत नाही. म्हणून कार्ब्स विरहीत पावाच्या शोध घेत असता नारळी पावाची कृती सापडली आणि त्वरीत अमलातही आणली.

खंडाळ्याच्या घाटाची १६० वर्षे

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 04/05/2023 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
खंडाळा स्टेशन मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे.

तट्टे इडली पोडी

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 04/05/2023 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
तट्ट इडली म्हणजेच ताटलीतली मोठी इडली आणि पोडी /गनपावडर चटणी चणाडाळ, उडीदडाळ,तीळ,सुकी लाल मिरची स्पाईसी चटणी... इडली नेहमी प्रमाणेच तांदूळ , उडीदडाळ आणि अर्धी वाटी साबुदाणा रात्री भिजवले. सकाळी हे सरभरीत वाटून एकत्र ६ तास फरमेंट होऊ दिले. इडली करताना पीठ वाटणात मीठ टाकून,मोठ्या ताटलीला तेल लावून इडली पीठ टाकले.इडली पात्रात इडली वाफवून घेतली. पोडी चटणी साठी -१वाटी चणा डाळ,एक वाटी उडीद डाळ खरपूस भाजली.१/२ वाटी तीळ भाजले.सुक्या लाल ७-८मिरच्या भाजल्या.हे सर्व जिन्नस गार झाल्यावर मिक्सरमधून किंचीत जाडसर वाटून घेतले.मीठ घातले. आता गरमागरम इडली वर आधी साजूक तूप पसरवून घेतले,पोडी चटणी पसरवून घेतली.इड

लाईफमें कभी कभी मसाला मंगता है..

लेखक आजी यांनी गुरुवार, 04/05/2023 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ झाली.भैरु उठला. न्याहरी करुन शेतावर गेला. माझीही अशीच तऱ्हा. तेच ते आणि तेच ते. "बाई मी दळण दळिते" हे खरं तर "बाई मी पीठ दळते." असं हवं. माझीही सकाळ उगवली. वाॅशरुममध्ये गेले. तोच तो ब्रश घेतला. तीच ती उदासवाण्या पांढऱ्या रंगाची पेस्ट त्यावर लावली. माझी पेस्ट ना खुशबूदार,ना झाग वाली,ना असरदार. मी दात घासले. टंग क्लिनरनं जीभ साफ केली. मग त्याच त्या वासाच्या, लवकर न झिजणाऱ्या आणि न संपणाऱ्या साबणानं चेहरा धुतला. केस नीट केले. आणि अंजनीबाईंनी केलेला तोच तो पाणचट चहा प्यायले. चहा किती बेचव,पुळकवणी!

यू -ट्युबवरील मराठी नाटके: दृष्टीक्षेप

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 04/05/2023 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
नाटक ही जिवंत कला आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा असते हे अगदी मान्य. परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध रंगमंदिरांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर एक नजर टाकल्यास बरेच असमाधान जाणवते. अनेक शहरांमधल्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबद्दल वारंवार माहिती प्रसारित होत आहे. नाट्य कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वच घटक या दुरवस्थेमुळे मनातून नाराज आहेत. मध्यंतरी पुण्यातील तीन महत्त्वाच्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबाबत विस्तृत अहवाल ‘सकाळ’मध्ये वाचण्यात आला.

ध्वनिचित्र

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 04/05/2023 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
झुळझुळत्या निळसर वळणावर झुकून, जळाशी झुळुक झोंबते ऐल पैल तीरांवर अवचित स्तब्ध लव्हाळी लहरून उठते त्या वळणाच्या पुढे जरासा कभिन्न काळा कातळ निश्चळ रुणझुणत्या पाण्याचे पैंजण ऐकत फुलते वेडी बाभूळ निळ्या सावळ्या डोहतळाशी अचपळ मासोळी सळसळते पुन्हा पुन्हा त्या ध्वनिचित्राच्या आठवणीने मन मोहरते

जनोबा रेग्याचे वंशज!

लेखक kool.amol यांनी गुरुवार, 13/04/2023 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
जर तुम्ही पू लं चे चाहते असाल तर जनोबा रेगे हा इसम/व्यक्तिरेखा तुम्हाला माहिती नाही असे होणे शक्य नाही. बटाट्याच्या चाळीतला एक अफलातून विनोद बुद्धी असणारी ही व्यक्ती. चाळीत खर म्हणजे एकापेक्षा एक नमुने आहेत, पण ह्याची बात काही औरच. ह्या व्यक्तिरेखेची 2 ठळक वैशिष्ट्ये, अत्यंत मोजक्या शब्दात विनोद निर्मिती आणि अफलातून म्हणावी अशी टायमिंग. एखादा अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे त्यात सगळे गंभीरतेने चर्चा करत आहेत आणि अशा वेळी अचानकच असं काहीतरी ही व्यक्ती बोलून जाते की त्या प्रसंगाच गांभीर्य समूळ नष्ट होऊन जातं आणि चालू असणारी गोष्ट खरोखरच गांभीर्याने घ्यायची गरज आहे का असा प्रश्न निर्माण होतो.